जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 November 2019

डॉ. प्रियंका खून आणि बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे

हैद्राबाद– निर्भया प्रकरणानंतरही देशभरात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत. काल रात्री 9 वाजताच्या सुमारास तेलंगणात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. हैदराबाद शहराच्या बाहेरील शमशादनगर परिसरात एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला. ही तरुणी कोल्लुरु येथील एका पशु वैद्यकीय दवाखान्यात काम करत होती.

डॉ. रेड्डी यांच्यावर सामुहीक बलात्कार केल्यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अजून एक खुलासा केला असून, पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती.

सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी आरोपी मोहम्मद आरिफ याने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

भाजपचा ‘हा’ खासदार अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

मुंबई | काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज महाविकास आघाडीची विधानसभेत बहुमत चाचणी होणारी आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.

नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळ जवळ एक तास चर्चा झाली. चिखलीकर आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.पवार आणि चिखलीकर यांच्यात काय चर्चा झाली याबाबत तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, प्रतापराव चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या भेटीची चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, अजित पवारांनी बंड करत भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली होती.

पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून जाळून मारल्याची घटना

# LIVE NEWS Update : - दि . 29 नोव्हेंबर 2019 हैदराबादेत पुन्हा निर्भयाकांड पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून जाळून मारल्याची घटना तर सोशल मीडियावर # RIPRIYANKATEDDY असा ट्रेंड सुरू ? # हैदराबाद । बुधवारी रात्री टोल प्लाझाजवळ दुचाकी पंक्चर झाल्यामुळे थांबलेल्या 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या प्रियांका रेड्डीची हत्या करण्यात आली . गुरुवारी सकाळी डॉक्टरचा जळालेला मृतदेह सापडला . सुरुवातीच्या तपासणीनंतर पोलिसांना असा संशय आहे की खुनापूर्वी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता . या प्रकरणी साइबरबाद पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे . पशुवैद्यकीय डॉक्टर शदनगर येथे राहत असत आणि येथून सुमारे 30 किमी अंतरावर शमशाबादमधील पशुवैद्यकीय रुग्णालयात काम करीत होती . हैदराबाद - बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील टोंडुपल्ली टोल प्लाझावर ती दररोज दुचाकी उभी करायची आणि तेथून एक टॅक्सी घेऊन दवाखान्यात जात असे . # बुधवारी रात्री दुचाकीचा टायर पंक्चर दिसला त्या मुळे ती टोल प्लाझावर थांबली . बुधवारी डॉक्टर पशुवैद्यकीय रुग्णालयातून टोल प्लाझावर परत आली आणि तेथून दुस ? या क्लिनिकमध्ये जाण्यासाठी निघून गेले . रात्री 9 . 22 वाजता , डॉ . प्रियांकाने तिच्या बहिणीला फोनवर सांगितले की तीच्या दुचाकीचा टायर Play Marathi पंक्चर आहे . एका व्यक्तीने त्याला मदतीची ऑफर दिली आहे . थोड्या वेळाने , तीने पुन्हा फोन केला आणि सांगितले की मदत देणारी व्यक्ती असे सांगत आहे की आजूबाजूची सर्व दुकाने बंद आहेत आणि पंक्चर निश्चित करण्यासाठी गाडी दुस ? या ठिकाणी नेली पाहिजे . # डॉक्टर प्रियंकाने जेव्हा तिच्या बहिणीला फोन के ला तेव्हा ती खूप घाबरलेली होती . कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , जेव्हा डॉ . प्रियंकाने तिच्या बहिणीला फोन केला तेव्हा ती खूप घाबरलेली होती . तेंव्हा बहिणीने तेथे स्कुटी सोडून कॅब बुक करुन घरी परत जाण्यास सांगितले परंत महामार्गावरील टोल प्लाझावर वाट पाहत बसल्याने भीती वाटत असल्याचे प्रियंकाने सांगितले नंतर प्रियांकाने आपल्या बहिणीला सांगितले की आजूबाजूला अनोळखी माणसे आहेत ते त्याच्याकडे घुरून बघत आहेत आणि तिला भीती वाटत आहे . जवळच एक लॉरी उभी आहे , जिथे काही लोक उपस्थित आहेत . प्रिंकाने आपल्या बहिणीला सांगितले की तू माझ्याशी फोनवर बोलत राहा नंतर रात्री 9 : 44 वाजता प्रियांकाचा फोन स्विच ऑफ होता . कुटुंबीयांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली . # एका शेतकऱ्याने तिचा जळलेला मृतदेह पाहिला वेटरनरी डॉक्टर हैदराबाद - बेंगळुरू महामार्गावरील टोल प्लाझापासून 30 किमी अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी अखेर तिचा जळलेला मृतदेह पाहिला त्याने पोलिसांना याची माहिती दिली हरवलेल्याअहवालाच्या आधारे पोलिसांनी प्रियंकाच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले . तिच्या मृतदेहाची ओळख अर्ध जळालेल्या स्कार्फ आणि सोन्याच्या पेंडेंटद्वारे झाली . पोलिसांना परिसरातून दारूच्या बाटल्याही सापडल्या . # चार संशयितांना ताब्यात शमशाबादचे डीसीपी प्रकाश रेड्डी यांच्या माहितीनुसार , _ _ " पशुवैद्यकीय डॉक्टर पप्रियंकाला रॉकेलने पेटविण्यात आलं आहे . " तपास करण्यासाठी पोलिसांनी 10 पथके तयार केली आहेत . " हैदराबादचे कमिशनर वीसी सज्जनर म्हणाले की चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे . अर्धवट जळालेल्या स्थितीतील या महिला डॉक्टरच्या मतदेहाने सर्वांचेच मन सुन्न केलं आहे 
. या घटनेमुळे पुन्हा दिल्लीच्या निर्भया कांडाची आठवणी ताज्या केल्या आहे . तर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून ट्विटरवर देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत . # RIPRIYANKArEDDY असा ट्रेंड सुरू झाला असून महिला डॉक्टर करीता न्यायाची मागणी केली जात आहे . त्या संदर्भातील काही स्क्रिन शॉट आम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये देत आहोत .
संशयीत आरोपी 

29 November 2019

आदर्श प्ररकरणाची कोणतीही चौकशी नाही असे ED ने स्पष्ट केले

ईडीच्या पत्रात  लिहिले आहे की
अंमलबजावणी संचालनालय २.1.११.२०१ Press प्रेस नोट आदर्श सोसायटी घोटाळ्यावरील वृत्तान्त केलेल्या बातम्यांवरील स्पष्टीकरण हे स्पष्ट करण्यासाठी की आदर्श सोसायटी घोटाळ्यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणतीही नवीन चौकशी केली गेली नाही.  माध्यमांमध्ये नुकतेच प्रसिद्ध झालेले अहवाल हे सट्टेबाज आणि कोणत्याही गुणवत्तेशिवाय आहेत.असे स्पष्ट पणे ईडी कडुन पत्रातून सांगितले आहे.काल पासुन सोशल मिडिया वर ईडी कडुन आदर्श घोटाळ्याची  चौकशी होणार आहे असे संदेश forward होत होते.पण आत्ता ईडीने स्पष्ट पणे सांगितले  आले आहे . 

