जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

28 February 2020

सोनखेड बालिका अत्याचार प्रकरणातील नराधम अखेर पोलिसांच्या जाळ्यात

  # नांदेड 27 फेब्रु । लोहा तालुक्यातील सोनखेड येथील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणा ? या नराधमास पोलिसांनी अखेर अटक केली आहे सोनखेड येथील पाच वर्षे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गेल्या दोन दिवसापूर्वी उघड झाली या घटनेनंतर पुन्हा एकदा जिल्हा हादरला . महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसल्याचे समोर आले असून सोनखेड येथील अत्याचारी नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन पुकारण्यात आले होते . या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ग्रामीण चे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनखेड पोलिसांच्या माध्यमातून नराधम सुग्रीव उर्फ बाबुराव भुजंगराव मोरे ( वय 28 वर्षे राहणार महादेव गल्ली सोनखेड ) याच्या मुसक्या आवळल्या बालिकेच्या शोषण करणा ? या नराधमास । फासावर लटकवा अशी मागणी करण्यात आली आहे . या अत्याचाराच्या घटनेविरुद्ध गेल्या दोन दिवसापासून सोनखेड ची बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती तर नांदेड शहरातील सिडको - हडको परिसरातही आज बंद पुकारण्यात आला होता .

27 February 2020

नांदेडमध्ये डॉ.शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीच्या 16 वर्षानिमित्त संगीत शंकर दरबाराचे आयोजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन .

नांदेड दि . 26फेबु : - येथील यशवंत महाविद्यालय येथे डॉ . शंकरराव चव्हाण जन्मशताब्दीच्या 16 वर्षानिमित्त संगीत शंकर दरबार आयोजित कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते . _ _ _ पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की , यंदाचे वर्षे हे डॉ . शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्षे म्हणून साजरे केले जात आहे . आज डॉ . शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे तर उद्या कुसूमताई चव्हाण यांची पुण्यतिथी आहे . त्यांचा जन्म दिवस 14 जुलैला मानला जातो . शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती पित्यर्थ विविध कार्यक्रम होत आहेत . देशासह राज्यातील अनेक कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी निमंत्रित केले जाते . यातून कलाकारांच्या कलेला दाद देण्याचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे . या कार्यक्रमाला सर्वांचे योगदान व सहकार्य मिळाले असून 16 व्या वर्षात आज पदार्पण झाले आहे . देशात व राज्यात डॉ शंकरराव चव्हाण यांचा नेहमीच गौरव झालेला आहे . त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी नांदेडकरांनी दिलेली आहे . त्यांच्या आठवणी आजही सर्वांच्या मनात कायम आहेत . डॉ . शंकरराव चव्हाण नसल्याची मनात नेहमी खंत असून त्यांना आवडणारे शास्त्रीय संगीतातील असलेली आवड ही या कार्यक्रमाचे त्यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजन केले जात आहे . डॉ . शंकरराव चव्हाण यांचे देशाचे गृहमंत्री व दोनदा राज्याचे मुख्यमंत्री पदासह विविध पदे भुषविले आहेत . राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात डॉ . शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीपित्यर्थ स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ग्रंथालय , वसतिगृह असलेले सुसज्ज संकुल सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत . डॉ . शंकरराव चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी कै . राजारामबापू पाटील , डॉ . रफीक झकेरिया , यशंवतराव मोहिते या सर्वांचे जन्मशताब्दी वर्षेही यावर्षी साजरी होत आहेत . मुंबई येथे 11 मार्च रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधान भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमास सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी पालकमंत्री श्री चव्हाण यांनी केले . डॉ . शंकरराव चव्हाण साहेबांना ज्या - ज्या गोष्टी आवडत होत्या त्याची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यात मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न तरुणांसाठी शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न राहतील . राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर , महापौर दिक्षाताई धबाले , आमदार अमर राजूरकर आमदार माधवराव पाटील जवळगावकर आमदार मोहन हंबर्डे , उपमहापौर सतीश देशमुख , माजी राज्यमंत्री डी . पी . सावंत , माजी आमदार माजी आमदार वसंत चव्हाण , जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर , पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर , श्रेयजा चव्हाण सुजया चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती . सुरुवातील श्रद्धेय डॉ शंकरराव चव्हाण व सौ कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्धाटन करण्यात आले . परभणी येथील नलिनी देशपांडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . तर सुंदरी वादन कपिल जाधव व त्यांचा संच तर वीणा वादन करताना डॉ जयंती कुमारेश यांनी केले . शेवटी पालकमंत्री श्री चव्हाण यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करुन आभार मानले . यावेळी संगीत क्षेत्रासह विविध मान्यवर , शारदा भवन शिक्षण संस्थेचे पदाधिकारी , संगीत क्षेत्रात ज्यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त नलिनताई देशपांडे , अनुराधाताई पाल , विविध कलावंत राज्यातील विविध भागातून आलेले विविध मान्यवर आणि कला रसिक उपस्थित होते .

26 February 2020

सोनखेड मध्ये पुन्हा एका चिमुकलीवर अत्याचार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल पीडितेवर उपचार सुरू

 # नांदेड 26फेबु । पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी पुन्हा एक घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथे घडली आहे . एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला असन या प्रकरणातील अज्ञात आरोपी फरार आहे . आरोपीविरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असन आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली . लोहा तालुक्यातील सोनखेड येथील एका पाच वर्षीय चिमुकलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून तिचे आफरण केले सदर मुलगी घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी सोनखेड पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली होती . सोनखेड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीला शोधून काढण्याचे प्रयत्न केले . चिमुकलीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले मात्र तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगण्यात आले चिमुकलीचं अपहरण करणारा तो अज्ञात आरोपी कोण याची माहिती पोलीस काढत असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली पीडित चिमुकलीवर सध्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे . दरम्यान या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्या मुसक्या तात्काळ आवळा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे .

22 February 2020

भल्या पहाटे रेतीने भरलेल्या टिपरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

 नरसीफाटा | रेतीने भरलेल्या टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिली . यात दुचाकीवरी शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला . सदरील घटना दि . 22 फेब्रुवार रोजी शनिवारी सकाळी 7 : वाजताच्या सुमारास नायगाव तालुक्यातील ईकळीमाळजवळील शिवारात घडीला . अपघात एवढा भिषण होता की रेती भरुन आलेला टिपर इतके भरधाव वेगाने होते की मोटरसायकल वरील शाळकरी विद्यार्थ्यांना जवळपास चाळीस फुट कडसडत पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु मोटरसायकल टिपरच्या दोन्ही चाकात अडकल्याने पळून जाता आले व यात शाळकरी विद्यार्थ्यांचे अक्षरशः आतडे बाहेर पडल्यामुळे सुरजचा जागीच मृत्यू झाला . ईकळीमाळ ता . नायगाव येथील आजोबा आणि नातु हे दोघेजण एम . एच . 12 इ . सी . 8501 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन आपल्या शेताकडे पाखरं हाकारण्यासाठी जात असताना पाठीमागुन रेती भरुन भरधाव वेगाने येणारा टिपर क्रमांक एमएच 04 इ . एल 9666 हा ओहरटेक करीत असताना मोटरसायकल वर जोराने धडकला या भिषण अपघातात मोटरसायकलवरील सुरज राजाराम बोडके रा . एकलारा ता मुखेड ह्या शाळकरी विद्यार्थ्यांला टिपरने चाळीस फुट खडसड नेल्याने पोटातील आतडे बाहेर पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला . या अपघातात आजोबा नागोराव खंडु सुर्यवंशी रा . ईकळीमाळ ता . नायगाव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कुंटुर येथे उपचार सुरू आहेत .या अपघातानंतर टिपर चालक फरार झाला असून सदरील टिपर मालकावर बड्यांचा आशिर्वाद असल्यामुळे अशा प्रकरण घडत राहतात त्यांची भिती वाटत नाही अशी चर्चा सुरू आहे . या घटनेची माहिती होताच कुंटुर पोलीसांनी घटनास्थळी जावुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु नातेवाईकांनी त्यांना न जुमानता टिपर मालक व ड्रायव्हरला जो पर्यंत अटक करणार नाही तो पर्यंत युवकाचे मृतदेह जागेवरून उचलु देणार नाही असे म्हणत तब्बल सात तास युवकाचा मृतदेह जागेवरून उचलु दिले नाही . नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन नातेवाईकांना समज घातले परंतु नातेवाईक त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते . कुंटुर परिसरातील बळेगाव , धनंज , मेळगाव , हुससा , राहेर अदि गावातील रेती व मातीचे रात्रन दिवस अवैद्य मार्गाने यवसाय जोरदार सुरू आहे . रात्रभर दिवसभर रेतीने भरलेले टिपर हायवा भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत . सदरील रेती वाहतूक टिपरचा कुंटुर सर्कलच्या गावातील नागरिकांना मोठ्या त्रासदायक ठरू लागला आहे . उमरी तालुक्यातुन दररोज पहाटे रेतीने भरलेली टिपर भरधाव वेगाने ईकळीमाळ मार्गे जात असताना कुंटुर पोलिस व महसूलचे मंडळ अधिकारी व तलाठी बघ्याची भुमिका घेतआहेत . सदरील रिती माफीयाला भल्या पहाटेची रॅयलटिची परवानगी आहे का नाही हे पाहण्यासाठी एकही महसूलचा आधिकारी राहातं नाही यांना आशिर्वाद कोणाचा ? 

21 February 2020

एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव :- प्रणिती शिंदे*

सोलापूर|भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा भाजप सरकार प्रयत्नात आहे. पण काँग्रेस पक्ष भाजपचा हा कुटील डाव हाणून पाडेल आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी भाजप सरकारविरोधात तीव्र लढा उभारेल असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे.

 सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर सुशीलाताई आबुटे, अलकाताई राठोड, नलिनीताई चंदेले, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, हाजी तौफीक हत्तुरे, भटक्या विमुक्त प्रदेशचे मछिंद्र भोसले, प्र. सरचिटणीस नितीन शिवशरण, मागासवर्गीय जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, NK क्षीरसागर, उमेश सूरते, महिला जिल्हा अध्यक्ष शाहीन शेख, भटक्या विमुक्त जिल्हा अध्यक्ष सुरेश राठोड, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेविका वैष्णवी करगुळे, परवीन इनामदार, पंढरपुर महिला अध्यक्ष आशा बागल, मागासवर्गीय महिला जिल्हा अध्यक्ष संध्या काळे, शहर महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, दक्षिण तालुका अध्यक्ष हरीष पाटील, उ तालुका अध्यक्ष सिद्राम सलवदे, जि. प. सदस्य संजय गायकवाड़, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, शहर युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, VJNT शहर अध्यक्ष भारत जाधव, नागेश गंगेकर, VJNT युवक अध्यक्ष युवराज जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रातील भाजप सरकारच्या आरक्षण विरोधी धोरण व NRC, CAA कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलन करण्यात केले.

 
यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, उत्तराखंडमधील भाजप सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांनी मिळून SC, ST, OBC, VJNT, SBC, दलित मावासवर्गीयांना संविधानाने दिलेला आरक्षणाचा मुलभूत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. SC, ST, OBC, VJNT, SBC, दलित मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण देणे ही सरकारची सांविधानिक जबाबदारी नाही असे उत्तराखंड भाजप सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले होते. दुर्दैवाने सुप्रिम कोर्टाने हा युक्तीवाद ग्राह्य धरून सरकारी नोकरीत आरक्षण द्यायचे की नाही, हे सरकारवर अवलंबून आहे असे म्हटले. हा प्रकार  आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणून सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल दलित, मुस्लिम, मागासवर्गीय, SC, ST, OBC, VJNT, SBC यांच्या विरोधात भाजप ने षड़यंत्र सुरु केले असून याच्या विरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे आहे. काल परवा जामिया, JNU मध्ये घुसले, उदया सोलापूर विद्यापीठात घुसतील आणि परवा आपल्या घरात घुसतील. या भाजपवाल्यांना वाटते की जात, पात, धर्म करुन NRC, CAA, मंदिर मस्जिद सारखे विषय आणून निवडणुका जिंकता येतील हा त्यांच्या गैरसमज आहे तसे झाले असते तर दिल्लीत भाजपचा नामुष्कीचा पराभव झाला नसता. भारताची संस्कृती ही जात धर्म पंथात विभागले जाणारे नाही अश्या पद्धतीला या प्रकारच्या आंदोलोलनातून विरोध करायला पाहिजे. भारताची संस्कृती ही वसुदैव कुटुंबकम ची आहे. आम्ही सर्वांना स्वीकारतो, हिंदु, मुस्लिम, दलित, नंतर आहोत प्रथम आम्ही सर्वजण भारतीय आहोत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्हाला अधिकार आहेत हे तुम्ही विसरु नका. आम्ही सगळे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो, लढत राहणार, या देशामध्ये एकीकडे मंदिरात आरती, मस्जिद मध्ये सजदा, गुरुद्वारामध्ये पठन, चर्चमध्ये प्रार्थना होतो असा जगात कोणताही देश नाही आपण अनेक वर्ष एकत्र राहतो, सण साजरा करतो हे भाजपवाले आपणास तोड़ू पाहतात पण हे शक्य होणार नाही आज मी आमदार म्हणून नाही तुमची एक बहिण, तुमची एक मुलगी म्हणून रस्त्यावर उतरली आहे असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाले.

