जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

29 September 2020

आरळी येथील युवकाचा लघुळ येथे वीज पडून मृत्यू

बिलोली: तालुक्यातील मौजे आरळी येथील शादुल शेख वय (16)हा मौजे लघुळ येथे आपल्या आजुळी गेला असता आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट व मेघ गरजेनेसह पाऊस आला व यात या युवकावर विज पडल्याने तो जागीच शेतामध्ये मृत्यू मुखी पडला सदरील युवकाचे वडील व भावाचा आरळी येथील ओड्यात आलेल्या पुरात वाहुन मृत्यू झाला होता.या कुटुंबात आई वडील दोन भाऊ असा परिवार होता यात आधी वडील व भाऊ आणि आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी समीर याचा मृत्यू झाल्याने आई पोरकी झाल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.सदरील युवक 16 वर्षाचा असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे

28 September 2020

आमदार अंतापूरकर पोहोचले मंत्रालयात नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मंत्र्यांकडे केली मागणी

बिलोली:जनतेच्या प्रश्नांची व शेतकऱ्यांच्या दुःखाची जाण असलेले देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर हे थेट मुंबईला मंत्रालयात पोहोचले.
देगलुर- बिलोली मतदारसंघात अतिवृष्टी होऊन नदी नाल्यांना पूर आल्याने हाता तोंडाशी आलेली शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे जमीन खरडून गेली आहे, घरात पाणी शिरल्याने घरांचे व घरातील अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री रावसाहेब अंतापूरकर साहेब यांनी 
मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र राज्याचे माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नामदार श्री अशोकराव चव्हाण साहेब व महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.श्री विजयजी वङेटीवार साहेब यांना भेटुन तालुक्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली ओला दुष्काळ जाहीर करा अशी विनंती केली.व निवेदन दिले.

19 September 2020

सात जणांचा मृत्यू तर 34 जणांची प्रकृती चिंताजनक

नांदेड :जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 332 झाली आहे , सात जणांचा कोटोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.तट 34 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत . शनिवार दि .19 रोजी 1 हजार 443 जणांची चाचणी करण्यात आली , यात हजार 70 जणांची चाचणी निगेटिव्ह आली . तसेच 332 जणांचा अहवाल कोटोना पॉझिटिव्ह आला आहे . यात आरटी - पीसीआर 18 व अँटीजन मध्ये 214 जणांचा समावेश आहे . 13 हजार 316 झाली आहे.यातील 297 बाधितांना सुट्टी देण्यात आल्याने एकूण कोटोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 54 झाली आहे , सध्या 3 हजार 845 झाली , तर 34 जणांची प्रकृती गंभीर आहे . सात जणांचा मृत्यू किनवट तालुक्यातील बोधडी खु येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि .18 रोजी मृत्यू झाला , बिलोली   तालुक्यातील सगटोली येथील 60 वर्षीय पुरुषाचा दि .18 रोजी , बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील 70 वर्षीय महिलेचा दि .18 टोजी , नायगाव तालुक्यातील लालवनडी 66 वर्षीय पुरुषाचा दि .18 टोजी , नांदेड येथील शाहू नगर येथील 46 वर्षीय पुरुषाचा दि .18 टोजी , पीपलगाव येथील 80 वर्षीय महिलेचा दि .19 टोजी , दत्त नगर येथील 80 वर्षीय पुरुषाचा दि .19 टोजी मृत्यू झाला . आतापर्यंत कोटोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 350 झाली आहे . 

पुराचा धोका : विष्णुपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडून ८४ हजार ५४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग ; गोदाकाठच्या ३३७ गावांना सतर्कतेचा इशारा .. !

 नांदेड| गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे . त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत असताना नांदेड मधील विष्णुपूरी धरणाचे सहा दरवाजे उघडून ८४ हजार ५४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे . त्यामुळे गोदाकाठच्या ३३७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . याच पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन त्यांनी याबाबत आढावा घेतला आहे . आपात्कालीन यंत्रणा सज्ज नांदेड जिल्ह्यात नांदेड शहरासह मुदखेड , धर्माबाद या तालुक्यातून गोदावरी नदी वाहते . याशिवाय बिलोली आणि नायगाव तालुक्यातील काही गाव प्रभावित होऊ शकतात . तसेच गोदावरी नदीकाठच्या जवळपास ३३७ गावांना अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . याकरता आपात्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून नदीकाठी तसेच शहरातील नदी घाटावर जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहेत . सध्या जायकवाडी , माजलगाव , मासोळी मध्यम प्रकल्प आणि सिद्धेश्वर या धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु आहे .पाऊस झाला तर पूरपरिस्थिती निर्माण होईल सध्या तरी नांदेडमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे . पण , गोदावरीत विसर्ग वाढला आणि मोठा पाऊस झाला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे . दरम्यान , रात्रीपर्यंत हा विसर्ग १ लाख ४८ हजार क्युसेकपर्यंत वाढेल तितक्याच वेगाने विष्णुपुरीतून विसर्ग केला जाईल . पण , पुढे तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण देखील १०० टक्के भरले आहे . त्यातूनही विसर्ग सुरु आहे . पोचमपाडच्या बॅकवॉटरचा सर्वाधिक धोका नांदेड जिल्ह्याला बसणार आहे . 