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची निवड

मुंबई | विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. आता दिलीप वळसे पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने हंगामी अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील यांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता वळसे पाटलांची निवड झाली आहे.महाविकास आघाडी विश्वासदर्शक ठराव शुक्रवारी मांडण्याची शक्यता आहे. विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना कोणतीही अडचण होऊ नये आणि कोणताही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी वळसे पाटलांची निवड झाली आहे.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांना संसदीय राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात विधानसभेचं अध्यक्षपद भुषवलं आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाराज!

मुंबई | गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर सहा जणांचा शिवाजी पार्कवर शपथविधी पार पडला. मात्र, शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे.

शपथविधी सोहळ्यात प्रोटोकाॅलनुसार व्यवस्था करण्यात आली नव्हती. शपथविधी सोहळ्याची व्यवस्था प्रशासनाला करु दिली नाही. त्यामुळे मंचावर अनेक त्रुटी पाहायला मिळाल्या, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शपथ घेताना आमदारांनी सुरुवातीला आपल्या नेत्यांची नावं घेतली, यावरही भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. भविष्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात असे प्रकार घडू नयेत. अशा कृत्यांमुळे सोहळ्याची प्रतिष्ठा खालावते, असं राज्यपालांचं म्हणणं आहे.

शपथविधीदरम्यान मंचावर असणाऱ्या अव्यवस्थेवर राज्यपालांना नाराजी व्यक्त केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत आक्षेप नोंदवला असल्याची माहिती मिळत आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’; मंत्रालयातील केबिनबाहेर लागली पाटी

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हजारोंच्या जनसमुदायासमोर शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज ते मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेणार आहेत. त्यामुळे मंत्रालयातील त्यांच्या केबिनबाहेर ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी पाटी लावण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता मंत्रालयात जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दरवाजाबाहेर फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यांचे केबिनही सजवण्यात आले असून त्यांच्या नावाची पाटी दरवाजावर लावण्यात आली आहे.उद्धव ठाकरे महाराष्ट्र विकास आघाडीचं नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतली. 20 वर्षानंतर महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभला असून उद्धव ठाकरे सैनेचे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.

दरम्यान, शिवसेनेनं भाजपसोबत युती करत विधानसभा लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन भाजप-सेनेमध्ये बिनसलं. उद्धव ठाकरे यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. आघाडीच्या मदतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे.

काँग्रेस च्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले उद्धव ठाकरे यांना पत्रा द्वारे शुभेच्छा

 
  आदित्यने मला काल भेट दिली आणि आज संध्याकाळी मुंबईतल्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आपले निमंत्रण दिले. मला खंत वाटते की या उत्सवात मी उपस्थित राहू शकत नाही.  शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र येत आहेत  अशा वेळी असाधारण परिस्थिती जेव्हा देशाला भाजपकडून अभूतपूर्व धोक्यांचा सामना करावा लागतो.  राजकीय वातावरण विषारी झाले आहे आणि अर्थव्यवस्था कोलमडली आहे, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.  शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एका समान कार्यक्रमास सहमती दर्शविली आहे आणि लाम यांना विश्वास आहे की हा कार्यक्रम पत्र व भावनेने राबविण्यासाठी सर्व तिन्ही पक्ष प्रयत्नशील असतील.  आघाडीने एकत्रित, हेतूपूर्ण, जबाबदार, जबाबदार, पारदर्शक व प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करुन द्यावी ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे आणि या अपेक्षांची पूर्तता व्हावी यासाठी आमचा सामूहिक प्रयत्न निःसंशयपणे होईल.  तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन डाव साकारला म्हणून मी तुम्हाला वैयक्तिक शुभेच्छा देतो. 
 विनम्र विनम्रतेने, विनम्र  श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री - मंत्रिमंत्रिम 

शिवतिर्थावरील शपथसोहळ्यात उद्धव ठाकरेंसोबत ‘या’ नेत्यांनीही घेतली शपथ!

मुंबई | बरोबर सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे 29 वे तर शिवसेनेचे 3 रे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकूण सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मी जयंत कुसुम राजाराम पाटील असं म्हणत आणि शरद पवार साहेबांना वंदन करून शपथ घेतो की, असं म्हटलं. यावेेळी शिवतिर्थावर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसंच राष्ट्रवादीचे दुसरे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचं स्मरण केलं. त्याचबरोबर भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिवादन केलंदुसरीकडे काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. तर विदर्भातले काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत आणि तथागत गौतम बुद्ध यांना साक्ष ठेवत मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

28 November 2019

देवेंद्र फडणवीस यांची सरकार स्थापन झाल्या वर पहिली टीका

लाईव्ह न्युज अपडेट: मागील सरकार पेक्ष्या ह्या सरकारचा विरोधी पक्ष सक्षम असल्याचा प्रत्यय सरकार
स्थापन झाल्या च्या काही तासात
आला आहे. फडणवीस यांनी ट्विटर वर सरकार विरोधात जोरदार हल्ला चढवला असून पुन्हा विदर्भाचा राग आळवला असल्याचं समोर आलं आहे.फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारे माप घोषणा असल्या तरी मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटेवर वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख ही सुद्धा असू नये हे दुर्दैवी आहे. असं म्हणत नवे सरकार त्याकडे लक्ष देईल अशी आशा करू असं ट्विट केलं आहे.
राज यांनी जस म्हंटल होत राज्याला सक्षम विरोधी पक्ष्याची गरज आहे. तो राज यांनी जरी दिला नसला तरी भाजप सर्वात मोठा पक्ष असून ही विरोधात बसण्याची वेळ आल्या मूळे राज्याला सक्षम विरोधी पक्ष भेटला असून त्याची चुणूक ही लगेच सरकार स्थापन होताच दिसून आली असून हे राज्याचा हिता साठी चांगलंच म्हनाव लागेल नाही का?

महाविकासआघाडीचा खातेवाटप फॉर्मुला ठरला

शिवसेना प्रमुख तथा भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तास्थापन होणाऱ्या ' महाविकासआघाडीचा ' खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे . या खातेवाटपात काँग्रेसच्या वाट्याला जादा कॅबिनेट मंत्रीपद आले आहे . महाराष्ट्र विकासआघाडीचा खातेवाटपचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे . या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रीपदं अशी १६ मंत्रीपदे आली आहेत . तर राष्ट्रवादी काँग्रेसला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदं अशी १५ मंत्रीपदं आणि काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदे मिळणार आहेत आहेत . दरम्यान , आधी काँग्रेसला ९ कॅबिनेट १ राज्यमंत्री मिळणार होते . आता एक कॅबिनेट पद वाढले आहे . उपमुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात एक कॅबिनेट मंत्रीपद जास्तीचे मिळाले आहे .

27 November 2019

सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले: एकनाथ खडसे

मुंबई: महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. राज्यातील या सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या भेटीला!

मुंबई | बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक येथे दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांचं या बैठकीकडे लक्ष लागले आहे.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार तातडीने सिल्व्हर ओकवर रवाना झाले होते.