यावेळी भीमप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने विजुदा नागमोड़े यांनी या आंदोलनास जाहिर पाठिम्बा जाहिर केला.

यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर सुशीलाताई आबुटे, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, गौरव खरात, केशव इंगळे, NK क्षीरसागर, मछिंद्र भोसले, शाहीन शेख, संजय गायकवाड़, उमेश सूरते, संध्या काळे, प्रमिला तुपलवंडे, नागनाथ कदम, आश्विनी जाधव, चंद्रकांत सुर्वे, मीरा घटकांबळे, अप्पासाहेब बगले, पांडुरंग चौधरी, आशा बागल,गंगाधर शिंदे, आदिनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, तर आभार शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी व्यक्त केले.

यावेळी मनीष गडदे, सुरेश पाटोळे, लखन गायकवाड़, सायमन गट्टू, हाजिमलंग नदाफ, भोजराज पवार, अंबादास गुत्तिकोंडा, अरुण साठे, हारून शेख, मैनुद्दीन शेख, सुमन जाधव, रजाक कादरी, रियाज नाइकवाडी, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, मोतीराम राठोड, समीर कोळी, राजू गायकवाड़, उमाकांत येरवाड़े, आझम सैफन, अनुपम शहा, शिल्पा चांदणे, अरुणा वर्मा, अरविंद भांडेकर, वीणा देवकते, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, किरण नंदूरकर, चक्रपाणी गज्जम, परशुराम सतारेवाले, चंद्रकांत कोंडगुळे, हसीब नदाफ, झुलेखा विजापुरे, रविप्रभा लोंढे, राजेश झंपले, लतीफ मल्लाबादकर, करिमूनिस्सा बागवान, कोंडनताई काकड़े, मुस्ताक लालकोट, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, लता गुंडला, मशाक वळसंगकर, रंजना इरकर, मुमताज शेख, अजय गंगेकर, संजय गायकवाड़, राजाभाऊ सलगर, रतन डोळसे, मुस्कान शेख, मोनिका सरकार, सुभाष वाघमारे, आकाश राठोड, विनोद रनसुरे, तुकाराम देवकुळे, सूर्यकांत शेरखाने, गीता राऊत, श्रीकांत दासरी, अनिल वाघमारे, लक्ष्मी दुपारगुडे, चंद्रकांत टिक्के, सलीमा शेख, यांच्यासह नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

20 February 2020

शिवजयंतीदिनी तीने घेतला किल्ले हडसर वर शेवटचा श्वास

 _ _  शिवजयंती सगळीकडे उत्साहात साजरी होत होती तर नियती कु . सिध्दी सुनील कामठे या २० वर्षीय तरूणीशी काही वेगळाच खेळ खेळत होती . तीला हे ठाऊकच नव्हते की तीची ही शेवटची शिवजयंती असेल . सिध्दि एस वाय ची विद्यार्थिनी असून किल्ले हडसर वर सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन तर्फे स्वछता अभियान राबवून शिवजयंती साजरी करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या ३४ सदस्यांबरोबर चिंचपोकळी मुंबई येथून आली होती . सकाळी ९ वा . किल्ले हडसरच्या खिळ्याच्या वाटेने किल्ले हडसर वर स्वच्छता करत पोहचायचे हा त्यांचा मानस होता . अनेक ट्रेकचा अनुभव असलेली सिध्दी हातात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा घेऊन लिड करत होती . सोबतीला पल्लवी होती . एक एक करत ती पल्लवी सोबत खिळ्याची वाट चढूत होते . खिळ्याची चढाई करून आता ती तटबंदीची भिंत ओलांडणार होती . हातात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा असलेला भगवा स्वत : कडे ठेवत प्रतीमेला पुजन करण्यासाठी असलेली पिशवी ती पल्लवीकडे देताच तीचा पाठीमागे अचानक तोल गेला व क्षणात हातात भगवा झेंडा घेऊन ती घरंगळत खाली गेली . क्षणात होत्याचं नव्हतं होतं व सिध्दी वरून ४५० फुट खाली कोसळते . ती वेळ होती सकाळची १० : ३० ची घाबरलेल्या स्थितीत इतर सदस्यांना काय करावे सुचेनासे होते . सोबत असलेल्या रितेशने वनविभाग जुन्नर चे रमेश खरमाळे वनरक्षक व माजी सैनिक यांना तुरंत फोन केला . वनरक्षक रमेश खरमाळे यांनी लगेच अॅबुलन्स घेऊन येतो म्हणून रितेशला सांगत धिर देतात . प्रशांत कबाडी अॅबुलन्सचे मालक यांना फोन करताच ते पण घटनास्थळी जाण्यासाठी लगेच पोहचतात क्षणाचा विलंब न करता खरमाळे वनपाल शशिकांत मडके विनायक साळंके व प्रशांत कबाडी अ बुलन्स घेऊन चौघे अगदी २० मिनीटांत हडसर गाठतात . वनरक्षक खरमाळे व वनपाल मडके यांची नियुक्ती जुन्नर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजितजी शिंदे यांनी शिवजयंती निमित्ताने जुन्नर तालुक्यातील किल्ल्यांवर आपात्कालीन काही घटना घडलीच तर मदत करण्यासाठी वनविभागाकडून कर्तव्यावर नेमले होते . खरमाळे व सोबतीला असलेले साथीदार तीव्र उतारावर टनटनींच्या झुडपात अडकलेल्या सिध्दीला बाहेर काढतात व अनेक प्रसंगांना तोंड देत तीला अॅबुलन्सपाशी हडसर येथे पोहचतात . येथे जुन्नर पोलिस स्टेशनची टीम पोहचलेली असते त्यांच्या मदतीने सिध्दीला अंबुलन्समधुन जुन्नर सरकारी रुग्णालयात दाखल करतात . परंतु तोपर्यंत सगळं काही संपलेल असतं सिध्दी जगाचा निरोप घेते तो पण श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा हाती घेऊनच सिध्दीच्या वडीलांनी जगाचा पहीलाच निरोप घेतलेला असून आई व छोटी बहिण असा तीचा परीवार आहे . आईच्या मनावर खुप मोठा आघात झाला आहे . मुंबईकर या दु : खद प्रसंगी सिध्दीच्या आईला मदतीचा हात देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो . श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा घेऊन शिवजन्मोत्सवी स्वच्छता अभियान राबवून सिध्दी जगाला संदेश देऊन गेलीय की गडकोट जीवापेक्षा जास्त जपा त्यांना स्वच्छ ठेवा व संवर्धन करा . अशा या माऊलीस त्रिवार मानाचा मुजरा व भावपुर्ण श्रद्धांजली मदतीला धावून आलेली रेस्कु टिम रमेश खरमाळे ( माजी सैनिक खोडद ) वनरक्षक घाटघर , शशिकांत मडके ( वनपाल आपटाळे ) विनायक साळंके ( वडज ) प्रशांत कबाडी अॅबुलन्स मालक , रितेश पानसरे ( घाटघर ) सागर तिडके हडसर ग्रामस्थ व सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशनचे सदस्य आपण या प्रसंगी मदतीचा हात दिलात येणाऱ्या काळात आपणाकडून अशेच कार्य घडत राहो . व कामठे परीवारास या दु : खातुन सावरण्याचे धाडस परमेश्वर देवो हीच सदिच्छा कृपया विनंती असेल मित्रांनो सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडताना स्वत : ची काळजी घ्या येथे चुकीला माफी नक्कीच नाही . वनविभाग जुन्नरचे विशेष आभार की आपत्तीसाठी आपण दखल घेतलीत आणि प्रशांतजी कबाडी यांनी तुरंत अॅबुलन्स सेवा उपलब्ध करून दिलीत . सिध्दिस भावपूर्ण श्रद्धांजली

सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा

  परभणी : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निघून खुन करणाऱ्या नराधम विष्णु मदन गोरे यास गंगाखेड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधिश एस . जी . इनामदार यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे . बाल वयातच माता पित्याचे छत्र हरविलेला नातीचा सांभाळ आजोबा करीत होते . ससर्वांना तिचा लळा लागलेला होता , घरात सर्वाची ती आवडती होती . पण दि . २७ ऑक्टोंबर २०१६ रोजी ती घरा बाहेर खेळत असताना , अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण कुंटुब हादरले . तिच्या शोधासाठी शेळगाव पिंजून काढला . राञ भर शोध सुरू होती , पण ती सापडलीच नाही . अखेर दि . २७ ऑक्टोंबर २०१६ रोजी आजोबा प्रभाकर शामराव गायवळ यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात आपल्या सहा वर्षीय नातीचे अपहरण केल्याची फिर्याद देण्यात आली . त्या अनुशगांने सोनपेठ पोलिसानी तपास सुरू केला आसता , या तपासात दोन दिवसात या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत विश्वाभंर लोढे यांच्या शेतातील विहीरीत आढळून आला . या घटनेने संपूर्ण कुंटुबावर दु : खाचा डोंगर कोसळला सदर प्रकरणी पोलिसानी वैद्यकीय अहवाला नुसार ३७६ अ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये कलम ३ व ६ नुसार गुन्हात वाढ करण्यात आली .पोलिस पाटील अश्रोबा कुराडे व सुनील गोरे यांनी या घटनेतील मुख्य आरोपी विष्ण मदन गोरे अल्याचे कळताच त्यांनी सोनपेठ पोलिस स्टेशनला सांगितले पण सदरील आरोपी गावातुन फरार झाला आसता गन्हे अन्वेशषन विभागाचा मदतीने त्यास कर्नाटक येथून अटक करून आणले आसता , त्याने गुन्ह्याची कबुली दिली . गंगाखेड जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल करून या प्रकरणात एकुण २३ साक्षीदार तपासण्यात आले यात फिर्यादी साक्षीदार व वैद्यकिय अहवाल , घटनास्थळ , तपास पोलिस अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या व आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध झाला , यावरून न्यायाधीश एस . जी . इनामदार यांनी आरोपी विष्ण गोरे यास फाशीची शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड . एस डी वाकोडकर यांनी कामकाज पाहिले . त्यांना ऍड . डि . यु . दराडे , ऍड . एस . बी . पौळ , ऍड . एस . पी . चौधरी , ऍड . भगवान यादव यांनी सहकार्य केले . यावेळी बालिकेचा आजोबानी आरोपीस लवकरात लवकर फाशी द्यावी अशी भावना व्यक्त केली .

सनशाईन इंटरनॅशनल स्कूल मध्ये बहुभाषीक पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती साजरी

बिलोली|हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार महासंघ तर्फे  आयोजीत शिवजन्मोत्सव साजरा बिलोली तालुक्यातील सनशाइन इंटरनॅशनल स्कूल येथे साजरा करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली नगरीच्या नगराध्यक्षा सौ.मैथीलीताई संतोष कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन न.पा.उपाध्यक्ष मारोती पटाईत नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौंड,पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे ,कासराळीचे माजी सरपंच अरविंद लक्ष्मण ठक्करवाड,कासराळीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुर्यकांत महाजन  माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार,विद्यमान नगरसेवक अनुप अंकुशकर ,जावेद कुरेशी, बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर ,कार्ला (खूर्द) च्या महीला सरपंच सौ.अल्का देशमुख या मान्यावरांची  प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यावरांचे  हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .या शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रमुख वक्ते  प्रा.डॉ.सिध्दोधन कांबळे प्रसिद्ध विचारवंत व जामा मजिद चे मौलाना अहमद बेग इनामदार यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास काय ते आपल्या व्याख्यानातुन स्पष्ठ केले हिंदवी स्वराज्याचे जनक शिवाजी महाराज यांच्या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी सनशाइन इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज यांच्या जिवनातील काहीअमूल्य  प्रसंग वेशभुषा परिधान करुन पथनाट्याच्या माध्यमातुन सादर केले छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहीस्तेखानाचा वध कश्या प्रकारे शिताफीने केला होता ते आदभुत दृश पथनाट्याच्या माध्यमातुन सादर केले यावेळी सनशाइन इंटरनॅशनल स्कुल चे संचालक मेरगु व शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच पत्रकार प्रकाश पोवाडे दादाराव इंगळे,तालुकाअध्यक्ष शेख सुलेमान,संदीप गायकवाड, शेख ईलीयास, सुनिल कदम, मारोती भालेराव,मार्तंड जेठे,सय्यद रियाज आदी पत्रकार उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थी यांचे पालक देखील या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली.आयोजीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी मराठवाडा बहुभाषीक पत्रकार महासंघाचे अध्यक्ष शेख फारुख उपाध्यक्ष शेख युनुस संघाचे सचिव सतीश बळवंतकर सदस्य माधव दंतापल्ले,नागोराव कुड़के, हाई पटेल,शेख माजीद तर सनशाइन स्कूलचे संचालक सत्यनारायण मेरगु,मुख्याध्यापिका प्रेमा मेरगु,शिक्षक अनिल तमलुरे, ईमरान देसाई,भारत उषाया, परवीन,टी वसंता, टी विद्या,टी मनीषा,अर्जुन सर,पांचाळ,रुपाली,सविता,सुविधा,रेणुका आदीनी परीक्ष्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन समतादुत शेख ईरशाद यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष शेख फारुख अहेमद यांनी केले.