17 September 2020

कुंडलवाडीत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

कुंडलवाडी :येथील नगरपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेच्या माध्यमातून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात 17 ते 21 सब्टेम्बर दरम्यान स्वंयस्फूर्त जनता कप ! पाळण्यात येत आहे , या कप ! ला पहिल्या दिवशी व्यापाऱ्यानी चांगला प्रतिसाद दिला आहे .... कुंडलवाडी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे.गेल्या एक महिन्यापासून कुंडलवाडी शहरात 70 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर 3 रुग्णाचा मृत्यु झाला आहे.तसेच परिसरातील गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत , हि वाढत चाललेली कोरोना रुग्णाची साखळी तोडण्यासाठी नगरपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेच्या माध्यमातून 17 ते 21 सब्टेम्बर दरम्यान पाच दिवसाचा स्वंयस्फुर्त जनता कप ! पाळण्यात येत असून , पहिल्या दिवशी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन जनता कप'ला प्रतिसाद दिला आहे तर एकीकडे ज्या नागरिकांसाठी जनता कयूं लागु करण्यात आली त्याच नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्यासारखे शहरात ना शारीरिक आंतर आहे , ना कुठल्याही मास्कचा वापर आहे कुठले ही काम नसताना विनाकारण शहरात फिरताना दिसत आहेत.याबाबीकडे नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे , अन्यथा कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला अपयश येईल हे मात्र निश्चित आहे

13 September 2020

नीटसाठी भारत सरकारच्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने जारी केल्या मार्गदर्शक सूचना कोविड -19 पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना दिलासा

 नांदेड: - आज रविवार 13 सप्टेंबर रोजी सर्वत्र होणाऱ्या नीट NEET ( UG ) 2020 च्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संघटन असलेल्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत . यात कोविड -19 पॉझिटिव्ह ( बाधित ) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच अटी व शर्तीनुसार स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल , असे म्हटले आहे . याबाबत दिनांक 11 सप्टेंबर रोजी नीटच्या सल्लागार समितीची बैठक होऊन त्यात कोविड -19 प्रादुर्भाव लक्षात घेता नीटच्या परीक्षा सुरक्षित कशा होतील याबाबत सविस्तर चर्चा झाली . जे विद्यार्थी कोविड -19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यावर विचारविमर्श करण्यात आला . नीट परीक्षेबाबत जी प्रमाणीत कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेवर अधिक भर देण्यात आला आहे . त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राला मास्क , हँडग्लोज ( हातमोजे ) , 50 एमएल पर्यंत सॅनिटायजरची लहान बॉटल , परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना किमान 6 फुटाचे एकमेकांपासून सुरक्षित अंतर स्वत : ची पारदर्शक पाण्याची बॉटल हे आरोग्याच्यादृष्टिने आवश्यक असलेले साहित्य घेण्याबाबत सुचविले आहे . याबाबत वेळोवेळी नीटच्या संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे .ज्या विद्यार्थ्यांना कोविड -19 ची बाधा झालेली आहे अथवा जे विद्यार्थी कोविड -1 -19 बाधित आहेत अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर स्वत : च्या व इतरांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे . संबंधित पालकांनीसुद्धा याबाबत योग्य ती खबरदारी घेत नॅशनल टेस्टींग एजन्सी यांनी सूचविल्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्राच्या छायाप्रतीसह कोविड -19 बाधित असल्याचा रिपोर्ट / सक्षम प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र घेऊन ते नीटच्या संकेतस्थळावर ईमेल करणे बंधनकारक आहे . याबाबत स्वतंत्र तारिख नंतर कळविण्यात येणार आहे . सदर ईमेल हा ncov19 @ nta . ac.in या ईमेल आयडीवर पाठवावा , नॅशनल टेस्टींग एजन्सीचे महासंचालक डॉ . विनीत जोशी यांनी केले आहे .

09 September 2020

नांदेडच्या कारागृहात ८१ कैद्यांना कोरोना लागण

नांदेड :जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच जिल्हा कारागृहातील तब्बल ८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली असून , कारागृह अधीक्षकांनी यास दुजोरा दिला . नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असून , शासकीय व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत.अशातच नांदेडच्या जिल्हा कारागृहात अॅन्टीजेन तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्हा कारागृहात तब्बल ८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे या तपासणीत पुढे आले आहे.यामुळे कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . दोन दिवसापासून ही तपासणी जिल्हा कारागृहात सुरु होती . त्याचा एकत्रित अहवाल आज समोर आला . त्यात ८० कैदी आणि एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले . या सर्व कैद्यांचे कारागृहातच विलगीकरण कक्षात उपचार सुरु असून , कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी यास दुजोरा दिला आहे . कारागृहात २ ९ १ कैदी असून , त्यांना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे . तर कोरोनाबाधीत कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे चांदणे यांनी सांगितले . 

03 September 2020

दहावी नंतर शासकीय सुविधांचा लाभ घेत पॉलिटेक्निकचा राजमार्ग निवडा - प्राचार्य डॉ जी व्हि . गर्जे

 नांदेड : - येत्या पाच वर्षात राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्यांना तांत्रिक ज्ञानाने कुशल तंत्रज्ञांची चणचण भासणार हे निश्चित . त्यामुळे भविष्याची चाहूल ओळखत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आजच पॉलिटेक्निकचे विविध पर्याय जसे मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , कॉम्पुटर , सिव्हिल , मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , प्रॉडक्शन , इलेक्ट्रॉनिक्स , डी.एम.एल.टी इत्यादी निवडून उज्वल भविष्याची सुरुवात करावी , असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य डॉ . जी . व्ही . गर्जे यांनी केले आहे . टाळेबंदीच्या काळात सुद्धा एच.सी.एल टेक्नॉलॉजी , आय . एस.टी.सी , बजाज प्रा.ली. , एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी , टाटा इंजिनीरिंग , जॉन डिअर , लोकेश मशीन , व्हेरॉक इंजिनीअरिंग , अदाणी इलेक्ट्रिकल्स , फोर्ब्स मार्शल , महिंद्रा अँड महिंद्रा , सुरोज बिल्डकॉम , फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स , व्हर्लपूल , अश्या अनेक कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची मागणी होते आहे . ह्या कंपन्या विद्यार्थ्यांना ऑन - रोल देखील घेण्यास तयार आहेत . पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेता येतो तोही कुठल्याही प्रवेश परिक्षेशिवाय . दहावी नंतर आय.टी. आय मध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी तांत्रिक क्षेत्रात कनिष्ठ पातळीवर कामासाठी निवडला जाईल . तर पॉलिटेक्निक पदविका प्राप्त विद्यार्थी सुपरवायझरी लेव्हलवर निवडले जातात . त्यामुळे आय.टी.आय. प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसाठी देखील ऑनलाईन नोंदणी करायला हरकत नाही असेही ते म्हणाले . यातच मागासवर्गीय होतकरु विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी अनेक शासकीय योजना शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत . एस सी व एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात प्रवेश मिळतो , डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा विद्यार्थ्यांना निवास व भोजनासाठी फायदा घेता येतो . खुल्या प्रवर्गासाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत निवास व भोजनासाठी शिष्यवृत्ती मिळते . तसेच वार्षिक 6 लक्ष उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना इ बी सी सवलतीचा फायदा मिळतो . व्हीजेएनटी , एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी निवास व भोजनासाठी दरवर्षी आर्थिक मदत शासनातर्फे मिळते . अल्पसंख्यांक अर्थात मुस्लिम , जैन , बौद्ध , पारशी , शीख आदी विद्यार्थ्यांना अधिकतम 25 हजार रुपये पर्यंतचे शिक्षण शुल्क माफ केले जाते . या शिवाय आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या होतकरु हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे ट्युशन फीस वेवर स्कीम अंतर्गत प्रवेश देऊन या विद्यार्थ्यांची सर्व शिक्षण शुल्क शासनातर्फे दिले जाते . ह्या योजनेचा फायदा घेण्यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाचे अट असते . या सर्व आर्थिक सोई - सुविधांचा लाभ घेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी 4 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन नोंदणी नजीकच्या सुविधा केंद्रात जाऊन करणे किंवा घरुनच आपल्या मोबाईलवरुन करणे बंधनकारक आहे . कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये तांत्रिक शिक्षणाचा वाटा मोठा आहे त्यामुळे इतर पारंपारिक शिक्षणापेक्षा पॉलिटेक्निकच्या तांत्रिक शिक्षणाचा राजमार्ग निवडणे ही नक्कीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरेल . त्यामुळे तंत्रशिक्षण पदविकेची निवड करत उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी पहिले पाऊल टाकावे असे आवाहन प्राचार्य , डॉ . जी . व्ही . गर्जे यांनी केले आहे . 

ना.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत डॉ . शेंगुलवार स्वगृही परतले

बिलोली -तालुक्यातील कुंडवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ.सायन्ना शेंगुलवार आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाला जय श्री राम करत राज्याचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत . विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ.अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा आज येथे संपन्न झाला . डॉ . सायन्ना शेंगुलवार यांची कुंडलवाडी शहर व परिसरावर मोठी पकड आहे . एक जनाधार असलेला उच्च विद्याविभुषित राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख आहे . काँग्रेस पक्षात असतांना त्यांनी कुंडलवाडीचे नगराध्यक्षपद भुषविले होते . दरम्यानच्या काळात का स्थानिक कारणामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता . परंतु भाजपासारख्या धर्मांध व जातंध पक्षात ते फार काळ रमले नाहीत . जिल्ह्याच्या विकासाचे काहीही देणे घेणे नसलेल्या व भरकटलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी शहराचा विकास होऊ शकत नाही . याची त्यांना दरम्यानच्या काळात खात्री पटली . त्यामुळे त्यांनी भाजपाला अखेरचा जय श्री राम केला व काँग्रेस पक्षात प्रवेश केला . विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला . यावेळी बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर ,मनपाचे सभागृह नेते सरदार विरेंदसिंघ गाडीवाले , नगरसेवक विजय येवनकर , मजुर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे , कुंडलवाडी चे नगरसेवक शेख मुख्त्यार , माजी नगरसेवक राजु पोतनकर , शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर भीम पोतनकर आदिंची उपस्थिती होती . 

01 September 2020

महाराजांच्या विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच त्यांना श्रद्धांजली - पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड दि . 1 : - “ वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली . आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले . लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला वास्तवाशी आणि सत्याच्या जवळ जाणारे त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले . सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दिप आता मालवला आहे " या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . नांदेड येथील डॉ . व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते . काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी हॉस्पिाटला भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली होती . राष्ट्रसंत डॉ . शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या देहावसानामुळे सर्व भक्तांवर दु : खाचा डोंगर कोसळला आहे . या दु : खाला सावरुन त्यांनी आयुष्यभर आपल्या कृतीतून दिलेला विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या

संकलन केंद्रावर गणेश मुर्ती सुपूर्द करण्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

 नांदेड दि .  : - गेली सहा महिने कोरोनाच्या अदृश्य प्रादुर्भावाशी लढत जनतेने आयुष्यभर जपलेल्या गणेशोत्सव , मोहरम - ताजिया , बुद्धपौर्णिमा , बकरी ईद सारखे सण उत्सव अतिशय संयमाने भक्ती भावाला जपत पार पाडले आहेत . जो विवेक जिल्ह्यातील जनतेने दाखविला आहे त्याच विवेकाच्या बळावर काळजी घेत दहा दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देवू यात . सद्य परिस्थिती आव्हानात्मक असून कोविड -19 ची लस उपलब्ध होईपर्यंत सर्वजण अधिक कर्तव्य दक्षता बाळगतील असा विश्वास पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला . अनंत चतुर्थी निमित्त घरोघरी बसलेल्या गणपती बाप्पाला निरोप देतांना जिल्हा प्रशासनाला योग्य ती खबदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत . महानगरपालिकेच्या अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षितरित्या आपल्या लाडक्या बाप्पाचे भक्तीभावपूर्ण विसर्जन करता यावे यासाठी स्वतंत्र केंद्राचीही निर्मिती केली आहे . या संकलन केंद्रावर जनतेने गणेश मुर्ती सुपूर्द कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले . आपल्या सर्वांच्या संयमी वागण्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येईल . ज्या पद्धतीने गेली सहा महिने जिल्ह्यातील जनता शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करत आहेत त्याला तोड नसल्याचेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले . यावर्षी सर्वदूर सर्वत्र चांगला पाऊस असल्यामुळे गोदावरी नदीही दुथडी भरुन वाहते आहे . तेथील पाण्याला प्रवाह आलेला आहे . सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करुन जे नियोजन केले आहे त्याला सर्व जनता भक्ती भावाने साथ देईल याची खात्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .