बिलोली : तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी व उद्धट वर्तणुकीमुळे नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या विविध शैक्षणिक सवलतींसाठी आवश्यक असलेली जात, उत्पन्न, नॉन-क्रिमिलिअर, रहिवासी अशा प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.
मात्र, कार्यालयातील एक कर्मचारी विद्यार्थ्यांना माहिती देताना उद्धट भाषेत उत्तर देत आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळतात, तर काही वेळा फॉर्म किंवा कागदपत्र तपासणीसाठी टेबलवर पाठवून परतवताना दिसून येत आहे. त्यातच विशेषता क्लर्क, अवल कारखून, यांनी जरी टेबल पास केले तरी तीन नंबर टेबल वर असलेल्या कर्मचारी मात्र पैसे घेतल्या शिवाय कोणतेही काम किंवा प्रमाणपत्र देण्यासाठी तयार नसतो. जो पर्यंत तुम्ही पैसे देणार नाही तो पर्यंत तुम्हाला कोणतेही काम करून मिळणार नाही अशी काही यांची ख्याती आहे.15 दिवस उलटून सुद्धा काहीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत मात्र पैसे दिल्यानंतर एका दिवसात तुम्हाला हवा तो प्रमाणात मिळून जाईल, तुम्ही जर पैसे देणार नाही तर तुम्हाला नको ते कारण सांगून तुम्हाला वापस पाठवतो.अलीकडेच एका शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रमाणपत्राच्या फक्त शेवटचा टेबल पास करण्यासाठी त्याच्याकडून 500 रुपयाची मागणी केली गेली होती मात्र या गोष्टीकडे कोणी लक्ष देताना दिसून येत नाही. कोणतीही दखल घेतली गेली नाही. परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांची बेफिकिरी आणखी वाढली असून विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करून विद्यार्थ्यांना सेवा मिळावी, अशी मागणी सर्व सामान्य नागरीकांकडून होत आहे.






.jpeg)

0 comments:
Post a Comment