19 February 2020

नायगाव तालुक्यातील तिन परीक्षा केंद्रावर बारावीचे कॉपीबहाद्दर रस्टीकेट

नरसीफाटा | नायगाव तालुक्यातील जनता हायस्कूल नायगाव येथील 6 विद्याथी , पोस्ट बेसीक आश्राम जुनियर । कॉलेज मरवाळी तांडा येथे 4 विद्याथी तर वि . जा . भ . ज . क . माध्यमिक विद्यालय कुंटूर तांडा येथे 6 विद्यार्थी असे एकुण तिन परीक्षा केंद्रावरील कॉपी बहाद्दरांना आज भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले .नायगाव तालुक्यातील सात परीक्षा केंद्रावर एकूण 3528 विद्यार्थी पैकी 3476 विद्यार्थ्यांनी बारावीचे इग्रंजी विषयांची परीक्षा देले . जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून धडपड केली जात असली तरी , अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र आहे . परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी भरारी पथकाद्वारे केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत . नायगाव तालुक्यातील तिन परिक्षा केंद्रावर पेपर सोडविताना नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट रस्टीकेट केले असून हा पॅटर्न सर्वच पेपरला राबविण्यात यावे असे सुज्ञ नागरिकांतुन बोलल्या जात आहे .दि . 18 फेब्रुवारी रोजी बारावीचा इग्रंजी विषयाचा पेपर होता . यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याचे भरारी पथकाने नायगाव तालुक्यात काही परिक्षा केंद्रावर सकाळी परीक्षा सुरु होण्याआधीच एक तासा पासुन तळ ठोकून बसले तर काही परीक्षा केंद्रास भेट दिली असता , या ठिकाणी विद्यार्थी नक्कला करीत असल्याचे निदर्शनास आले . भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी जनता हायस्कूल नायगाव येथील 6 विद्याथी , पोस्ट बेसीक आश्राम जुनियर कॉलेज मरवाळी तांडा येथे 4 विद्याथी तर वि . जा . भ . ज . क . माध्यमिक विद्यालय कुंटूर तांडा येथे 6 विद्यार्थी असे एकुण तिन परीक्षा केंद्रावरील कॉपी बहाद्दरांना भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले .

18 February 2020

गुरुकुल विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

नांदेड | जिल्ह्यातील धर्माबाद शहरातील गुरूकुल विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा एका तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली आहे . या घटनेमुळे सर्वंतर शोककळा पसरली आहे . धर्माबाद येथील गुरुकुल विद्यालयातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या विध्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे , सदरील दोन विध्यार्थी गुरुकुल शाळेचे नववी वर्गात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास साईचरण किशन आल्लूरोड व लखन सिद्धपा राचेवाड हे दोघे आपल्या इतर दोन मित्रांसह बाळापूर गावाजवळील तलावात पोहायला गेले होते . दरम्यान लखन आणि सिद्धपा या तलावात पोहायला उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे . या घटनेची माहिती मिळताच धर्माबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तलावात मुलांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि पोलीस जमादार स्वामी यांना सांगितले असता दोन तासांच्या शोधानंतर या दोन्ही विध्यार्थ्यांचा मृतदेह सापडला आहे .

14 February 2020

अरुण डोंगरे शिर्डीला साईबाबाच्या सेवेत

नांदेड| नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरेंना आता श्री साईबाबाच्या सेवेत पाठविण्यात आले आहे असे आदेश अपर मुख्य सचिव ( सेवा ) सिताराम कुंटे यांनी अरुण डोंगरे यांना पाठविले आहेत . काल दि . 13 फेबुरवारी रोजी परभणीचे जिल्हाधिकारी पी . सिवा संकर यांची नियुक्ती नांदेडला जिल्हाधिकारी पदावर झाल्याचे आदेश जारी करण्यात आले होते . त्या आदेशात नांदेडचे समश्रेणीपद अवनत करून पी . सिवा संकर यांची नांदेडला नियुक्ती झाली आहे . अत्यंत कडकशिस्तीचे आणि रेतीमाफियांचे कर्दनकाळ अशी पी . सिवा संकर यांची ख्याती आहे . ते भारतीय प्रशासनिक सेवेचे अधिकारी आहेत .आज अनेक संकेतस्थळावर व्हायरल झालेल्या अपर मुख्य सचिव ( सेवा ) सिताराम कुंटे यांच्या पत्रात नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे या भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा विश्वस्त शिर्डी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे . साईबाबा संस्थानचे पुर्वीचे अधिकारी डी . एम . मुगळीकर यांची बदली झाली आहे .नांदेड जिल्ह्यात आपला कार्यकाळ चांगला चालवल्यानंतर कालपासून व्हाटसऍपवर त्यांची बदली रेतीच्या प्रितीने झाली अशी एक चारोळी फिरत आहे . सोबतच पी . सिवा संकर यांच्या नियुक्तीने पालकमंत्री नाराज अशा चर्चा सुरू झाल्या आहेत . प्रशासनिक सेवेत बदल्या ह्या । होणारच असतात . त्यामुळे कोण कोठे 7 गेला आणि कोण कोठे आला यापेक्षा ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली त्या । ठिकाणचे काम उत्कृष्ट आणि सुंदर करणे हे सर्वात मोठे ध्येय असावे . अरुण डोंगरे यांची बदली आता श्री साईबाबा संस्थामध्ये झाली असल्याने त्या ठिकाणी सुध्दा भरपूर काही करायला वाव आहे . शिर्डीचे संस्थान आता फक्त भारतातच नव्हे तर जगभर प्रसिध्द झाले आहे . शिर्डीला येणाऱ्या भक्तांच्या श्रध्देला ठेच पोहचणार नाही हे पाहण्याची मुख्य जबाबदारी आता अरुण डोंगरेंना पार पाडायची आहे . एक्सप्रेस न्यूज लाईव्हच्या वतीने सुध्दा जिल्हाधिकारी अरुण डोंगरेंना नवीन जबाबदारीसाठी खूप खूप शुभेच्छा

13 February 2020

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून श्री पी सिवाशंकर यांची नियुक्ती

 नांदेड : नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची बदली करण्यात आली असून डोंगरे यांच्या रिक्त झालेल्या जिल्हाधिकारीपदी परभणीचे जिल्हाधिकारी पी . शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तीन वर्षांपेक्षा अधिक काळ नांदेड सेवा बजावलेल्या अरुण डोंगरे यांची अखेर आज बदली झाली अरुण डोंगरे यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या काळात _ _ अनेक घोटाळे उघडकीस आले शिवाय डोंगरे अनेक वादविवादातही सापडले होते खास करून राज्याला हादरवून सोडणाऱ्या धान्य घोटाळ्यात आणि अवैध वाळ व्यवसायातही जिल्हा अधिकारी अरुण डोंगरे यांच्या बद्दल अनेक वाद विवाद निर्माण झाले होते . असे असले तरी डोंगरे यांनी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केला आज दिनांक १३ रोजी त्यांची बदली करण्यात आली असून नूतन जिल्हा अधिकारी म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी पी . शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . पी . शिवशंकर यांनी २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी म्हणून यश मिळविले होते . वर्धा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे . त्यानंतर कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे . नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती . परभणी येथे ३ एप्रील २०१७ पासून परभणीचे जिल्हा अधिकारी म्हणून रुजू होते .

माझ्यामुळे सर्वांना त्रास मला गोळ्या झाडा ' हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेची मागणी ?

 वर्धा । हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत . या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला फासावर लटकवण्याची मागणी नागरिक करत आहेत . राज्य सरकारने देखील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता स्वतः आरोपी विक्की नगराळे यानेही त्याला गोळ्या झाडून मारण्याची मागणी केली आहे ( Hinganghat accused demand to shoot ) . सुरुवातीला आरोपीला पीडितेच्या मृत्यूची माहिती नव्हती . मात्र ही माहिती मिळताच त्याने माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याचं म्हणत गोळ्या मारण्याची मागणी केली . लोकभावनेच्या दबावातून त्याने ही मागणी केल्याचं सांगितलं जात आहे . आरोपी विक्की नगराळेला सध्या वर्धा शहरातील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे . त्याला कारागहातील बॅरेक क्रमांक पाच मध्ये ठेवण्यात आलं आहे . आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बॅरेकमधील काही कैद्यांना स्थलांतरित करण्यात आलं . सुरवातीला या बॅरेकमध्ये 12 ते 15 कैदी होते . त्यानंतर या बॅरेकमध्ये केवळ 5 कैदी ठेवण्यात आले . यात सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं वर्तन असणाऱ्या कैद्यांना । प्राधान्य देण्यात आलं . एका निवृत्त पोलीस निरीक्षकाचा देखील या कैद्यांमध्ये समावेश आहे . आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे 4 दिवस पोलीस कोठडीत , तर 4 दिवस वर्धा कारागृहात होता . यानंतर 20 फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली . सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला दुसरीकडे स्थलांतरित करा , अशी मागणी वर्धा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आली होती . दरम्यान या प्रकरणातील 5 साक्षीदारांची ओळख परेड हिंगणघाट येथील नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत कारागृहात पार पडली . यावेळी 2 सरकारी पंच उपस्थित असल्याची सुत्रांनी माहिती दिली . तब्बल 1 तास ही ओळख परेडची प्रक्रिया चालली . यानंतर या आरोपीला कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने नागपूर येथील कारागृहात हलवण्यात आलं आहे . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडितेचा ज्या दिवशी मृत्यू झाला . त्या दिवशी कारागृहात असणाऱ्या आरोपीलला याची माहिती नव्हती . दुसऱ्या दिवशी मंगळवारी ( 11 जानेवारी ) आरोपी विक्की नगराळे याला ही माहिती मिळाली . यानंतर तो काही काळ निशब्ध होऊन कारागृहात उभा राहिला आणि नंतर बॅरेकमध्ये आपल्या पलंगावर बसला . मात्र काही वेळेनंतर त्याच्या चेहऱ्यावर घटनेबाबत कोणतेही दुःख दिसले नाही . मात्र , नियमित झडती दरम्यान आरोपीने माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय , असं म्हणत मला गोळी झाडून मारा , अशी मागणी केली . पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पोहचलेल्या आरोपीच्या सुरक्षेचा तणाव जिल्हा प्रशासन , कारागृह प्रशासन , पोलीस प्रशासन यांच्यावर दिसून येत होता . त्यामुळेच दिवसाला 5 आणि रात्रीला 3 पोलिसांचा तुरुंगाबाहेर खडा पहारा लावण्यात आला होता . शिवाय कारागृहासमोर तात्पुरती पोलीस चौकी आणि शहरातील पेट्रोलिंग वाढवण्यात आली होती .हिंगणघाटच्या घटनेनंतर आरोपीचा हैद्राबादसारखा गोळ्या झाडत एन्काउंटर करा अशीही मागणी केली जात आहे . दुसरीकडे मला गोळ्या झाडा अशी मागणी स्वतः आरोपीनेच कारागृहात केली . असं असलं तरी आरोपीची ही मागणी पश्चातापाच्या भावनेतून नाही तर आपल्या विरोधातील जनभावनेच्या दबावातून आल्याचंही बोललं जात आहे . सर्वच स्तरातून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे . त्यामुळे न्यायलयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा कधी मिळणार हे पाहावे लागणार आहे .

10 February 2020

हिंगणघाट जळीत प्रकरणातील तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली . नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात सकाळी घेतला अखेरचा श्वास

 10 फेब्रुवारी - 2020 # नागपूर | हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे . सोमवारी पहाटे तिला हृदयविकाराचा धक्का आला . यानंतर तिची प्रकृती खालावली होती . यानंतर सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला नागपुरमधील । ऑरेंज सिटी रुग्णालायात तिच्यावर उपचार सुरु होते . डॉ . राजेश अटव यांनी मेडिकल बुलेटिन जाही करत ही दुःखद बातमी सांगितली हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर तरुणीला औषधे देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली रात्रभर तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते . मात्र संसर्गामळे रक्तपेशी रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होते . याचा परिणाम तिच्या मेंदू , फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली . पीडितेचं पार्थिव पोलिसांकडे लवकरच सुपूर्द केलं जाणार आहे . गेल्या आठ दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती . सोमवारी सकाळी नागपुरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने _ _ अखेरचा श्वास घेतला . विकी नगराळे या तरुणाने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.3 फेब्रुवारी रोजी साडे सात वाजता ही तरुणी लगबगीने महाविद्यालयाकडे निघाली होती . या 24 वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिले . वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ही संतापजनक घटना घडली . तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करत जवळपासच्या मदतीची याचना केली . त्या वेळी धावत येऊन नागरिकांनी तत्काळ तरुणीच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली . या घटनेमध्ये ही तरुणी 40 टक्के भाजली होती . नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत होती .

जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार-पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड |जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार आहे . त्या अनुषंगाने नवीन कामांचे प्रस्ताव द्यावेत तसेच मुदखेडकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील , असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुदखेड येथे केले .मुदखेड नगरपरिषदेने विकसीत केलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री श्री . चव्हाण यांच्या हस्ते मुदखेड नगरपरिषद कार्यालयात झाले , त्यावेळी ते बोलत होते . यावेळी मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मजीब अन्सारी . काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर , भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके , जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब रावणगावकर , सभापती श्री नाईक , उपविभागीय अधिकारी पवन चांडक , तहसीलदार दिनेश झांपले , नायब तहसिलदार तथा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संजय नागमवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती . पालकमंत्री चव्हाण यांनी नगरपरिषदेच्या विकास कामांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरोत्थान अभियान राज्यस्तर अभियानांतर्गत उमरी तालुक्यातील बळेगाव येथून मुदखेड शहरासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे . मुदखेड नगरपरिषदेची हद्दवाढ करणे . शहरातील पाणी टंचाईबाबत आढावा . बौध्द स्मशानभूमी व इतर समाजाच्या स्मशान भूमीसाठी रस्त्यासाठी भूसंपादन करणे . कालेजी देवी ते रेल्वे उड्डाण पुलापर्यंत पाणंद रस्ता विकसित करणे . रेल्वे भुयारी पोच मार्ग चालु करण्यासाठी भूसंपादन मार्ग चालु कराभूसंपादन करणे . भोकर चौक ते न्याहाळीकडे जाणारा रस्ता जोडण्यासाठी रेल्वे उहाण पुलाचे बांधकाम करणे . नगरपरिषदेतील रिक्त पदे भरणे . प्रधानमंत्री आवास योजना राबविणे . एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकुलाची थकीत देयके देणे . श्रीखंडोबा देवस्थानाचा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समावेश करणे . शहरात सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे . मील्लतनगर ते वसंतनगर तांडा ते उमरीरोडपर्यंत रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्ता विकसित करणे यासह शहरातील विविध विकास कामांचा आढावाही श्री चव्हाण यांनी घेतला . मुदखेड शहरात चालू असलेली विकास कामे चांगली , दर्जेदार , पारदर्शकपणे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देवून नवीन विकास कामांचे प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतही करावेत सूचनाही त्यांनी केली . कार्यक्रमाची प्रस्तावना मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी यांनी केली . यावेळी माधव कदम यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमासाठी लक्ष्मण देवदे , बालाजी गोडसे , शेख करीम शेख सादात , बंदे अलीखाँ पठाण , इम्रान मच्छीवाले , संजय आऊलवार , चांदु चमकुरे , चांदु बोकेफोड , उमाकांत घोंगडे , उत्तम चव्हाण , बबलु शेठ , रावसाहेब चौदंते , किशोर पारवेकर आदींची उपस्थिती होती . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदखेड नगरपरिषद कर्मचारी रामेश्वर वाघमारे , अनंत कुलकर्णी , दिलीप पवार , मोहन कवळे , नितीन चव्हाण , पांडूरंग मोरे , म . यूनूस सैफुलहक , भीसे गंगाधर , रमेश सावंत , मोहन पांचाळ , गणेश वड्डे आदींनी परीश्रम घेतले .

07 February 2020

बिलोली नगर परिषद प्रभाग क्र.५-अ च्या पोटनिवडणुकीत अपक्ष यशवंत गादगे विजय

-धनाढ्य शक्ति विरोधात जनशक्तिचा विजय :यशवत गादगे

बिलोलीःप्रतिनिधी (सा.वा) :दि.७ फेब्रुवारी 
 बिलोली नगर परिषद प्रभाग क्र.५-अ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत आघाडीचे यशवंत लालजी गादगे हे ५२२ मतांनी विजयी झाले.प्रतिस्पर्धी कॉग्रेस चे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शट्टीवार यांना 452 मते मिळाली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे अवघ्या ७० मतांनी पराभुत केले.
     नगर परिषद प्रभाग क्र.५-अ हा अनुसूचीत जमाती पुरुषासाठी राखीव आहे २०१७ च्या न.प. सार्वत्रीक निवडणुकीत कॉग्रेस चे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शट्टीवार हे या प्रभागातुन निवडुण आले त्या वेळेस आघाडी कडुण निवडणुकीसाठी उभे राहीलेले यशवंत लालजी गादगे यांचा फक्त २६ मतांनी पराभव झाला होता.
    अनुसूचीत जमातीसाठी राखीव आसलेल्या प्रभागातुन निवडुण आलेले लक्ष्मण शट्टीवार हे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करु शकल्यामुळे त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.या संदर्भात राज्य निवडणुक आयोगामार्फत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्या अनुषंगाने दि.६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते.
    प्रभागातील एकुण १६३५ मतदारापैकी १०१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता त्या पैकी विजयी उमेदवार यशवंत लालजी गादगे यांना ५२२ मते मिळाली प्रतिस्पर्धी कॉग्रेस चे लक्ष्मण शट्टीवार यांना ४५२ मते मिळाली अटितटीच्या निवडणुकीत लक्ष्मण शट्टीवार यांचा ७० मतांनी पराभव झाला आहे. ही लड़ाई काँग्रेस पक्षातरफे प्रतीक्षेची होती.💐
      शहरातील आपल्या राजकारणाची प्रतिष्ठा टिकवून ठेवणार्या या पोटनिवडणुकीत यशवंत गादगे यांनी बाजी मारुन आपली राजकीय प्रतिष्टा न.प.मध्ये ठिकवुन ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत या विजयाचा जल्लोश ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची अतिशबाजी गुलाल ऊधळुन विजयी मिरवणु काढुन करण्यात आला.
    या पोटनिवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन शरद झाडके तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन त्र्यंबक कांबळे एस.एन चव्हाण ना.त.निवडणुक यांनी काम पाहीले

मयत चालकांच्या कुटुंबीयास जय संघर्ष ग्रूप च्या वतीने 10 हजाराची मदत

महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेची उत्कृष्ट कामगिरी

बिलोली|(ता.प्र)30 नोव्हेंबर 2019 रोजी चालक कै सचीन कागडे यांचे डेगु व ताप मुळे मृत्यु झाले होते.त्यांच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत म्हणून जय संघर्ष ग्रूप चालक व मालक यांनी माणुसकी दाखवत आर्थिक मदत केली.चालक व मालक महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था शाखा बिलोलीचे तालुकाध्यक्ष प्रतापसिंह ठाकुर, उपाध्यक्ष अब्दुल खय्युम लोडीग पाॅईट चे उपाध्यक्ष व संपूर्ण ड्राइवर बाधव यांनी मयत कै.सचिन कागडे  यांच्या कुटुंबीयास देशमुख नगर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या पत्नीस व त्यांच्या कुटुंबास रोख स्वरूपात देण्यात आले. 
मयत सचिन कागडे हे प्रायव्हेट ड्राइवर होते व तसेच त्यांनी एस टी महामंडळात चालक म्हणून नुकतेच लागले होते.जालना जिल्हा येथे प्रक्षिशण वर्षभर केले त्याच्यावर डेगुने दुर्दैवाने त्यांना काळाचा घात झाला.सचिन कागडे गरीब कुटुंबातुन नोकरी वर लागले होते.दुर्दैवाने मृत्यु झाल्यामुळे कुटुंबास आर्थिक मदत म्हणून जय संघर्ष चालक व मालक संघटना सामाजिक बांधिलकी म्हणून त्या कुटुंबास मदत देण्यात आली.

