जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

29 September 2019

*देगलूर-बिलोली मतदार संघातून काँग्रेसचे मा.आ रावसाहेब अंतापुरकर यांना उमेदवारी जाहीर*


बिलोली (ता) प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील मतदार जनता हे अंतापुरकर हे हक्काचा आमदार व जनतेचे जनसेवक उमेदवार म्हणुन गोर गरीब जतनेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अंतापुरकर हे नेहमीच एका आवाजाला धावुन येतात. माजी आमदार असताना सुद्धा अनेक गावी होईल त्या पद्धतीने निधी मंजूर करून ते दिलेले आहेत. मतदारांना व जनतेची जान असणारा नेता व झंझार आमदार सर्वांना न्याय , . हक्क , . मुलभूत गरजा सोडवण्यासाठी जनतेचा हके आवाज देवून सोबत घेऊन चालणारा आमदार आहे . व विकास हे मुलमंत्र असणारा असे मत व्यक्त केले . मी देगलूर बिलोली चा विकासाचे कायापालठ केल्या शिवाय व शेतकऱ्यांच्या व बेरोजगारीचे प्रश्न . त्यांच्या हाताला काम देणार असे अंतापुरकर यांनी सांगीतले  . जनता मोठ्या ताकतीसह खंभीर पणे मतदार त्याच्या पाठीशी उभे राहाणार असे जनतेकडुन चर्चीले जाते . व त्यांना यावेळेस भावी आमदार अंतापुरकर यांनी निश्चित पणे निवडून येण्याचे संकेत जनतेतून वर्तिले जात आहे .अंतापुरकर हे मागील निवडणूकीत अल्प मतांनी पराभूत झाले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे हे विजय झाले होते पण या वेळी  मा.आ रावसाहेब अंतापुरकर यांना जनतेतुन जास्त पाठिंबा दिसत आहे व भावी आमदार हे अंतापुरकरच राहतील असे सुर जनतेतुन निघत आहे .

काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे जाहीर

Live news updates
          काँग्रेसच्या 51 उमेदवारांची नावे जाहीर
 अक्कलकुवा - के . सी पडवी
 शहादा - पदमाकर विजयसिंग वालवी
नवापूर - शिरिष नाईक
रावेर - शिरिष चौधरी
बुलडाणा - हर्षवर्धन सकपाळ
मेहकर - अनंत वानखेडे
रिसोड - अमित जनक
धामनगाव - विरेंद्र जगताप
तिवसा - यशोमती ठाकूर
आर्वी - अमर शरद काळे
देवळी - रंजीत प्रताप कांबळे
सावनेर - सुनील छत्रपाल केदार
नागपूर ( उत्तर ) - डॉ . नितीन राऊत
ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वजेट्टीवार
चिमुर - सतीश मनोहर वर्जुराकर
वरोरा - प्रतिभा सुरेश धानोरकर
यवतमाळ - अनिल बाळासाहेब मांगूळकर
भोकर - अशोकराव शंकरराव चव्हाण
नांदेड ( उत्तर ) - डी . पी . सावंत
नायगाव - वसंतराव बळवंतराव चव्हाण
देगलूर - रावसाहेब जयवंत अनंतापुरकर
काळमनुरी - संतोष कौतिका तर्फे
पाथरी - सुरेश अंबादास वारपुडकर
फुलंबी - डॉ . कल्याण वैजंथराव काळे
मालेगाव ( मध्य ) - शैख असिफ शैख राशिद
अंबरनाथ - रोहित चंद्रकात साळवे
मिरा भाईंदर - सय्यद मुझफ्फर हुसेन
भांडूप ( पश्चिम ) - सुरेश हरिशचंद्र कोपरकर
अंधेरी ( पश्चिम ) - अशोकभाऊ जाधव
चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान
चेंबूर - चंद्रकात दामोदर हंदोरे
वांद्रे ( पूर्व ) - जिशान जियाउद्दीन सिध्दीकी
धारावी - वर्षा एकनाथ गायकवाड
सायन कोळीवाडा - गणेश कुमार यादव
मुंबादेवी - अमिन अमीराली पटेल
कोलाबा - अशोक अर्जुनराव जगताप
महाड - माणिक मोतिराम जगताप
पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप
भोर - संग्राम अनंतराव तोपते
पुणे - रमेश अनंतराव बागवे
संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात
लातुर ( शहर ) - अमित विलासराव देशमुख
निलंगा - अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर
औसा - बासवराज माधवराव पाटील
तुळजापूर - मधुकरराव देवराम चव्हाण
सोलापूर शहर ( मध्य ) - प्रणिती सुशील कुमार शिंदे
सोलापूर ( दक्षिण ) - मौलबी बाशुमिया सयीद
कोल्हापूर ( दक्षिण ) - ऋतुराज संजय पाटील
कारवीर - पी . एन . पाटील सादोळीकर
पळूस - कडेगाव - डॉ . विश्वजीत पतंगराव कदम