दरम्यान, अजित पवार ही त्यांच्या निवासस्थानाहून सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना  झाले होते.

शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित आहेत.

26 November 2019

बिलोली येथील विद्यानिकेतन शाळेत संविधान दिन साजरा

 (बिलोली): येथील विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय  येथे आज संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व  डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या वेशभूषेत दोन विद्यार्थी होते. व संविधानातील मुलभुत अधीकार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री. अशोक दगडे सर,बालाजी वारघडे सर,पाटील सर,कापावार सर, रामचंद्र मोरे सर,बुद्वेवाड सर,दुप्पे सर,भास्कर गौड सर व शाळेतील शिक्षक विद्यार्थी , जेष्ठ नागरिक उपस्थित होते .

जे भल्याभल्यांना जमलं नाही ते भाऊजी सदानंद सुळेंनी करून दाखवलं ?

 मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार घेण्यापूर्वीच अजित पवार ( Ajit Pawar resigns as DCM ) यांनी राजीनामा दिला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मॅरेथॉन भेटी घेत अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीतच ठेवण्यात यश मिळवलं आहे . सर्व दिग्गजांनी भेटी घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांची भेट अजित पवारांसाठी ( Ajit Pawar resigns as DCM ) निर्णायक ठरली सदानंद सुळे यांनी आज सकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवारांची भेट घेऊन , त्यांचं मन वळवलं . अखेर 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी 3 दिवसात पदभार न स्वीकारताच राजीनामा दिला . सदानंद सुळेंच्या भेटीनंतर अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे . अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का तर राष्ट्रवादीसाठी तितकाच मोठा दिलासा आहे .

*26/11चा मुंबई हल्ला : 'कसाब रोबोसारखा गोळीबार करत होता आणि मी त्याचे फोटो घेतले'*

तो अगदी बोअरिंग, कंटाळवाणा दिवस होता."
याच शब्दांत सबॅस्टियन डि'सुझा 26 नोव्हेंबर 2008च्या दिवसाचं वर्णन करतात. तो दिवस, जेव्हा त्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनात बेछूट गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे फोटो टिपले होते.

एक दशकानंतर आम्ही त्यांना पुन्हा बोलतं केलं. 66 वर्षांचे डि'सुझा निवृत्त झाल्यापासून गोव्यात राहतात. पण दहा वर्षांपूर्वी ते मुंबई मिरर या दैनिकात फोटो एडिटर (फोटोग्राफर्सचे प्रमुख) म्हणून काम करत होते.

त्या दिवशी ते संध्याकाळी CSMT स्टेशनपासून जवळच असलेल्या आपल्या ऑफिसमध्ये बसले होते. कुणाला काही कळण्याच्या आतच मुंबईवर हल्ला झाला.

आधी कुलाब्यात लिओपोल्ड कॅफेजवळ गोळीबार झाल्याची आणि काही बंदुकधारी ताज महाल हॉटेलमध्ये घुसल्याची माहिती मिळाली.आम्ही ऑफिसमध्येच बसलो होतो. तो दिवस अगदी कंटाळवाणा होता, कुणालाच चांगले फोटो मिळाले नव्हते. एरवी कुणी ऑफिसला परत येत नाही, पण त्या दिवशी सगळे जमले होते. गप्पा, चर्चा सुरू होत्या. अचानक बातमी झळकली आणि सगळे धावले. प्रत्येकानं आपापल्या बॅगा उचलल्या आणि तिथून पळाले."

गोळीबार झाल्याच्या बातमीनं सुरुवात झाली आणि मुंबईतलं भयनाट्य पुढचे साठ तास सुरू होतं. CSMT स्टेशन, दोन अलिशान हॉटेल्स आणि नरिमन हाऊसवर झालेल्या हल्ल्यांत 166 जणांचा मृत्यू झाला. नऊ हल्लेखोरही मारले गेले.

दहावा हल्लेखोर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आलं. कसाब आणि त्याच्या एका साथीदारानं CSMT स्टेशनवर हल्ला केला होता जिथे 52 जणांचा जीव गेला.स्टेशनवरचा रक्तपात
स्फोटांचा, गोळीबाराचा आवाज ऐकून डि'सुझा स्टेशनवर पोहोचले, तेव्हा आपल्या समोर काहीतरी वेगळं घडतंय हे त्यांच्या लक्षात आलं. असं काहीतरी, जे याआधी कुठल्याही युद्धभूमीपासून दूर, सुरक्षित शहरात घडलं नव्हतं.

"ते सगळं नवीनच होतं. मी अतिरेक्यांना असं कधी पाहिलं नव्हतं. मला काही वेगळं घडत असल्याचं दिसलं तर मी तडक तिथे पोहोचतो. त्या दिवशीही मला प्रश्न पडला, हे काय चाललं आहे? मी माग काढत स्टेशनवर गेलो," डि'सुझा सांगतात.

कसाब आणि त्याच्या साथीदाराला (इस्माइल खान) पहिल्यांदा पाहिलं, तो क्षण डि'सुझा यांना आजही स्पष्ट आठवतो.

"लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मना वेगळं करणाऱ्या भागात, तिकीट काऊंटरजवळ ते होते. ते सहज दिसून येत नव्हते, कारण कुठल्याही सर्वसामान्य पर्यटकांसारख्या बॅकपॅक त्यांच्या खांद्यावर होत्या. त्यांनी गोळीबार केला नाही, तर ते कुठे आहेत हे समजणं कठीण होतं. मी तसाच त्यांचा माग काढला आणि एका हवालदाराला सांगितलं - ते पाहा तिकडे आहेत."
डि'सुझा त्यानंतर दोघांचा पाठलाग करत राहिले, खाली वाकत, मिळेल तिथे आडोसा शोधत, फोटो काढत राहिले.

"मी त्यांच्यावरची माझी नजर अजिबात ढळू दिली नाही. मला फक्त पाहायचं होतं, ते नेमकं काय करत आहेत. मी फोटोग्राफर म्हणून 'हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे' असं काही नसतं. हे लोक कोण आहेत? ते खरंच अतिरेकी आहेत का? ते कोणावर गोळीबार करत आहेत आणि का? मला फक्त जाणून घ्यायचं होतं."कसाबचा 'तो' फोटो
हल्लेखोर तिथे होते तोवर डि'सुझा फोटो काढत राहिले. त्यातल्याच एका फोटोत एक बंदूकधारी माणूस कार्गो पँट, टी-शर्ट घालून, हातातल्या रायफलसह स्टेशनवर चालताना दिसतो. तो अजमल कसाब असल्याचं मागाहून स्पष्ट झालं.

कसाबचा तो फोटो पुढे कोर्टात त्याच्याविरुद्धच्या खटल्यात महत्त्वाचा पुरावा ठरला. त्या फोटोंचं ऐतिहासिक महत्त्व पाहता, त्यांचा 2009 सालच्या वर्षाच्या वर्ल्ड प्रेस फोटोच्या मानद यादीत समावेश करण्यात आला.

पण हे सगळं नंतरचं. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 27 नोव्हेंबर 2008च्या सकाळी, मुंबईवरचा हल्ला अजून संपला नव्हता आणि अतिरेकी ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊसमध्ये तळ ठोकून होते, तेव्हा मुंबई मिररच्या मुखपृष्ठावर कसाबचा फोटो झळकला.

तो फोटो मुंबईकर आजही विसरू शकलेले नाहीत. पण त्या फोटोनं मिळालेल्या प्रसिद्धीपासून डि'सुझा यांनी दूर राहणंच पसंत केलं. दहा वर्षांनंतरही त्यांचं मत बदललेलं नाही.

"सगळं काही संपल्यावर तुमच्या लक्षात येतं की, 'अरे, आपण काहीतरी वेगळं केलं होतं.' मला यात काही ग्रेट वगैरे वाटत नाही. माझ्यासमोर जे काही घडलं, ते मी कॅमेऱ्यात टिपत गेलो. मला त्याचा अभिमान वगैरे वाटत नाही. लोक त्यावर काही बोलत आहेत, पण मी फक्त माझं काम केलं."

उलट ते सगळं विसरून जायला हवं असं डि'सुझा यांना वाटतं. "मला वाटत नाही की त्या फोटोमुळं मी कोणी मोठा बनलो किंवा मला ते मिरवावंसं वाटत नाही. तो एक खूनी होता. मी कोण्या चांगल्या व्यक्तीचा फोटो काढला असता, तर मला वेगळं वाटलं असतं," असं ते सांगतात.

डि'सुझा यांना कोर्टात कसाबविरुद्ध साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं, आणि ती दुसरी भेटही त्यांना लख्खपणे आठवते.

"इतक्या जवळून त्याला पुन्हा पाहिल्यावर मला तो वेगळाच भासला. सापळ्यात अडकल्यासारखा. मला वाटतं त्याला आपण काय करत होतो, हे ठावूक नसावं तेव्हा. ते रोबोसारखे होते, गोळीबार करत सुटले होते, ते नशेत वैगरे होते का? माहीत नाही. कुणाचा जीव घेणं ही मोठी भयानक गोष्ट आहे. तुम्ही आणि मी असं कधी करणार नाही."

अखेर कसाबवरचे आरोप सिद्ध झाले आणि 2010 सालच्या मे महिन्यात त्याला मृत्युदंड ठोठावण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानं ती शिक्षा कायम ठेवल्यावर कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.गोळीबार आणि भीतीचा सामना
कसाबला फासावर चढवलं, त्याला आता सहा वर्षं झाली आहेत. पण तो जिवंत होता तेव्हा, किंवा त्याआधी त्या रात्री स्टेशनवर समोर येईल त्याच्यावर गोळीबार करत होता, तेव्हाही डि'सुझा यांना कधी सेकंदासाठीही भीती वाटली नाही.

फोटो काढताना तुम्ही घाबरला होता का, असं विचारून होण्याआधीच ते उत्तर देतात, 'अजिबात नाही.'

"मला भीती वाटली नाही. अजिबात नाही. तुमचा तोल गेला तर काय होईल? तुम्ही घाबराल, पळाल, तिथून निघून जाल. भीती वाटली की ते स्वाभाविक आहे. कोणीही पळून जाईल. त्या दिवशीही अनेक पत्रकार पळून गेले," ते सांगतात.डि'सुझा यांना कशाची भीती वाटली नव्हती, पण ते नेमके कुठे होते, हे कळल्यावर त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती?

"त्यांना आनंद झाला की मी जिवंत आहे," डि'सुझा हसत हसत सांगतात. "म्हणजे बघा, माझी पत्नी रोझी तेव्हा चिडली होती. कारण मी फोटो काढताना फोन स्विच ऑफ केला होता, स्टेशनवरच्या शांततेत माझ्याकडे लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून. तिथे अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती."

डि'सुझा यांच्यात ते धाडस अनेक वर्षांच्या अनुभवामुळं आलं असावं. त्यांनी त्याआधीही दंगली आणि आपत्तींचं वार्तांकन केलं होतं.

"माझ्या कामाची सुरुवात ही दंगलीपासून झाली, नागरीपाड्यातली दंगल. मी एका पोलिसावर चाकूहल्ला झालेला पाहिला आहे. त्यामुळं भीती वगैरेचं म्हणाल, तर पहिल्या दिवसापासूनच मला या सगळ्यांची सवय आहे," ते सांगतात.

2002 साली जेव्हा गुजरातमध्ये जातीय हिंसाचार सुरू होता तेव्हा डि'सुझा AFP वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. त्यांनी त्यावेळी टिपलेला एक फोटो गुजरात दंगलींची ओळख बनला.

"मी 300mm लेन्सनं फोटो काढला, तेव्हा त्या व्यक्तीपासून दूर होतो. हा माणूस हातवारे करून मिरवत होता. तिथं गर्दी जमा झाली होती आणि ते कुठंतरी जाऊन हल्ला करण्याची तयारी करत होते. मी फोटो काढला. नंतर कुणी माझ्यावर टीका केली की मी जाणूनबुजून त्याला तशी पोझ द्यायला लावली. पण मी कधीच पोझ देताना फोटो काढत नाही, पत्रकार परिषदेतही नाही," ते सांगतात.

योग्य वेळ साधणं हे पत्रकारांसाठी आता आणखी महत्त्वाचं बनलं आहे हे डि'सुझा मान्य करतात. आता कुणाकडेही मोबाईल फोनमध्ये कॅमेरा असतो आणि त्या जागी जो कोणी असेल, त्याला फोटो मिळून जातात.

त्यामुळंच युवा फोटोग्राफर्सना डि'सुझा एक सल्ला देता, "तुमचं आसपास लक्ष असायला हवं. संयमी राहा, घाई करू नका की तुमच्याकडून काही निसटून जाईल. तुमचा निर्णय स्वतःच घ्या. एक क्षण थांबून आसपास पाहा आणि मगच पुढे जा. वेड्यासारखं फक्त धावत सुटू नका."

मी पुन्हा येईन, पुन्हा येईन…या या या आमच्या बोकांडी बसा”

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचारसभेत ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ हे वाक्य म्हटलं होतं. त्यांचं हे वाक्य संपुर्ण महाराष्ट्रभर गाजलं. देवेंद्र फडणवीसांच्या या वाक्यामुळं सोशल मीडियावर विरोधकांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. आता तर त्यांच्या याच वाक्यावर एक गाण आलं आहे.

‘मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा…या या या आमच्या बोकांडी बसा’ अशी गाण्याची सुरूवात आहे. गायक साजन बेंद्रेंनी हे गाण गायलं आहे. सध्या संपुर्ण महाराष्ट्राभर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.देवेंद्र फडणवीसांची मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन’ ही टॅगलाईन चांगलीच गाजली. या टॅगलाईनला कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनातील ‘या या या बसा आमच्या बोकांडी’ ही क्लीप कापून फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन’ या क्लीपला एकत्रित जोडली गेली. त्यानंतर ही क्लीप महाराष्ट्रातील अनेकांच्या व्हाट्सअप स्टेटसह फेसबुक, इन्टाग्रामवर पाहायला मिळत होती.

दरम्यान, गायक साजन बेंद्रे यांंचं हे गाण प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे.

25 November 2019

आमचं अगोदरच ठरलं होत अजित पवारांचा गौप्यस्फोट ?

 टीव्ही ९ मराठीच्या वृत्तानुसार बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केले . राष्ट्रवादी काँग्रेसनं काही महिन्यांपूर्वीच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता . याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेत्यांच्या बैठकीही झाल्या होत्या . मात्र आता हे सगळे नेते मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं अजित पवारांनी सांगितले . सभागृहात गुप्त मतदान झाल्यास आपण जिंकणारच असा विश्वास अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला . आता काही ज्येष्ठ नेते मला भेटत आहेत , मला शब्द फिरवायला सांगितला जातोय असं अजितदादा म्हणाले . मात्र मी आता काही बोलणार नाही , वेळ आल्यावर माझ्या सोयीनं सगळं बोलेन असा गर्भित इशारा अजित पवारांनी दिला आहे . तसेच केंद्रात भाजपाचे भक्कम सरकार आहे . त्यामुळे केंद्राकडून विकास कामांसाठी भरघोस निधी आपल्याला मिळेल त्यासाठी भाजपासोबत जाणं योग्य आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं . त्यामुळे अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना अपयश हाती लागणार हे दिसून येत आहे .

राज्यपालांना हटवण्याची मराठी एकीकरण समीतीची मागणी

मीरा रोड - महाराष्ट्रातील एकूणच राजकीय घडामोडी आणि सत्ता स्थापनेचा प्रकार पाहता मूळचे भाजपाचे असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे . जनतेचा संविधान , लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर राष्ट्रपती व राज्यपाल या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असावी व याची स्वत : हून राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी , अशी विनंती समितीने केली आहे . मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख , प्रदीप सामंत आदी प्रमुखांनी एकूणच सत्ता स्थापनेसाठी घडलेल्या प्रकाराचा निषेध करत ही मागणी केली आहे . समितीने राज्यपाल कोशयारी हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असून भाजपाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले आहेत . शिवाय भाजणच्या तिकिटावर ते निवडणुका जिंकलेले आहेत . तशी माहित राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली त्यामुळे राज्यपाल कोशयारी यांची भूमिका ही पक्षपातीपणाची आहे हे एकूणच सर्व घडामोडींवरून दिसतेय , असे समितीने म्हटले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आधी ज्या पद्धतीने राज्यात राष्ट्रपती राजवट लावली आणि रातोरात ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट उठवून सकाळीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदांची शपथ दिली हे सर्व प्रकार देशाचे संविधान , लोकशाहीला निश्चितच काळिमा फासणारे आहेत . जनतेच्या आणि राज्याच्या आतापर्यंतच्या राजकीय सभ्यता व परंपरेला काळिमा फासणारा असल्याची टीका देशमुख व सामंत यांनी केली आहे . वास्तविक राष्ट्रपती व राज्यपाल ही पदं देशाचे संविधानातली महत्त्वाची घटनात्मक पदं असून ते निष्पक्ष आणि कोणाचे विशेष हितसंबंध जपणारी नसली पाहिजेत . परंतु राजकारण्यांनी मात्र सत्तेच्या मुजोरीवर या घटनात्मकपदांची अवहेलना चालवली आहे . आपल्या पक्षातीलच लोकांची . केवळ सोय न लावता त्या त्या राज्यातील राजकारण 0 सत्ताकारण आपल्या पक्षाच्या हातात राहावे , यासाठी . राज्यपालपदाचा गैरवापर चालवला आहे .महाराष्ट्रातील राज्यपाल कोश्यारी यार्चा एकूणच भूमिका ही । पक्षपाती आणि विशिष्ट हेतूने सोयीची होती हे राज्यातीलच नव्हे तर देशातील नागरिकांना देखील कळून चुकले आहे . मणिपूर , मेघालय , गोवा आणि कर्नाटक राज्यांत देखील राज्यपालांच्या भूमिकांमुळे काय घडले हे सर्वश्रुत आहे . त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ हटवण्यात यावे , असे समितीने म्हटले आहे . त्यामुळे देशाचे संविधान , लोकशाही टिकवायची असेल आणि आमच्या सारख्या सामान्य जनतेचा यावरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर राष्ट्रपती आणि राज्यपाल हे कोणत्याही पक्षाचे नेमु नयेत , ते निष्पक्ष असावेत अशी मागणी मराठी एकीकरण समितीने करत राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतःहुन गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली आहे .

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार फडणवीस सरकारचं भवितव्य; आज होणार सुनावणी

नवी दिल्ली | राज्यातील सत्तेचा तिढा आणखीच गुंतागुंतीचा झालाय. शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधीलाचं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. तर सुप्रिम कोर्टाने राज्यपालांचा आदेश आणि आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करण्याचा आदेश दिलाय. या सगळ्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

सकाळी 10.30 वाजता ही सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय देतं यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद आता कोर्टात पोहोचलाय.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर रविवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याची बाजू मांडतांना कपिल सिब्बल यांनी फडणवीस सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

दरम्यान, जर राज्यात भाजपकडं बहुमत आहे तर त्यांनी ते आजचं सिद्ध करावं. तसेच मध्यरात्री अचानक राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्याचा मुद्दाही सिब्बल यांनी उपस्थित केला.

24 November 2019

राजकीय भूकंप घडवल्यानंतर रात्री उशिरा आपल्या घरी परतले अजित पवार

राजकीय भूकंप घडवल्यानंतर रात्री उशिरा आपल्या घरी परतले अजित पवार 

23 November 2019

शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला थेट एअरपोर्टवरुन पकडून आणलं!

मुंबई | राज्याच्या राजकारणात मोठ्या अनाकलनीय घडामोडी घडत असून आता असाच एक आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एका आमदाराला चक्क एअरपोर्टवरुन पकडून पुन्हा परत आणलं आहे.

संजय बनसोडे असं या राष्ट्रवादीच्या आमदाराचं नाव आहे. ते उदगीर जळकोट मतदारसंघातील आमदार आहेत.राष्ट्रवादीचे काही आमदार विमानतळावरुन महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याचं समोर आलं होतं. त्यांची नावं आणि विमानाची वेळही समोर आली होती. या आमदारांना परत आणण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली होती.

दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय बनसोडे यांना चक्क पकडून आणलं. त्यांना शरद पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या

महाराष्ट्रात जे कांड झालं त्याबाबत बोलण्यासाठी शब्द नाहीत, भाजपला हरवणारच : काँग्रेस

 मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर तिकडे काँग्रेसने स्वतंत्र पत्रकार परिषद (Ahmed Patel Congress  press conference) घेऊन आपली भूमिका मांडली. काँग्रेसचे केंद्रातील नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. काँग्रेस नेते अहमद पटेल (Ahmed Patel Congress  press conference) यांनी भाजपवर सडकून टीका केली.

तुम्हाला माहिती आहे आज सकाळी सकाळी बँड, बाजा, बारात यांच्याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. याची नोंद महाराष्ट्रात काळ्या शाईने नोंदवली जाईल, असं अहमद पटेल म्हणालेराज्यपालांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला आमंत्रण दिलं मात्र, काँग्रेसला संधी दिली नाही. ज्याप्रकारे त्यांनी खातरजमा न करता त्यांनी एका नेत्याने दिलेल्या पाठिंब्याच्या आधारे शपथ दिली. यातून चुकीचं झालं असल्याचं स्पष्ट आहे.

हा प्रकार संविधानाला पायदळी तोडण्याचा प्रकार आहे. आम्ही याचा निषेध करतो. ज्या प्रक्रियेद्वारे व्हायला हवे होते, ते होणे अपेक्षित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. शरद पवार यांच्याशी चर्चा करुन देखील निश्चित केले. काल आम्ही बैठक घेतली, त्या दोन तीन मुद्दे बाकी होते, त्यासाठी आम्ही आज सकाळी भेटून चर्चा करणार होतो. मात्र, त्याआधीच हे कांड झालं. त्याचा जितका निषेध करावा तो कमी आहे.

शरद पवार यांनी ज्या ज्या तारखा दिल्या त्या त्या तारखेला आम्ही आलो आणि बैठकांमध्ये सहभागी झालो. काँग्रेसने अजिबात उशीर केला नाही. आज जे झालं ते राष्ट्रवादीतून काही लोक फुटल्याने झालं.

भाजपचा बहुमत चाचणीत पराभव करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. त्यांना आम्ही पराभूत करु, असं अहमद पटेल म्हणाले.

आम्ही सकाळपासून जे बोललो त्याप्रमाणे सायंकाळच्या बैठकीत संबंधित नेत्यांवर कारवाईचा किंवा दुसरा नेता ठरवण्याचा निर्णय होईल. आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. केवळ दोन गावाकडे आहेत. सर्व आमदार एकजूट असून भाजपला पराभूत करण्यासाठी तयार आहेत. राजकीय आणि कायदेशीर दोन्ही मार्गांनी आम्ही भाजपला उत्तर देऊ. दोन्ही आघाड्यांवर आम्ही काम करु, असंही अहमद पटेल यांनी ठणकावलं.

संविधानाचे जी मूल्ये आहेत त्यावर आम्हाला सहमती घ्यायची होती. त्यावर शिवसेनेने सहमती दिली आहे. त्यामुळे आता आम्ही सोबत आहोत, वेगळं असण्याचा कोणताही प्रश्न शिल्लक नाही.

संजय निरुपम व्यक्ती म्हणून काही मतं व्यक्त करत असतील तर त्यावर मी बोलणार नाही. आम्ही पक्ष म्हणून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जर काँग्रेसला जर कारवाई करण्याची आवश्यकता वाटली तर योग्य वेळी कारवाई केली जाईल, असं अहमद पटेल म्हणाले.

अजित पवारांचा निर्णय पक्षविरोधी; प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही- शरद पवार

मुंबई |  अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणाच्या एकदम विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता अजित पवारांसोबत जाणार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडते आहे. त्या पत्रकार परिषदेला पवार संबोधित आहे.

आम्हाला अजित पवार यांनी मला फोन केला. मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यानंतर तिथे 8 ते 9 आमदार आले. अजित पवारांनी राजभवनावर नेलं. आणि त्यानंतर काही कळण्याच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली, असा सविस्तर वृत्तांत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि संदीप क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितला.संयुक्त पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे हे उपस्थित आहेत.

दरम्यान, अजित पवारांसोबत राजभवनात हजर असलेल्या पण परत आलेल्या आमदारांनी शरद पवारांसोबतच राहण्याचं आश्वासन दिलं आहे.

22 November 2019

एसटीची पहिली स्लीपर बस 'रातराणी' प्रवाशांच्या सेवेत दाखल

मुंबई : एसटीच्या परळ आगारात एसटी महामंडळाकडून शयनयान (स्लीपर) व आसन अशा दोन्ही व्यवस्था असलेल्या एसटी बसेसचे आज लोकर्पण करण्यात आले. एसटीच्या 'रातराणी' बस म्हणून या बसेस धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 40 बसेस राज्यात आता धावणार आहेत.

माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतील ही रातराणी नव्या रुपात आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा तिकीट दरात उपलब्ध आहे. सध्याच्या निम आराम (हिरकणी)बसच्या तिकीट दरात ही रातराणी प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. एकाच बसमध्ये 30 पुषबॅक आरामदायी आसने आणि त्याच्यावर 15 स्पेशियस बर्थ असलेली विनावातानुकुलीत सीटर कम स्लिपर बस एसटीच्या विविधांगी बसेसच्या ताफ्यात आज सामील झाली आहे.

मुंबईतल्या चाकरमान्यांना एसटीच्या रातराणी बससेवेचं एक वेगळंच अप्रूप होतं. विशेषत: कोकणातून मुंबई व मुंबई उपनगरात येणाऱ्या एसटीच्या रातराणी बसेस चाकरमान्यांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या. कालांतराने खासगी बस सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता, तसेच तिकीट दर त्यामुळे हा वर्ग आपसूकच खासगी बस वाहतुकीकडे ओढला गेला.

आज संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 18 हजार रातराणी खासगी बसेस चालतात. सहाजिकच एक मोठा प्रवासी वर्ग एसटीपासून गेल्या दहा वर्षांमध्ये दुरावला आहे. असुरक्षित आणि अनियमित अशा खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळलेला मोठा प्रवासी वर्ग एसटीकडे पुन्हा वळवण्याची एक सुवर्णसंधी महामंडळाला प्राप्त झाली आहे. कारण एसटीने रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाची गरज ओळखून, एकाच गाडीत आसन आणि आरामात झोपण्याची व्यवस्था असणाऱ्या स्लीपर बसेसची निर्मिती केली आहे.