05 February 2020

धर्माबाद , बिलोली , हिमायतनगर , नायगाव नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पोटनिवडणूक

क्षेत्रातील मतदान , मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम 
नांदेड |जिल्ह्यातील नगरपरिषद धर्माबाद व बिलोली , नगरपंचायत हिमायतनगर व नायगाव येथील रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक 2020 साठी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान होणार आहे . या मतदान केंद्र व परिसरात तर शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे .

जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अधिकाराचा वापर करुन निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील नगरपरिषद धर्माबाद व बिलोली , नगरपंचायत हिमायतनगर , नायगाव येथील रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक 2020 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत , निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवथा अबाधित राहण्यासाठी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे ,सर्व दुकाने , मोबाईल , कॉडलेस फोन , पेजर , वायरलेस सेट , ध्वनीक्षेपके , सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे , निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन , संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे . हा आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी 3 फेब्रुवारी 2020 रोजी निर्गमीत केला आहे .

नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीत मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत जिल्ह्यातील हिमायतनगर प्रभाग 2 , बिलोली प्रभाग 5 - अ , धर्माबाद प्रभाग - 2 व 4 - अ , नायगाव प्रभाग - 1 येथे घेण्यात येणाऱ्या नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पोट निवडणूकीसाठी त्या - त्या प्रभागातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी दोन तासाची सवलत देण्यात येणार आहे , अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केली.मतदानाच्या दिवशी मतदार मतदानापासून वंचित राहू नये , जर मतदाराकडून मतदानाकरीता दोन तासाची सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधीत आस्थापना , व्यावसायिकाविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी , असे अधिसुचनेत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नमूद केले आहे .

04 February 2020

अल्पवयीन बालिकांवर अत्याचार करणारा शिक्षक पोलीस कोठडीत

नांदेड | अल्पवयीन बालिकांसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या 30 वर्षीय शिक्षकाला विशेष न्यायाधीश एन . डी . खोसे यांनी 7 फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे .विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत अनेक पालक जमले . त्यांनी या शाळेतील शिक्षक स्वप्नील भिमराव श्रृंगारे ( 30 ) रा . गंगानगर सांगवी हा आमच्या 9 वर्ष वयाच्या बालिकांसोबत शाळेतच रिक्याम्या वर्गात अश्लिल चाळे करतो अशी तक्रार दिली . या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 40 / 2020 दाखल केला . त्यात भारतीय दंडविधानाची कलमे 376 ( 2 ) ( एफ ) ( एन ) ( 3 ) , 354 , 354 ( ब ) , 5063 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सुधारीत 2012 च्या कलम 4 , 6 , 8 , 10 , 12 , 18 जोडली . काल दि . 2 फेबुवारी रोजी स्वप्नील भिमराव श्रृंगारे या शिक्षकाला अटक झाली होत . या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक पोलीस उपनिरिक्षक आरती पोवार यांच्याकडे देण्यात आला . आज 3 फेबुवारी रोजी पोलीस उपनिरिक्षक आरती पोवार , ए . जी . लांडगे , पोलीस कर्मचारी अरुण राठोड आणि गंगावरे यांनी स्वप्नील श्रृंगारेला विशेष न्यायालयात हजर केले . न्यायालयात सहायक सरकारी वकील ऍड . रणजित देशमुख यांनी या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयासमक्ष मांडले आणि पोलीस कोठडी देण्याची विनंती केली . युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एन . डी . खोसे अत्यंत निरागस बालिकांसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षक स्वप्नील श्रृंगारेला 7 फेबुवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे .

जिल्हा परिषदेच्या विषय समितीवर काँगेसचे वर्चस्व

रावणगावकर , नाईक , बेळगे , सौ . बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड 
नांदेड: जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीची निवड दि . 3 रोज सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली . सुरुवातीला ही निवडणुक बिनविरोध होणार नाही असे अनेकांना वाटले होते . मात्र शेवटच्या टप्यात राष्ट्रवादीच्या समाधान जाधव यांनी माघार घेतली आणि यात चारही विषय समितीच्या सभापतीची निवडणूक बिनविरोध पार पडली .महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी काँगेसचे माजी आ . हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या पत्नी सौ . सशिलाबाई बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड झाली . यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनयना जाधव यांनी उमेदवारी अर्ज । दाखल केला होता . मात्र ऐनवेळी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली . दुसरीकडे समाजकल्याण समितीसाठी काँग्रेसकडून ऍड . रामराव नाईक , राष्ट्रवादी काँग्रेसकडून समाधान जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता . याचबरोबर समाधान जाधव यांनीही इतरही दोन्ही समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता . एकूण 3 अर्ज समाधान जाधव यांनी दाखल केले होते . मात्र एका जागेवर निवडणुक अटळ असल्याचे चिन्ह शेवटच्या क्षणापर्यंत दिसून येत होते . काँग्रेसच्या सदस्यांनी निवडणुक प्रक्रियेला समोर जाण्याची पुर्ण तयारी केली होती . मात्र शेवटच्या क्षणात समाधान जाधव यांनी तिन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले . समाजकल्याण सभापती पदासाठी ऍड . रामराव नाईक व 2 विषय समिती सभापतीपदासाठी संजय बेळगे आणि बाळासाहेब रावणगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केली . जिल्हा परिषदेच्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी कॉग्रेस मात्र बाद झाली . मागील 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी होती . मात्र यावर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या । गटबाजीचा फटका काँग्रेसने घेतला | आणि अध्यक्षासह इतर चार विषय समिती सभापती पदावर काँगेस ताबा मिळवला आहे . या निवड प्रक्रियेवेळी आ . अमर राजूरकर , आ . मोहन हंबर्डे , माजी आ . डी . पी . सावंत , माजी आ . वसंतराव चव्हाण , माजी आ . हणमंतराव पाटील बेटमोगरेकर , माजी जि . प . अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांची जिल्हा परिषदेत उपस्थिती होती .