27 September 2019

१० गुंठे शेतीत मिरची बीजोत्पादन करू दीड लाखाची केली कमाई


कंधार :  तालुक्यात शेती फुलविण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. शासनाच्या योजनेतून शेडनेट हाऊस उभारणीसाठी १६ शेतकऱ्यांची निवड करुन ४ जणांना अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच १२ शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात अनुदान वितरीत होणार आहे. विष्णूदास इंगोले यांनी अवघ्या १० गुंठे शेतीत पक्के शेडनेट उभारून गावरान मिरची बियाणे उत्पादनातून दीड लाखांची कमाई करत शेती विकासाचा नवा अध्याय रचला आहे. उस्माननगर, लाठ खु. या गावांतील उपक्रमाने कुतूहल निर्माण केले आहे.

तालुक्यात   निसर्ग पावसाचा सतत लपंडाव व लहरीपणा असतो. त्याला शेतीमालाला मिळणारा बेभरवशाचा कमी भाव लागतो. त्यामुळे शेतीचे अर्थकारण दोलायमान असते. शेतकरी हा दुष्काळचक्राने भयंकर भरडतो. अशावेळी शासकीय योजनेचा आधार व नवीन करण्याची उमेद यांचा मेळ बसला की, उत्साह संचारतो. असेच १६ शेतकऱ्यांनी शेतीत नवा प्रयोग करण्याचा संकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

विष्णूदास इंगोले यांनी १० गुंठे शेतीवर शेडनेट उभारले. या आकाराचे तीन शेडनेट त्यांनी उभारले आहेत. शेडनेटच्या सहाय्याने भाजीपाला-फळ पिकाचे बीजोत्पादन करण्यास प्राधान्य दिले. त्यांनी एका शेडनेट वर गावरान मिरची करिता ४ हजार खर्च करत जमीन तयार केली. नांगरटी, वखरणीकरिता ५ हजारांपेक्षा अधिक खर्च केला. मोफत मिळालेल्या मादी वाणाचे ५०० व नर वाणाचे २५० रोपे विशिष्ट अंतरावर योग्य लागवड केली. शेणखत व रासायनिक खतासाठी १५ हजार, कीटकनाशक व बुरशीनाशकाला २० हजार, मजुरी ५० हजार, मिरची झाडाची योग्य बांधणीसाठी २० हजार इतर खर्च असे १ ते सव्वा लाखांचा खर्च केला.

मिरची संगोपनासाठी खताची मात्रा, सूक्ष्म मूलद्रव्यासह बेसल डोस, पाण्यात विरघळणारे खत, विशिष्ट उंचीवर रोपे आले की काही फांद्या छाटून रोपाची बांधणी, मादी झाडाचे संकरणाचे काम मादी रोपावरील न उमललेल्या फुलावरील कळी व नर पुंकेसर वेगळा करणे,  मादीवरील फुलातील स्त्रीकोश भाग  खुणेने वेगळा दर्शविणे, मादी झाडावरील फुलातील नर भाग काढून         टाकण्याचे कुशल काम आदी अतिशय योग्य पद्धतीने करत मिरची बहरली. या मिरचीचे बियाणे तयार केले.

शेडनेटसाठी २ लाख ३५ हजार रुपयांचे देय अनुदानराज्य शासनाच्या कृषी विभागाने 'एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान' राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत शेडनेट उभारणीची मोहीम हाती घेतली. शेडनेटसाठी देय अनुदान सुमारे २ लाख ३५ हजार आहे. तालुक्यातील उस्माननगर, लाठ खु.येथील विष्णूदास इंगोले, शोभाबाई घोरबांड, द्वारकाबाई इंगोले, ज्योतीबाई घोरबांड, सज्जन इंगोले, सुप्रिया घोरबांड, संतोष गवारे,  आबाजी घोरबांड, प्रभाकर गवारे, खंडू इंगोले, अंकुश गवारे, श्रीकांत घोरबांड, आत्माराम मोरे, शशीकांत घोरबांड  या १५ शेतकऱ्यांची व गऊळ येथील एकाची निवड केली.

खर्च वगळता दीड लाखांचे निव्वळ उत्पन्न
तालुक्यात मध्यम व हलक्या जमिनीचे व अल्पभूधारक  शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.१० गुंठ्यात गावरान मिरची बीजोत्पादन २५ ते ३० किलो निघाले. प्रतिकिलो भाव सुमारे ९ हजार ५०० ते १० हजार ५०० असा लागला. एकूण उत्पन्न २.४० ते २.८० झाले. खर्च वगळता दीड लाखांचे निव्वळ उत्पन्न झाले. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व जि.कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली ता.कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्या योग्य सूचनेने मंडळ कृषी अधिकारी नागोराव अंबुलगेकर,  तंत्रज्ञ, कृषी सहायक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

तालुक्यातील १६ शेतकऱ्यांची शेडनेट उभारणीसाठी निवड करण्यात आली. त्यातील ४ जणांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत उपलब्ध अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. शेतकरी शासनाच्या योजनेतून शेती फुलवून आर्थिक स्तर वाढविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

- रमेश देशमुख, (ता.कृषी अधिकारी ,कंधार.)

*देगलूर-बिलोली मतदार संघातून काँग्रेसचे मा.आ रावसाहेब अंतापुरकर यांना उमेदवारी जाहीर*

बिलोली (ता) प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील मतदार जनता हे अंतापुरकर हे हक्काचा आमदार व जनतेचे जनसेवक उमेदवार म्हणुन गोर गरीब जतनेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अंतापुरकर हे नेहमीच एका आवाजाला धावुन येतात. माजी आमदार असताना सुद्धा अनेक गावी होईल त्या पद्धतीने निधी मंजूर करून ते दिलेले आहेत. मतदारांना व जनतेची जान असणारा नेता व झंझार आमदार सर्वांना न्याय , . हक्क , . मुलभूत गरजा सोडवण्यासाठी जनतेचा हके आवाज देवून सोबत घेऊन चालणारा आमदार आहे . व विकास हे मुलमंत्र असणारा असे मत व्यक्त केले . मी देगलूर बिलोली चा विकासाचे कायापालठ केल्या शिवाय व शेतकऱ्यांच्या व बेरोजगारीचे प्रश्न . त्यांच्या हाताला काम देणार असे अंतापुरकर यांनी सांगीतले  . जनता मोठ्या ताकतीसह खंभीर पणे मतदार त्याच्या पाठीशी उभे राहाणार असे जनतेकडुन चर्चीले जाते . व त्यांना यावेळेस भावी आमदार अंतापुरकर यांनी निश्चित पणे निवडून येण्याचे संकेत जनतेतून वर्तिले जात आहे .अंतापुरकर हे मागील निवडणूकीत अल्प मतांनी पराभूत झाले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे हे विजय झाले होते पण या वेळी  मा.आ रावसाहेब अंतापुरकर यांना जनतेतुन जास्त पाठिंबा दिसत आहे व भावी आमदार हे अंतापुरकरच राहतील असे सुर जनतेतुन निघत आहे .

24 September 2019

शिवस्मारकाच्या कामात मोठा घोटाळा, एकही वीट न रचता ८० कोटीचा खर्च

'दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवस्मारकाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. शिवस्मारकाच्या कामात अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याची तक्रार कॅगच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात विभागीय लेखापालांनी लिहलेले पत्र यावेळी विरोधकांनी सर्वांसमोर उघड केले. प्रकल्पाची एकही वीट न रचता ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले. हे पैसे चुकते करण्यासाठी सरकारने आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप विभागीय लेखापालांनी पत्रात केला आहे. एकदा सरकारी कामाची निविदा दिल्यानंतर त्यामध्ये नंतर बदल करता येत नाही. मात्र, शिवस्मारकाच्या कामात बदल करण्यात आले. सरकारने शिवस्मारकातील पुतळ्याची उंची कमी केली आणि तलवारीची उंची वाढवली. तसेच स्मारकाची एकूण जागाही कमी करण्यात आली.हे सर्व बदल करताना तांत्रिक समितीची परवानगी घेण्यात आली नव्हती. याशिवाय, शिवस्मारकात झालेली वाटाघाटी मार्गदर्शक तत्त्वांना धरून नाही. यामुळे निविदेच्या अटी व शर्तींचा भंग झाला आहे. शिवस्मारकाच्या कामात झालेली अनियमितता बघता हा प्रकल्प पुढे रेटावा की नाही, असा माझ्यापुढे गहन प्रश्न आपल्यापुढे असल्याचा शेरा विभागीय लेखापालांनी नोंदवला आहे. त्यामुळे या सगळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या अनियमिततेत केवळ अधिकार सहभागी नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला. त्यासाठी आपण केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहणार असल्याचे विरोधकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंचाला मिळणार राष्ट्रवादीचे विधानसभेचं तिकीट!

राजकारण ही पुरुषांची मक्तेदारी समजली जाते. महिलांमध्येही राजकारण करण्याची प्रचंड क्षमता असते हे भारतीय राजकारणावर छाप पाडणाऱ्या अनेक महिला राजकारण्यांकडे पाहून सांगता येईल.
मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण लागू झाल्यानंतरही कित्येक गावांमध्ये महिला सरपंचाच्या खुर्चीवर त्या महिलेचा पती किंवा मुलगा बसून गावाचा कारभार करत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. गावोगावच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गटबाजी, वादविवाद, हाणामाऱ्या, केसेस असे सर्वसाधारण चित्र पाहायला मिळते. पण खानदेशातील एक गाव याला अपवाद ठरले.
वयाच्या १९ व्या वर्षी कल्पिता पाटील बनल्या गावच्या सरपंच
खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात कल्याणेहोळ नावाचे दोन हजारच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या गावात २०१३ साली झालेली ग्रामपंचायत निवडणूक आगळीवेगळी ठरली.जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालायात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेत शिकणाऱ्या कल्पिता पाटील या तरुणीने ही निवडणूक लढवून विजय मिळवला.
गावाला चांगली दिशा देण्यासाठी चार महिला आणि तीन पुरुष ग्रामपंचायत सदस्यांनी कल्पिता पाटील हिची एकमताने गावची सरपंच म्हणून निवड केली. महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंच होण्याचा बहुमान कल्पिता पाटील यांना मिळाला.
सरपंच होताच ग्रामविकास, महिला सबलीकरण, स्त्री भ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, महिला बचत गट अशा विषयांवर काम करुन त्यांनी आपले उच्चशिक्षण गावाच्या प्रगतीसाठी सार्थकी लावले. गावामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणून गावकऱ्यांना त्याच्याशी जोडले. राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावातील अनेक विकासकामे मार्गी लावली.
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कल्पितामधील गुण हेरले आणि तिला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. आपल्या पदाला योग्य न्याय देत कल्पिता पाटील यांनी समाजाच्या विविध प्रश्नांना हात घातला आहे.
कल्पिता पाटील विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात!
राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते पक्षांतर करुन इतर पक्षात जात असताना स्वतः शरद पवार साहेब महाराष्ट्र दौरा करुन आले. त्यांच्या दौऱ्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. प्रस्थापित नेते निघून गेल्यामुळे राष्ट्रवादीतील युवा चेहऱ्यांना संधी मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.
अशामध्ये कल्पिता पाटील यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंच आहेत आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून कल्पित पाटील यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जाऊन त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.