विना वातानुकूलित असलेली ही बस मजबूत अशा माईल्ड स्टीलमध्ये बांधण्यात आली आहे. अशा 200 बसेस एसटीकडून बांधण्यात येत असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 40 बसेस या आठवड्यात राज्यातील विविध मार्गांवर प्रवासी सेवेसाठी रूजू होत आहेत. रात्रीच्या आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची एक वेगळी अनुभूती देणारा प्रयोग सर्वसामान्य प्रवाशांच्या पसंतीला उतरेल, असे महामंडळाला वाटते.
आरामदायी शयन-आसन बसची वैशिष्ट्ये
1. ही बस 12 मीटर लांबीची असून मजबूत अशा माईल्ड स्टील मध्ये बांधण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनामध्ये प्रवाशांना पुरेशी जागा उपलब्ध आहे.
2. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये 30 आरामदायी पुश बॅक आसने व 15 शयन (बर्थ) आहेत.
3. या गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायनॅमिक आकार देण्यात आलेला असून पुढील व मागील शो आकर्षक एफआरपीमध्ये तयार केलेला आहे.
4. पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक बसविलेले आहेत.
5. चालक केबिनमध्ये अनाऊन्सिंग सिस्टीम बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनर हूटर बसविण्यात आलेला असून त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आलेले आहे.
6. पाठीमागील बाजूस एक रिव्हर्सिंग कॅमेरा बसविलेला असून त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात देण्यात आलेली आहे.
7. या बसमध्ये खालील बाजूस बसण्यासाठी आरामदायी पुश बॅक सीट्स देण्यात आलेले आहेत. सदर सीट्स पाठीमागील बाजूस 250 एम एम पर्यंत पुश बॅक देण्यात आलेला आहे.
8. प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा दिलेली असून मोबईल ठेवण्यासाठी पाऊच दिलेला आहे. तसेच मॅगझीन पाऊच व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी ब्रॅकेटची सुविधा देण्यात आली आहे. तसेच पर्स अडकिवण्यासाठी हुक दिलेला आहे.
9. प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग लॅम्प व निळ्या रंगाची नाईट लॅम्प या दोनही सुविधा एकत्र असलेले एलईडी लाईट बसविण्यात आलेले आहेत.
10. प्रत्येक शयन कक्षाला एक कोच फॅन देण्यात आलेला आहे.
11. हवेच्या दाबावर उघडझाप होणारा प्रवासी दरवाजा बसविण्यात आलेला आहे.
12. आपत्कालीन सुटकेसाठी गाडीच्या मागील बाजूस एक संकटकालीन दरवाजा तसेच पुढील उजव्या बाजूला प्रवासी आपत्कालीन खिडकीची सुविधा देण्यात आलेली आहे. आपत्कालीन परिस्थिती मध्ये काचा फोडण्यासाठी पुरेसे हातोडे योग्य ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत.
13. प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे सामान कक्ष तयार करण्यात आलेले आहेत.
14. आगीपासून सुरक्षितता मिळण्यासाठी वाहनामध्ये आग प्रतिबंधक उपकरणे आहेत.
15. पुरेशी हवा व प्रकाश येण्यासाठी वाहनाच्या खिडक्यांचा आकार 1900 मिलीमीटर ठेवण्यात आला आहे.

21 November 2019

अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्कार द्या; शिवसेनेची मागणी

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून शिवसेनाबाहेर पडल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये रोजच शाब्दिक चकमकी झडत आहेत. त्याचे चित्रं हिवाळी अधिवेशनातही पाह्यला मिळत आहे. भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केलेली असतानाच शिवसेनेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी लोकसभेत केली आहे. शिवसेनेने याआधीच सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून वेळोवेळी मागणी केलेली असतानाच शिवसेनेच्या या नव्या मागणीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज लोकसभेत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आज लोकसभेत लावून धरली. आपल्या विपुल साहित्यातून दलितांच्या उत्थानासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना, भारत सरकारचा सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. लोकशाहिरांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्याच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी खासदार शेवाळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले होते. मंगळवारी खासदार शेवाळे यांनी या मागणीचा पुनरुच्चार लोकसभेत केला.
सावरकरांना 'भारतरत्न'साठी शिफारशीची गरज नाही: केंद्र
अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या!
दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी लोकसभेच्या शून्य प्रहरात बोलताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक आणि सामाजिक योगदान अधोरेखित केले. खासदार शेवाळे म्हणाले की, दिवंगत लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे (१९२०-१९६९) यांना देशभरातील जनता अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखते. एका साधारण मातंग कुटुंबात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीतून दलित आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. सुमारे ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, नाटक आणि पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा अण्णाभाऊंनी निर्माण केली. जगभरातील २७ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतरे करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी असणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून दलितांच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. त्यांच्या समाजकार्याचा गौरव करण्यासाठी ऑगस्ट २००२ साली भारतीय टपाल विभागाने, विशेष टपाल तिकीट प्रकाशित केले होते. या थोर समाजसेवकाला 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी गेल्या देशभरातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे, असे शेवाळे यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने नागरिकता दुरुस्ती विधेयकाला विरोध आहे. तसेच अयोध्याप्रकरणाचं कुणी श्रेय घेऊ नये, असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला होता.

20 November 2019

राष्ट्रीय विधी सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत बिलोली येथे भव्य रँली

बिलोली - बिलोली तालुक्यात येथे विधी सेवा समिती , अभियोवत्ता संघ व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त दिनांक १९ / ११ / २०१९ रोजी भव्य आयोजन करण्यात आले . यात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री व्ही . के . मांडे , जिल्हा न्यायाधीश - बिलोली श्रीमंती एस . ए . कुलकर्णी , सह दिवाणी न्यायाधीश , गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला . या रॅली मध्ये विविध शाळेचे विद्यार्थी फलकाचे संदेश देण्यात आले या 
संदेश मध्ये साधता संवाद संपतो वाद , न्याय तुमच्या दारी , आधी विद्यादान मग कन्यादान , पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा , भांडण्यापेक्षा समझोता बरा मिळेल त्यातच आनंद करा , बेटी बचाव बेटी पढाव असे विविध संदेश देण्यात आले . या रॅलीमध्ये बिलोली येथील अनेक शाळेचा समावेश होता त्यामध्ये विद्यानिकेतन प्रा.विद्यालय, सरस्वती विद्यालय , उर्दू विद्यालय , जि . प . हायस्कूल , लिटल फ्लाँँवर , विजय पटने , अंतर भारतीय विद्यालय , विद्या ईत्यादी शाळेचा समावेश होते . या रॅली मध्ये डाँ नागेश लखमावार अधिक्षक ग्रामीण रुग्णालय बिलोली , अँड . रामेकर , कुंडलवाडीकर , सरकारी वकील तळणीकर , कुलकर्णी , देशमुख , येरावार , म्हेजे , देशमुख , बेग , झाडे , व सर्व न्यायालयीन कर्मचारी व शाळेचे शिक्षक , शिक्षिका सहभाग होते .

19 November 2019

*१० नापास झालेल्या या मुलाने ३५ विमान तयार केलेत भाऊ.*

*१० नापास झालेल्या या मुलाने ३५ विमान तयार केलेत भाऊ.*
आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले आहे की, जो जेवढे जास्त मार्क मिळवतो भविष्यात तो तेवढाच जास्त यशस्वी होतो. दहावीच्या मार्क्सबद्दल तर हे खुप मोठ्या प्रमाणावर बोलले जाते. दहावीचे आपल्याकडे किती महत्व आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही मंडळी!! दहावीत नापास होऊनही मोठे अधिकारी, उद्योजक झालेले अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. पण गुजरातच्या एका दहावी नापास तरुणाने चक्क विमान बनवले आहे!!


मंडळी, बडोद्याचा प्रिन्स पांचाल या दहावी नापास तरुणाने 35 अशी विमाने तयार केली आहेत जी रिमोट कंट्रोलने चालवता येतील. हा गडी दहावीत सगळे सहाच्या सहा विषय नापास झाला होता. त्यानंतर तो रिकामाच असल्याने इंटरनेटवर त्याने हळूहळू विमान बनवण्याचे तंत्र शिकून घेतले.
त्याने त्याचे पहिले मॉडेल हे फ्लेक्स आणि बॅनरसाठी वापरण्यात येणारे सामान वापरून तयार केले मंडळी!! प्रिन्सचे यु ट्यूब चॅनल पण आहे. त्या माध्यमातून तो त्याचे प्रयोग सातत्याने लोकांपुढे मांडत असतो. तो सांगतो की एवढे करूनही आजही लोक त्याला दहावी पास झाला नाही म्हणून नावे ठेवतात. पण लोकांना त्याच्या बद्दल माहित झाल्यावर सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे. लोक त्याला ‘तारे जमीन पर’ वाला मुलगा देखील म्हणत आहेत.प्रिन्सचे काम बघून अनेकांनी भारताच्या शिक्षणव्यवस्थेवर टीका केली आहे. अनेक लोक शाळा सोडल्यावर मोठे काम करत आहेत. अशा परिस्थितीत मुलांच्या क्षमतेला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेची गरज अनेकांनी बोलून दाखवली.
प्रिन्सच्या उदाहरणाने हे सिद्ध झाले आहे की परीक्षेत मार्क मिळवण्याच्या स्पर्धेत न पडता खऱ्या अर्थाने आपल्या आतील क्षमता ओळखून ती जपण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे असते.

18 November 2019

सोशल मिडिया वर #मी_भाजप_सोडतोय ट्रेंड

सोशल मिडिया वर #मी_भाजप_सोडतोय ट्रेंड
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून आज तीन हप्त्याच्या वर दिवस होत आले आहेत परंतु अजूनही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा काही केल्या सुटता दिसत नाहीय. महाराष्ट्रातील विधानसभा निकाल लागल्या नंतर भाजप आणि सेना या दोन्ही पक्ष्यान मध्ये मुख्यमंत्री आमचा व्हावा म्हणून रस्सी खेच चालू होती असे असतांनाच त्या दोन्ही पक्ष्यान मधला वाद शांत होण्या ऐवजी वाढला आणि शेवटी शिवसेनेने भाजप ची साथ सोडली आणि राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्ष्यांच्या रागेत जाऊन बसले आणि आता हे तिन्ही पक्ष मिळून महाराष्ट्रात सत्ता देखील स्थापन करणार आहेत.

असे असताना आता भारतीय जनता पार्टी चे काही समर्थक भाजप ची साथ सोडतांना दिसत आहेत असेच निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन हे सोशल मिडिया वर ट्रेंड होते तर आता त्याच प्रमाणे मी भाजप सोडतोय हा ट्रेंड सध्या सर्व सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे बरेच से समर्थक त्यांना भाजप बद्दल काय वाटत आहे ते लिहित आहेत आणि मी भाजप सोडतोय हा टग वापरत आहेत. यावरून भाजप कार्यकर्त्यान मध्ये किती नाराजी आहे ते पाहायला मिळत आहे.सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्ण पणे ढवळून निघाले आहे सध्या महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार कुणाचे नाही यावरून सतत गोंधळ पाहायला मिळत आहेत महाशिवआघाडी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार होते परंतु अचानक त्यांची आजची भेट रद्द करण्यात आली आणि आता पुन्हा महाराष्ट्रात राजकीय गोंधळाची परिस्तिथी निर्माण झाली आहे

17 November 2019

बाळासाहेब ठाकरेंच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आठवणीतले काही खास फोटो…

आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. आपल्या आक्रमक वकृत्त्व शैलीने त्यांनी तब्बल चार दशकं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील दुर्मिळ फोटोज…बाळासाहेब ज्या पद्धतीेने भाषण करायचे ती भाषणशैली संपुर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवायची. अशाच एका भाषणादरम्यानचा बाळासाहेबांचा हा फोटो

बाळासाहेबांचा तरूणपणातील बंदूक हातात घेऊन निशाणा साधतानाचा फोटो

 

बाळासाहेबांचा आपल्या कुटूंबासोबत


राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील घनिष्ट मैत्रीचा प्रत्यय या फोटोतून येत आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

15 November 2019

यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान- संजय राऊत

मुंबई | यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा खूप अनुभव आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांचं कौतुक केलं आहे. ते मुबंईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्र येत असतील तर त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. शरद पवार शेतकऱ्यांसोबतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होईलच, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच फॉर्म्युल्याची चिंता करू नका ते उद्धव ठाकरे ठरवतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

१७ आमदार स्वगृही येणार ! विखे - पाटील काँग्रेसमध्ये परतण्यास तयार !


मुंबई , बुधवार महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडीत भाजपाची चांगलीच अडचण झाली आहे . धक्कादायक माहिती म्हणजे भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी अहमद पटेल यांची भेट घेतली आहे . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशीदेखील चर्चा केली . एकूण १७ आमदारांना घेऊन आम्ही स्वगृही परततो , असा POP )निरोप राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडून आला आहे ! जे नेते भाजपात गेले ते जवळजवळ सर्वच्या सर्व पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये परतण्यास तयार झाले आहेत . फुटीर नेत्यांची बैठक काल संध्याकाळी झाली . जे जे फुटले आणि भाजपात गेले ते ते परत येण्यास तयार झाले आहेत .

बिलोली: येथील साठेनगर मध्ये राहणारे बालाजी ईरबा जेठे यांच निधन

बिलोली: येथील साठेनगर मध्ये राहणारे  बालाजी ईरबा  जेठे   आज दिनांक 15  नोव्हेंबर 2019 रोज शुक्रवार रोजी सकाळी 3:०० वा यांच अल्पशः आजाराने यांच्या राहत्याघरी दुःखद निधन झाले.त्यांचा दोन मुलगा ,एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे . आज सायंकाळी 3:30 वाजता बिलोली - बोधन या मार्गावरील  लघूळ रोडवरील समशान भुमित अत्यविथी होणार आहे .

मुंबई एअरपोर्टवरची शेवटची ठरली गायिका गीता माळीची FB पोस्ट, अपघातात दुदैर्वी मृत्यू

मुंबई 14 नोव्हेंबर : मुंबई विमानतळवरून नाशिककडे परतत असताना प्रसिद्ध गायिका गीता माळी यांच्या कारला अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती गंभीर जखमी जखमी आहेत. अमेरिकेतील एक कार्यक्रम आटोपून त्या आल्या होत्या. त्यानंतर त्या पतीसमवेत नाशिकला आपल्या घरी जायला निघाल्या. त्यांची कार जेव्हा मुबंई-नाशिक महामार्गावर लाहे गावाजवळ आली तेव्हा पेट्रोल पंपाजवळ गाडीला भीषण  अपघात झाला. विजय हे गाडी चालवत होते.त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांची कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरवर जावून आदळली. कारची गॅसच्या टँकरला जोरदार धडक बसल्याने गीता माळी यांचा जागीच मृत्यू झाला.
गेली दोन महिने त्या अमेरिकेत कार्यक्रम करत होत्या. तो यशस्वी दौरा आटोपून त्या मायदेशी परतल्या होत्या मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांनी अतिशय भावूक पोस्ट फेसबुकवर केली होती. #जननी_जन्मभूमी_स्वर्ग_से_महान_है, Very Happy To Black Home long time असं लिहित त्यांनी अपघाताच्या 8 तास आधी फेसबुकवर फोटोसह पोस्ट टाकली होती. ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली.