जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

27 October 2023

आरक्षण मागणीसाठी भोकर तालुक्यातील बटाळा, मातुळ,बोरगाव गावात साखळी उपोषण सुरु राजकीय पुढाऱ्यांना गाव प्रवेशबंदी

भोकर प्रतिनिधी: सकल मराठा समाजस ओ.बी.सी प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण द्यावे या मागणीसाठी समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनास जी मुद्दत दिली होती ती संपली असून अद्यापही ही मागणी मंजूर न झाल्याने पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलनास संबंध महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावोगावी साखळी उपोषणाने त्यांना पाठींबा दिला जात आहे.तसेच सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही कडील राजकीय पुढाऱ्यांना सदरील मागणी मंजूर होईपर्यंत गाव प्रवेशबंदी केल्या जात आहे.याच अनुषंगाने भोकर तालुक्यातील बटाळा,मातुळ येथे हे आंदोलन सुरु झाले असून दि.२८ ऑक्टोंबर रोजी बोरगाव सुधा येथे सदरील आंदोलन सुरु करण्यात येणार आहे.याबाबद भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे व पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथील मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजास ओ.बी. सी.प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण द्यावे यासह आदी मागण्यांसाठी उपषोण सुरु केले होते.सदरील उपोषणाच्या तात्पुरत्या सांगतेवेळी त्यांनी राज्य शासनाने निर्णय घ्यावा यासाठी ४० दिवसांची मुद्दत दिली होती.परंतू ती मुद्दत संपलेली असतांनाही कसलाही निर्णय शासनाने घेतला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. यामुळे राज्य शासनाच्या विरोधात सकल मराठा समाजात संतापाची लाट पसरत असून संयमाचा बांध फुटत असल्याचे निदर्शनास येत आहे.राज्यातील गावोगावी सदरील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात या यासाठी साखळी उपोषण केले जात आहेत व सर्व राजकीय पुढाऱ्यांना गाव प्रवेशबंदी केली जात आहे.काल नांदेड जिल्ह्यातील एका गावात विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत.त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत आहे असे दिसत असून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा असे म्हटल्या जात आहे.
याच अनुषंगाने भोकर तालुक्यातील बटाळा,मातुळ या गावातील सकल मराठा समाज बांधवांनी ही आंदोलन सुरु केले असून बोरगाव सुधा या गावात दि.२८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता पासून बेमुद्दत साखळी उपोळणास सुरुवात करण्यात येणार आहे.याबबद दि.२७ ऑक्टोंबर २०२३ रोजी बोरगाव सुधा येतील सकल मराठा समाज बांधवांनी तहसिलदार राजेश लांडगे व पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांना व त्यांच्या मार्फत राज्य शासनास निवेदन दिले आहे.तसेच त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली असून कुठलाही राजकीय पुढारी प्रवेश केल्यास त्याच्या जीवित्वाची व गाड्यांची जबाबदारी ही त्या राजकीय पुढाऱ्यावरच असेल.त्यामध्ये सकल मराठा समाज बोरगाव सुधा यांची कुठलीच जबाबदारी नसेल.याची दखल प्रशासनाने घ्यावी,असे नमुद करण्यात आले आहे.याच बरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या सर्व मागण्या सरकारने पुर्ण कराव्यात.मराठा समाजाला ओ.बी. सी.मध्ये समाविष्ट करुन आरक्षण द्यावे.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून घटनेमध्ये दुरुस्ती करुन आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.मागील काळामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी वस्तीगृह उभारण्यात येईल,असे राज्य सरकारने सांगीतले होते.परंतू त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे तात्काळ त्या मागणीची अंमलबजावणी करावी.उपरोक्त मागण्या जो पर्यंत मान्य होणार नाहीत तो पर्यंत आम्ही बेमुद्दत साखळी उपोषण सुरुच ठेऊ असा ईशारा ही देण्यात आला आहे.सदरील आंदोलनास गावातील एस.सी.,एस.टी,ओ.बी.सी. समाज बांधवांनी ही पाठींबा दर्शविला असून आंदोलना संबंधीत निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आनंदराव पाटील लुंगारे,शंकर पाटील जाधव,शिवानंद पाटील शिंदे,आनंद पाटील चिट्टे,प्रतापराव पाटील जाधव साईनाथ पाटील शिंदे,सुनिल पाटील पवार,माधव पाटील सुर्यवंशी,साहेबराव पाटील कदम, सरपंच प्रतिनिधी संतोष गाडले,माजी सरपंच गितेश बोटलेवाड, उमेश महाराज पुरी,रायभोळे यांसह आदींचा समावेश होता

26 October 2023

सकल मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत मातुळ मध्ये राजकीय पुढार्‍यांना गावबंदी व साखळी उपोषण

भोकर प्र- अंबादास के एल बोयावार
भोकर : तालुक्यातील मौजे मातुळ येथील सकल मराठा समाज बांधवांनी 25 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर मोटरसायकल चा भव्य मोर्चा काढून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास सक्रिय पाठिंबा दर्शविला असुन मातुळ गावांमध्ये साखळी उपोषणासाठी बसण्याचे सकल मराठा समाज बांधवांनी निश्चित करून भोकर तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या स्तरावरून साखळी उपोषणाच्या काळामध्ये कुठलाही राजकीय पुढारी गावात येणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, जर उपोषण काळामध्ये कुठल्याही राजकीय पुढारी गावांमध्ये आला तर गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी ही केली असुन या निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक भोकर यांना देखील सकल मराठा समाज बांधव मातुळ यांच्या वतीने देण्यात आले आहे.निवेदन देताना मातुळ येथील आसंख्या मराठा समाज बांधव उपस्थित होते.

24 October 2023

कुटूंबीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्याकडे केली मागणी

प्रतिनिधी भोकर : अत्यंत पुर्वनियोजन करुन कट रचून संगनमताने किनवट येथील लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार सुरेश मस्के यांचा दि.१४ ऑक्टोंबर रोजी रात्री निर्गुण खून करण्यात आला.सदरील घटनेस १० दिवस होऊन गेलीत व तपासात विलंब होत असल्याने आरोपी मोकाट राहण्याची शक्यता असून अद्यापही आरोपींना शोधण्यात किनवट पोलीसांना यश आले नाही.त्यामुळे सदरील गुन्ह्याच्या तपासणीक पोलीस अधिकाऱ्यांनी तपास गतिमान करुन मोकाट आरोपींना गजाआड करावे व मयत पत्रकार सुरेश मस्के यांना न्याय द्यावा,अशी मागणी कुटूंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने दि.२३ ऑक्टोंबर रोजी कर्तव्यदक्ष भोकर अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तर मयत पत्रकार सुरेश मस्के यांना न्याय देण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करु,असे आश्वासन अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी सदरील शिष्टमंडळास दिले आहे.

किनवट येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार सुरेश दत्तात्रय मस्के यांचा दि.१४ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्री पुर्वनियोजन करुन कट रचून काही लोकांनी संगनमत करुन निर्गुण केला व तो अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला.परंतू घटनास्थळीचे पुरावे व मयत सुरेश मस्के यांच्या शरीरावरील जखमांचे घाव पाहता तो अपघात नसून निर्गुण खून झाला असल्याचे निदर्शनास येत असल्याने कुटूंबियांच्या तक्रारीवरून किनवट पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे हे करत आहेत.परंतू सदरील तपास अतिशय संथगतीने सुरु आहे,असे कुटटूंबिय व सामाजिक कार्यकर्त्यांना वाटत असल्यामुळे मयत पत्रकार सुरेश मस्के यांचे बंधू रमेश मस्के, सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक श्याम कांबळे,राजेश कांबळे,अशोक निळकंठे, रावसाहेब वाघमारे यांसह आदींच्या एका शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक कार्यालय भोकर येथे अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांची भेट घेतली व निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातून त्यांनी म्हटले आहे की,सदरील गुन्ह्यातील गुन्हेगारांनी घटनेच्या काही दिवस आधीपासूनच याची पूर्व तयारी केली होती असे दिसून येते. त्याचे असे की,कार नादुरुस्त होण्यापासून ते प्रत्यक्ष खून होईपर्यंत या कालावधीत घडलेल्या घटनांचा घटनाक्रम पाहता यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा तपास करणे पोलीसांसाठी सहज शक्य आहे.परंतु हा गुन्हा दाखल होऊन १० दिवस झाले आहेत,तरी पण तपासाच्या बाबतीत पोलीसांनी फारशी प्रगती व तपास गतिमान केल्याचे दिसत नाही.पोलीस तपासाला जास्त विलंब झाल्यास गुन्हेगारांना त्याचा अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.कोणत्याही प्रकारचे वाद असले तरी खूनापर्यंत मजल जाणे हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अयोग्य आहे.फोरेन्सिक आणि सायबर सेल तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या काही तासात गुन्हेगारांचा छडा लावणे शक्य असतांना तसे झाले नाही हे पोलीस तपासाचे अपयशच म्हणता येईल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सदरील निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की,तपासाची गुणवत्ता व तपासातील प्रगती यांचा आढावा घेवून आपण स्वतः त्याबाबतीत निर्णय घेऊन वरिष्ठ स्तरावर तपास सोपवावा. कारण सद्या ज्या स्तरावर पोलीस तपास आहे त्याची गती व पध्दत पाहता कुठे तरी तपासाची दिशा योग्य नसल्याचे दिसत असून गुन्हेगार हे अद्याप ही हाती लागत नसल्याचे सिध्द होत आहे.गुन्हेगारांचे पकडले जाणे व दोष सिध्दीसाठी योग्य तथा सक्षम पणे तपासाला गती देणे गरजेचे आहे.त्यामुळे तपास गतिमान करावा व आरोपींना अटक करण्यात यावी आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी.तरच मयत सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार सुरेश मस्के यांना न्याय मिळेल,असे नमुद करण्यात आले आहे.

सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे गृहमंत्री,नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे पोलीस महासंचालक,नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक,नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व भोकरचे अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.निवेदन देण्यास आलेल्या शिष्टमंडळा सोबत अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी सविस्तर चर्चा केली व सदरील गुन्ह्याचा तपास योग्यरित्या केल्या जाईल आणि त्यातून मयत पत्रकार सुरेश मस्के यांना नक्कीच न्याय मिळवून देण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करु,असे आश्वासित केले आहे.

अभिमास्पद…भोकर तालुक्यातील भूमिपुत्रांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने विजयादशमी दिनी करण्यात आला सत्कार

 प्रतिनिधी भोकर : तालुक्यातील भूमिपुत्र संतोष मेंदेवाड,रा. देवठाणा व दत्ता मानेबोईनवाड रा.नांदा म्है.प.यांची भारत मातेच्या सेवार्थ भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली आहे.या दोघांना देशसेवेची सर्वात मोठी संधी मिळाली असून दोघेही लवकरच आपल्या कर्तव्यावर जाणार आहेत.ही बाब तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय अभिमानास्पद असल्याने भोकर येथे देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज दि.२४ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी दिनी या दोघांचा यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील सेवाकार्यासाठी भरभरुन शुभेच्छा देण्यात आल्या.

भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात राहून प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन जिद्द व परिश्रमाच्या बळावर भारत मातेच्या सेवार्थ संतोष गोविंद मेंदेवाड व दत्ता रोहिदास मानेबोईनवाड या तरुणांनी भारतीय सैन्य दलात भरती होण्याचा प्रयत्न केला.यात त्यांना यश आले असून भारतीय सैन्य दलात त्यांची नुकतीच निवड झाली आहे.लवकरच हे दोघे आपल्या कर्तव्यावर जाणार आहेत.त्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार करुन पाठवणी करण्याच्या उदात्त हेतूने दि.२४ ऑक्टोंबर २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे देशप्रेमी नागरिकांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे व ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,पंचायत समितीचे माजी उपसभापती सुर्यकांत बिल्लेवाड,सरपंच संघटनेचे भोकर तालुकाध्यक्ष माधव अमृतवाड,डॉ.अशोक माझळकर , पत्रकार मनोज गिमेकर,मारोती अंगरवार,मोहन राठोड,मल्लेश्वर दंतुलवाड, सुनिल मदनवाड,व्यंकट बतलवाड, पुंडलिक चिकलवाड यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित उपरोक्त मान्यवरांनी त्या दोघांचाही यथोचित सत्कार केला.तसेच मनोगत व्यक्त करुन दोघांनाही पुढील देशसेवाकार्यासाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नामदेवराव आयलवाड म्हणाले की,प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करत या तरुणांनी भारतीय सैन्य दलातून भारत मातेच्या रक्षणाचा व देश सेवेचा विडा उचलला आहे.त्यांच्या निवडीचा आम्हा सर्वांना अभिमान असून ग्रामीण भागातील अन्य तरुणांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा व आपल्या कुटूंबीयांचे,गावचे,राज्याचे आणि देशाचे नाव मोठे करावे.अशा प्रकारे प्रयत्न करणाऱ्या होतकरू तरुणांच्या पाठीशी आम्हा सर्वांच्या शुभेच्छा सदैव राहतील.असे ते म्हणाले.

22 October 2023

हाळदा उपकेंद्रात आयुष्यमान भारत कार्ड शिबिर संपन्न

 भोकर प्रतिनिधी:- तालुक्यातील मौजे हाळदा येथे आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढण्यासाठी दि.२१ ऑक्टोबर रोजी आरोग्य उपकेंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मोघाळी प्राथमिक  आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे  माजी सरपंच तथा पत्रकार बालाजी नार्लेवाड, माजी उपसरपंच मधुकरराव किसवे,शंकरराव पेरेवार आदींची उपस्थिती होती. 
  आयुष्यमान कार्डधारकांना देशातील शासनाने निश्चित केलेल्या सर्व दवाखान्यात पाच लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय सेवा व तसेच महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियाही मोफत करुन मिळतील   तेव्हा गावातील सर्व लाभधारकांनी या शिबिरात आपले आयुष्यमान कार्ड काढून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या सर्व आरोग्य सुविधाचा मोफत लाभ घ्यावा असे सांगून हे शिबिर पुढेही चालू राहील तेव्हा सर्व गावकर्‍यांनी आपले आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे व आपल्या आरोग्याची देखभाल करावी असे डॉ.नाईक यांनी सांगितले.या वेळी  गावातील ७० ते ७५  लाभधारकांनी आपले कार्ड काढून घेतले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हाळदा आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर गर्जे मॅडम,सुपरवायझर श्री माचेवाड,ए एन एम श्रीमती पोकलेवाड,श्रीमती रापतवार, श्रीमती वाघमारे व कर्मचारी यांनी मोलाचे  परिश्रम घेतले.

13 October 2023

भाजपच्या `मिशन ४५ प्लस`ला नांदेडमध्ये अपशकून...

नांदेड:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने देशभरात काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात मिशन ४५ प्लसचे ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन सुरू आहे. (BJP News) यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. आपल्या पक्षाची, खासदारांची मतदारसंघात कशी परिस्थिती आहे, याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला मुखेड, कंधार वगळता कोठेही समाधानकारक यश मिळाले नाही.विधानसभा मतदारसंघातील आमदारांना बाजार समितीच्या निवडणुकीत यश संपादन करता आले नाही. त्यामुळे मिशन ४५ प्लसचे काय होणार? याची चर्चा सुरू झाली असून, पक्षाला आपले धोरण बदलण्याची गरज व्यक्त होत आहे. (Nanded) जनाधार वाढवल्याशिवाय भाजपला ध्येय गाठता येणार नाही, अशी चर्चा जिल्ह्यात दबक्या आवाजात सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा, बिलोली, मुखेड, कुंडलवाडी, उमरी, किनवट, माहूर, इस्लापूर, भोकर, हिमायतनगर, नांदेड, कुंटुर आदी बाजार समितीच्या निवडणुका गेल्या काही महिन्यांत पार पडल्या.

या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. या निवडणुकीत कंधार, मुखेड या दोन बाजार समितीत भारतीय जनता पक्षाचे पॅनेल निवडून आले.(BJP) तर उर्वरित बाजार समितीत महाविकास आघाडीला एकतर्फी विजय मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची वज्रमूठ दिसून आली. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव केराम यांना आपला करिष्मा दाखवता आला नाही.
खासदार, आमदार ठरले फेल...

काँग्रेसला सोबत घेऊन पॅनेल तयार करण्याचा त्यांचा प्रयोग मतदारांनी झिडकारला. माहूर, किनवट या दोन बाजार समितीत भाजप समर्थक पॅनेलचे प्रत्येकी चार उमेदवार निवडून आले. इथे आमदार असूनसुद्धा पक्षाला यश मिळवता आले नाही. नायगाव विधानसभा मतदारसंघातील उमरी बाजार समितीच्या निवडणुकीत तर महायुतीच्या पॅनेलला भोपळाही फोडता आला नाही. आमदार राजेश पवार यांना आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याची संधी होती, पण या ठिकाणी आमदार, खासदारांचे काही चालले नाही.

हीच परिस्थिती कुंडलवाडी, बिलोली लोहा या कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी पक्षातील गटबाजीवर मात करून यश संपादन केले. या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याने काँग्रेसला साथ देऊन उमेदवार उभे केले होते, अशी चर्चा आहे. या पदाधिकाऱ्याचा एकही समर्थक निवडून आला नाही, तर कंधारमध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी बाजार समितीत विजय संपादन केला, पण लोह्यात त्यांचे मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी त्यांची दाळ शिजू दिली नाही.बाजार समित्यांशी ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, मजूर जोडला गेला आहे. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याची ही एक संधी असते. ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे संचालक, व्यापारी हे या निवडणुकीत मतदार असतात, त्यांचा थेट मतदारांशी संपर्क असतो. त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांचा पक्षवाढीसाठी खूप मोठा फायदा होतो. जेव्हा ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणुका होतात तेव्हा पक्षाने लक्ष घालून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.

तसे झाले नाही तर बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार व एक खासदार, एक विधान परिषद सदस्य असे चार आमदार असतानाही भारतीय जनता पक्षाचा फारसा जनाधार वाढला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. पक्षांतर्गत हेवेदावे, गटबाजी, जनसंपर्काचा अभाव यामुळे पक्षाची बाजू कमकुवत होत चालली आहे.लोकसभा निवडणूक जेमतेम सहा ते सात महिन्यांवर येऊन ठेपली असताना बाजार समितीच्या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली असती, तर एक चांगला संदेश मतदारसंघात गेला असता; पण तसे न झाल्याने `मिशन ४५ प्लस`ला बाजार समितीच्या निवडणुकीतील अपयशाचे अपशकून झाले. लोकसभेचे वातावरण, मतदार, प्रश्न, उमेदवार वेगळे असतात हे जरी खरे असले तरी छोट्या मोठ्या निवडणुकीत मिळालेले यश हे पक्षवाढीला व पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

12 October 2023

माणूस कामानेच मोठा होतो म्हणून कामाची उपेक्षा करू नका- सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे

भोकर प्रतिनिधी:- कोणतेही काम हलके न समजता मिळालेले काम मन लावून करा. कारण कोणताही मनुष्य त्याच्या कर्मानेच मोठा होऊन यशाची शिखरे पादाक्रांत करत असतो असे विचार नांदेड येथील सहाय्यक समाज कल्याण आयुक्त मा.शिवानंद मिनगीरे यांनी बोलताना व्यक्त केले. ते भोकर शहरातील भगवान विश्वकर्मा मंदिरात आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना नोंदणी शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर.सारंगधर, खादी ग्राम उद्योगाचे प्रमुख यादव सर,मंडळ अधिकारी मगरे आदींची उपस्थिती होती.
   पुढे बोलताना त्यांनी सांगितले की स्वकर्म हीच आपली पूजा आहे म्हणून कोणतेही काम हलके समजू नका अनेक महापुरुषांनी आपल्या वाट्याला कितीही कमी दर्जाचे काम आले तरी त्यांनी त्या कामाचा आदर करून श्रद्धापूर्वक कामे केली म्हणून ती आज अजरामर आहेत. हे पटवून सांगताना त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम लिंकन यांचे उदाहरणे देऊन हे महापुरुष आपल्या कर्मयोगानेच श्रेष्ठ बनले असून अजरामर झाले आहेत तेव्हा प्रत्येकानी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रद्धेने व मन लावून कामे करावीत असे सांगितले. पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांनी भारतातील बारा बलुतेदार समाज स्वयंपूर्ण झाला तरच आपला देश उन्नती साधू शकतो व स्वावलंबी बनु शकतो हि बाब लक्षात घेऊन अठरा पगड जातीच्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे प्रत्येक बारा बलुतेदार समाजातील व्यक्तींनी या योजनेत आपल्या नावाची नोंदणी करून आपल्या उद्योगासाठी आर्थिक लाभ मिळवून घ्यावा व आपली,आपल्या कुटुंबाची व परिणामी आपल्या राष्ट्राची उन्नती साधावी असे उपस्थितांना आवाहन केले. या योजनेचा शुभारंभ भगवान विश्वकर्मा यांच्या आरतीने व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.यावेळी मंदिराचे महंत परमेश्वर महाराज,नागनाथराव देशमुख,बालाजी खरगे पाटील,एस.आर. सारंगधर,अॅडो.परमेश्वर पांचाळ,दत्तात्रय पांचाळ,पत्रकार बांधव आदीसह अनेकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वकर्मा प्रतिष्ठान,विश्वकर्मा युवा संघ व विश्वकर्मा महिला संघ भोकर यांनी मोलाचे परिश्रम घेतले. प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना नोंदणी कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील शेकडो कारागिरांनी आपला सहभाग नोंदवुन आपल्या नावाची नोंदणी करून घेतली.

09 October 2023

भोकर तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा धुमशान सुरु

१६ ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात;तर ५ नोव्हेंबर रोजी मतदान

भोकर : महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग यांच्या आदेशाने राज्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती,नव्याने स्थापीत व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणक प्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागाच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला असून भोकर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा यात समावेश आहे.दि.१६ ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात होणार असून दि.५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी व २ हजार ९५० सदस्यपदाच्या आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे,अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी.एस.मदान यांनी केली असून सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव के.सूर्यकृष्णमूर्ती यांनी लेखी पत्राद्वारे आदेशित केले आहे.याच अनुषंगाने भोकर चे तहसीलदार तथा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी राजेश लांडगे यांनी भोकर तालुक्यातील भुरभूशी,सावरगांव मेट,गारगोटवाडी दि.,रहाटी बु.,मातुळ,दिवशी बु.,धावरी बु.,सायाळ, चिदगीरी व चिंचाळा प.भो.या १० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने निवडणूक होत असलेल्या उपरोक्त १० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

उपरोक्त ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी रिंगणात उतरु इच्छिणाऱ्या उमेदवारांना दि.१६ ते २० ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील.नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.२३ ऑक्टोंबर २०२३ रोजी होईल व नामनिर्देशनपत्रे दि.२५ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत मागे घेता येतील. तसेच त्याच दिवशी वैध नामनिर्देशित उमदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.तर दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान करता येणार आहे व दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी भोकर तहसिल कार्यालयाच्या तळमजल्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.होऊ घातलेली निवडणूक कायदा,शांतता,सुव्यवस्था व आचारसंहितेचे पालन करुन निर्भयपणे पार पाडण्यासाठी तहसिलदार राजेश लांडगे व पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे हे आपआपली यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.तर गावगाड्याचा कारभारी थेट जनतेतून निवडायचा असल्याने गटागटात चुरशिचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळी पुर्वीच फटाके व आतिषबाजीने विजयाचा जल्लोष करण्यासाठी भावी गावकारभाऱ्यांत निवडणूकीचा धुमशान सुरु झाला आहे.

08 October 2023

शेगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा उत्सहात संपन्न

 शेगाव 
हजारो भाविकांनी घेतल दर्शन
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा दिनांक 6 व 7 आक्टोबर 2023 रोजी संत नगरी शेगाव येथील गणेशप्रस्थ मंगल कार्यालय, एम. एस. ई. बी. चौक खामगाव रोड, येथे दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी जगद्गुरुश्रींचे दर्शन घेतले. भाविकांनी गुरुमाऊलींचे दर्शन घेण्यासाठी रेल्वे स्टेशन पर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आढळून आल्या. गुरुमाऊलींचे दर्शन कधी होणार यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती पण प्रत्यक्ष दर्शन होताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतांना दिसून आला.गुरुसेवकांच्या अतिशय शिस्तबद्ध पध्यतीने,सूक्ष्म नियोजनाने सोहळा अतिशय सुंदर संपन्न झाला. येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही दिवसभर करण्यात आले होते. गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी अमरावती, यवतमाळ ,अकोला ,बुलढाणा,वासिम,नांदेड,हिंगोली,परभणी,नागपूर, या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भाविक, भक्तगनाची रीघ लागली होते. माऊली या सोहळ्यात आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांच्याशी बोलताना म्हणाले की मी यांची समस्या सोडवत नाही तर आध्यात्म,व विज्ञान याची सांगड घालून डोळे विज्ञानवादी ठेवून मन एकाग्र करून दिवसातून फक्त दहाच मिनिटे भक्ती केली तर जीवन उत्तम जगता येते त्याचं बरोबर भक्ती हा मनाचा व्यायाम असून भक्ती केल्यामुळे निर्णय क्षमता योग्य बनून जीवनात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने जीवन सुजलाम,सुफलाम बनते व आनंदी संसार होतो त्याकरिता प्रत्येकानी आपल्या आवडीच्या देवाची भक्ती करावी.असा सल्ला देतो जो याप्रमाणे वागतो. तो जीवनात सफल होतात त्यांना माझा विश्वास येतो म्हणून लोक मला देव मानतात मी कधीच कोणाला गंडा,धागा,दोरा,मंत्र,तंत्र,जादू, टोना करीत नाही ना याचे समर्थनही करीत नसून मी पूर्णपणे अंधश्रध्ये च्या विरोधात असून लिंबू,टाचण्या, गंडे,दोऱ्या ह्या निव्वळ बनवा बनवी असते त्यामुळे माझ्या कडे अलात माझ्यावर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने मी सांगतो त्या पद्धती ने दिवसातून फक्त दहा मिनिटे भक्ती करा,स्वप्नातही कोणाचे वाईट चिंतू नका,पाहा तुमचे कसे चांगले होत नाही.असे म्हणून सद्या ग्लोबल वॉर्मिग चा प्रश्न खुप भेडसावत असून येणाऱ्या पिढीला तो हानिकारक आहे व माझ्या लेकरांना म्हणजेच भक्तांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या वर्षी पासून म्हणाजेच माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने माऊली माहेर सिमुरगव्हाण पाथरी जिल्हा परभणी,नाशिक,आणि मुंबई या तुम्ही उपापिठा वरून पाई दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे कारण म्हणणे सकाळी लवकर उठून पाई चालल्याने सुध्द्ध ऑक्सिजन मिळत असते त्यामुळे ब्लड प्रेशर व्यवस्थित राहून,वजन कमी होवून शारीरिक कष्ट होवून तब्येत चांगली राहते,अध्यात्मिक प्रगती होवून पुण्य संचय होतो व माझी वांसुधरा या उपक्रमअंतर्गत दिंडी मार्गावरील सर्व परिसर स्वच्छ ठेवन्यासाठी सर्वजण एकमताने काम करतात त्याचरोबर वृक्ष लावून ते जागिण्यासाठी संदेश मिळतो त्यातून वातावरणातील उष्णता,जल,आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे.जर आज जल,जंगल,व आरोग्य टिकवून ठेवू शकलो नाही तर येण्याऱ्या पिढिला काय जवाब देणार असेही स्वामींनी आवर्जून म्हणाले महणून या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील दिंडी ही 21ऑक्टबर ला नानिज धाम येथे पोहचणार आहेत तरी यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा असे ही सांगण्यात आले .
त्यावेळी अनेक भाविक यांनी आप आपले अनुभव कथन केले.
 दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन सोहळा यशस्वी करण्यासाठी पश्चिम विदर्भ पिठाचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे,पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल ,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे ,पीठ महिला निरीक्षक सौ. लताताई चिंचोले, पीठ युवा निरीक्षक सतीश पाध्ये,पीठ लेफ्टनंट जनरल प्रफुल्ल धोटे, पीठ गुरु सेवक प्रमुख सौ. आरती वर्धेकर ,स्वागत कक्ष विभागातील सुधाकर मेहसर ,पिठ समितीचे अशोकराव धुमाळे, चंद्रशेखर टेंभेकर, अशोक गोंदाने, वैभव भिसे,जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे,अविनाश देशमुख, महेंद्र देशमुख ,विनायक सवई, गणेश देशमुख,जिल्हाध्यक्ष कैलास डोंगरकर यांच्यासह पीठ समितीचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष ,हिंदू संग्राम सेना ,युवा सेना ,महिला सेना आदीनी मेहनत घेतली.



Byt 1 जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज
Byt 2 कॅन्सर मधून ठीक झालेला रुग्ण
Byt 3 सुनेला अपत्य नव्हते पण स्वामीजींच्या कृपेने मुलगा झाला अनुभव सांगणारी महिला.


07 October 2023

आत्महत्यापूर्वी लिहलेल्या पत्रात पोलीस अधिकाऱ्याने कुटुंबाला लिहिले भावनिक पत्र, वरिष्ठावर देखील केले आरोप

आदरणीय सर,

माझा जन्म शालेय कागदपत्रानुसार एक जानेवारी 1976 या दिवशी आहे. मला आठवत नाही माझी आई कधी वारली किंवा कशी वारली. मी एक वर्षाचा असताना कधीतरी तिचे निधन झाले त्यानंतर माझी सखी मावशी माझी सावत्र आई म्हणून मला लाभली. तिने माझा सख्ख्या आई पेक्षाही जास्त प्रेमाने सांभाळ केला. मी नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये माझे महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

मी एक डिसेंबर 1998 रोजी पोलीस शिपाई या पदावर गडचिरोली जिल्हा पोलीस दलामध्ये भरती झालो. 9 डिसेंबर 2021 रोजी माझा विवाह वंदना सोबत झाला. छोटे मोठे कौटुंबिक कलह सोडले तर आमच्या मध्ये कुठल्याही विषयावर कुठलाही मतभेद अद्यापपावेतो तरी नाही. आमचा एक सुविध्य आणि सुंदर गोंडस असा एक मुलगा आहे असित..! त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्याच्या भवितव्याबद्दल त्यांनी खूप खूप प्रगती करावी माझं नाव त्याने रोशन करावं ही माझी इच्छा आहे.त्यानंतर सन 2002 साली माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मी उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस आस्थापनेवर बदली करून आलो.गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर असताना मी सन १९९९ ते २००२ या कालावधीत नक्षलवाद विरोधी विशेष अभियान पथक सी सिक्सटी प्राणहिता येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा स्थापनेवर बदली झाल्यानंतर 2002 ते 2005 या कालावधीत पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर सन 2005 ते 2011 या कालावधीत पोलीस ठाणे नळदुर्ग येथे गोपनीय शाखेचे कामकाज पाहिले त्यानंतर 2011 ते 2013 या कालावधीत जिल्हा विशेष शाखा उस्मानाबाद येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक या पदावर खात्याअंतर्गत सरळ सेवा भरतीने आमची नियुक्ती पोलीस उपनिरीक्षक या पदावर झाल्याने दिनांक 15 ऑक्टोबर 2013 रोजी आम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण कामे रुजू झालो. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे आम्हाला पुणे शहर आयुक्तालय येथे परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे कामी नियुक्त करण्यात आले. परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर आमची पोलीस ठाणे शिवाजीनगर पुणे येथे नियमित नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक पुणे शहर येथे काही दिवस नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर आम्ही माननीय पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे विनंती अर्ज केल्याने माझी बदली सोलापूर शहर आयुक्तालय येथे झाली.सोलापूर शहर आयुक्तालय या ठिकाणी मी शहर वाहतूक शाखा येथे तब्बल पाच वर्ष कर्तव्य बजावले. त्यानंतर सदर बाजार पोलिस स्टेशन सोलापूर शहर येथे तब्बल आठ ते नऊ महिने कर्तव्य बजावले. त्यानंतर माझे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचे प्रमोशन आल्यामुळे माझी बदली नांदेड परिक्षेत्र नांदेड जिल्हा येथे झाली. पोलीस ठाणे देगलूर येथे आम्हाला माननीय प्रमोद शेवाळे सर यांनी संलग्न केले होते. त्यानंतर अकरा महिन्यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी माझी बदली पोलीस ठाणे बिलोली येथे केली आहे. जेव्हापासून मी पोलीस ठाणे बिलोली येथे हजर झालो आहे तेव्हापासून माझ्या बाबतीत सर्व गोष्टी वाईट घडत आहेत. मला माहित नाही हे कशामुळे घडत आहे परंतु मला या सर्व गोष्टींची पूर्णपणे जाणीव होत आहे. वेळेवर पोलीस मदत न मिळणे, तपासाला दिलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होणे, कोणत्याही प्रकारचा मदतनीस गुन्ह्याच्या तपासकामी न देणे, जातीय दृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोपपत्र पाठविणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या बाबतीत सातत्याने घडत आहेत. मदत देणे बाजूला राहिले गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा दिरंगाई आरोपीला मदत होईल असे कार्य केले म्हणून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून मलाच ज्ञाप किंवा कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात येत आहेत.माझी मनस्थिती पूर्णपणे ढासळून गेलेली असून मी मागील सहा महिन्यापासून अक्षरशः नैराश्याच्या गर्तेमध्ये बुडून गेलो आहे. माझ्या २५ वर्षांच्या नोकरीतील एकंदर पार्श्वभूमीवरून कोणाच्याही लक्षात येईल की मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचारी किंवा निष्काळजीपणा करणारा कामचलाऊ अधिकारी नाही.

मी मागील चार महिन्यांपासून मला गुन्हयांचे तपासकामी मदतनीस मिळावा याकरिता बरेच वेळा माननीय नरुटे साहेब, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बिलोली, तसेच माननीय परीविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री कसेकर साहेब यांना वेळोवेळी विनंती केली परंतु देतो देतो म्हणून त्यांनी मला कधीही मदतीसाठी कोणालाही दिले नाही. मध्यंतरी माझ्याकडे गुरनं ४४/२०२३ व गुरनं ५०/२०२३ असे तपासाकरिता देण्यात आले होते. या दोन्ही गुणांची सामाजिक दृष्ट्या फार मोठी व्याप्ती होती. त्यादरम्यान सदर गुन्ह्याच्या तपासकामी माननीय वरिष्ठांचे तसेच बिलोली शहरातील नागरिकांचे यातील आरोपींना अटक करणे बाबत मोठ्या प्रमाणावर दडपण आमच्या मनावर होते. त्यातच इतर गुन्ह्यांचा तपास देखील आमच्याकडे देण्यात आलेला होता. अपुरी मदत व इतर गुन्ह्यांचा तपास यामुळे आम्हाला सदर गुन्ह्याच्या तपासात व आरोपी अटक करणे कामी बराच विलंब झाल्याने आपोआपच आमच्याकडे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली. तसेच आमचे मानसिक दडपण वाढले. त्यातच अटक आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करणे कामी सदर गुन्हयातील मोबाईल फॉरेन्सिक तपासणी करिता पाठविले असता सदर मोबाईल दोन वेळा किरकोळ त्रुटीवर परत आले. सदर त्रुटींची पूर्तता करून ते मोबाईल परत पाठवले असता नंतर देखील ते विविध कारणास्तव परत पाठविण्यात आले. त्यामुळे सदरचे गुन्हे फॉरेन्सिकच्या त्रुटीवर मोबाईल परत आल्याने प्रलंबित आहेत. दरम्यान फॉरेन्सिकला पाठविण्याकरिता तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्याने त्यांनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे शिफारशीसह सदरचे मोबाईल परत तपासणीसाठी पाठवणे बाबत तोंडी कळविले आहे.आम्ही कोणत्याही आरोपीला कसलेही प्रकारची मदत होईल याकरिता कोणत्याही प्रकारचे कृत्य केलेले नाही अथवा गुन्ह्याचे तपासात व आमचे कर्तव्यात हयगय व निष्काळजीपणाचे कृत्य केलेले नाही. तरी आम्हाला सदरचे मोबाईल फोन्स फॉरेन्सिकला पाठवण्याकरिता शिफारस मिळण्यास विनंती होती. तसेच दरम्यानचे काळात विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा, इतर पोलीस स्टेशनचा चार्ज, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त, आजारपण आल्याने देखील सदर गुन्ह्याचे तपासाकडे लक्ष देता आलेले नाही सध्या सदर गुन्हयाचा तपास पूर्ण झालेला असून केवळ मोबाईल फोरेन्सिकला पाठविणे बाकी असल्याने सदरचे गुन्हे प्रलंबित आहेत.आपण विनाकारण वरील नमूद गुन्हयामध्ये माझ्यामागे हात धुऊन लागल्याचे मला स्पष्टपणे जाणवत आहे. मदतीला एखादा अंमलदार न देणे हे देखील जाणून-बुजून केल्यासारखे वाटत आहे. एका दिवसात दोन दोन गुन्हे तपासाला देणे हे देखील कितपत योग्य आहे? माझी मानसिकता पूर्णपणे ढासळून गेली असून माझे मनात नैराश्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे सतत माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. या सर्व गोष्टी मला अगदी असह्य झालेल्या आहेत. त्यामुळे मला क्षमा करावी मी आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपीने सूडबुद्धीने त्याचे वडिलांकरवी आमचे विरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केलेली असताना आम्ही नमूद गुन्हयातील आरोपीस मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ही बाब या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो. माझ्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचे एकमेव कारण गुन्हा रजिस्टर नंबर 44/2023 याचे तपासात लागलेला विलंब हेच आहे. आम्ही जाणून बुजून कोणत्याही प्रकरणाचा तपास प्रलंबित ठेवलेला नाही. गुन्हा रजिस्टर नंबर 143/2023 चा तपास देखील मी ईमाने इतबारे करीत होतो. परंतु प्राप्त परिस्थितीनुसार मला सदर गुन्हयाचा तपास निर्धारित वेळेत पूर्ण करता आला नाही. ऐन महत्त्वाचे वेळी माझ्याकडे कुंटूर पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला. चार्ज देऊन परत येत असताना त्यातच माझा अपघात होऊन माझा उजव्या बाजूचा जबडा फ्रॅक्चर झाला.

मी आतापर्यंत 25 वर्ष शासनाची इमाने इतबारे सेवा बजावलेली असून पोलीस ठाणे बिलोली येथे हजर झाल्यापासून माझ्या बाबतीत अनेक उलट सुलट गोष्टी घडत असल्याचे मला प्रकर्षाने जाणवत आहे. माझे पश्चात माझी पत्नी व माझा मुलगा यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये ही माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मोलाची साथ दिली त्या सर्वांचा मी ऋणी आहे.

चिमू आणि पिल्लू मला माफ करा मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान देऊ शकलो नाही. अपेक्षा करतो की, माझ्या पश्चात तुम्ही दोघेही जीवाचे रान करून चांगल्या भवितव्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे अनेक शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चिमू मला माफ कर.


माझ्या सर्व बॅचमेट मित्रांना माझी विनंती आहे की, माझ्या कुटुंबाला कोणतीही प्रशासकीय अडचण येणार नाही यासाठी माझ्या कुटुंबीयांना मदत करावी.आदरणीय हानपुडे-पाटील सर आपण हजर झाले बरोबर मला समक्ष सांगितले होते की लवकरात लवकर यातील मुद्देमाल फॉरेन्सिकला पाठविण्याकरिता माझ्याकडून शिफारस घ्या व सदरचा मुद्देमाल फॉरेन्सिकला पाठवून लवकरात लवकर सदरच्या गुन्ह्याची निर्गती करून टाका तुम्हाला पाहिजे ती मदत मी करतो. आणि आज मी शिफारस मिळणेकामी पत्र पाठविले असता आपण मला विलंबाचा खुलासा मागविला असून त्यासोबतच मी आरोपीला मदत करीत असल्याचा व गुन्ह्याचे तपासात हयगय व निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप माझ्यावर ठेवलेला आहे हे कितपत योग्य आहे? हेच कारण आहे की मी मध्यंतरी थोडासा नैराश्यात गेलो होतो. तसेच माझे कामात मन लागत नव्हते. साहेब आपण मला एक संधी द्यायला हवी होती. परंतु परिस्थितीला ते मान्य नसावे म्हणून माझ्याकडील पेंडिंग होण्याची संख्या वाढत गेली. चिमू माझ्या पॅंटीच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील खिशात एक चिठ्ठी आहे.

जय हिंद

धन्यवाद.

कळावे आपलाच
आनंद प्रकाश मळाले

PSIवरुन APIपदी बढती, पण पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:ला संपवलं; तपासातून मृत्यूचं कारण समोर

नांदेड: जिल्ह्या येथील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आनंद प्रकाश मळाले (वय ४७ वर्ष, रा.सम्राट अशोक हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) असं पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. आनंद मळाले हे नांदेड पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची बाब सदर बाजार पोलीस ठाण्याला कळताच सोलापूर पोलीस दलातील सर्वच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. एपी.आय मुनिर मुल्ला यांनी आनंद मळाले यांना पहाटेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.नांदेड पोलीस दलातील अधिकारी आनंद मळाले हे गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर होते. पत्नी, एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. शनिवारी पहाटे राहत्या घरी त्यांनी नैराश्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या पत्नीला गोळीचा आवाज आल्याने त्या बाहेर अंगणात धावत आल्या. पत्नीच्या डोळ्यासमोर आनंद मळाले रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नीने जोरात आरडाओरड करत घरातील आणि इतर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना बोलावून घेतले.सदर बाजार पोलीस ठाण्याला ही घटना कळताच ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. एपी.आय मुनिर मुल्ला यांनी आनंद मळाले यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. सोलापूर पोलीस दलातील उपायुक्त विजय कबाडे, एसी.पी राजू मोरे, पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर आदी घटनास्थळी दाखल झाले होते.

एसीपी. राजू मोरे यांनी दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना खूपच वाईट आहे. आयुष्यामध्ये कोणत्याही संकटावर उत्तर मिळू शकते. कुटुंबीयांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, सहकारी मित्रांशी चर्चा केली असती तर आज आनंद मळाले यांच्यासोबत ही घटना घडली नसती. जीवनात प्रत्येक माणसाला कामाचा ताण, टेन्शन आहेच. प्रत्येकाने सकारात्मक राहून आयुष्य जगणे आवश्यक आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.

03 October 2023

मराठा महिला आंदोलकांना अशोकराव चव्हाण यांची भेट

 नांदेड : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात सरकारने एक महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्यामुळे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले. पण साखळी उपोषण चालूच आहे. त्याचप्रमाणे नांदेड येथे सकल मराठा महिलांच्या वतीने साखळी उपोषण चालू आहे. त्याचा आज चौथा दिवस होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.यावेळी आंदोलनकर्त्यांशी हितगुज करताना चव्हाण म्हणाले की, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आम्ही आमच्या परीने काम करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हैद्राबाद येथील काँग्रेस कमिटीच्या बैठकीत पन्नास टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी ठराव घेतला व ते केंद्र सरकारला पाठविला आहे, असे ते म्हणाले. याआधीच्या सरकारने वेळोवेळी फसवे आरक्षण देऊन समाजाची प्रचंड निराशा केली आहे, तसेच आताही होऊ नये, म्हणून समाजातील अभ्यासू कार्यकर्त्यांसह समाजबांधव सरकारच्या प्रत्येक बाबींकडे बारकाईने लक्ष देत आहेत.

कृष्णा मंगनाळे, डॉ. स्मिता गायकवाड, सुरेखा रावणगावकर, रत्नमाला जाधव या महिला उपोषणकर्त्यांसह मीनाक्षी पाटील, सोमवारी संगीता सूर्यवंशी, शैलजा पाटील, संतोषी पवार, कविता आगलावे, प्रियंका कैवारे यांच्यासह चव्हाण यांच्यासोबत माजी आ. अमर राजुरकर, मीनल खतगावकर, माजी महापौर जयश्री पावडे, आनंद चव्हाण, डॉ. रेखा पाटील, किशोर स्वामी, संगीता डक, विठ्ठल पावडे यांची उपस्थिती होती.

02 October 2023

अखेर प्राचार्यांना उपोषणाला बसावच लागलं

भोकर:अनेक दिवसांपासून भोकर शहरातील गैरवाहतूकीच्या कोंडीमुळे जनता त्रासून गेली आहे. त्याबद्दल सर्वांच्याच मनात असंतोष खदखदत होत आहे. लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना, महिला, वृध्द यांना रस्त्यावर चालणं अक्षरशः अशक्य झालं आहे. शहरातील सर्व पत्रकारांनी आपल्या लेखनातून कॅमेऱ्याने वारंवार या प्रश्नावर आवाज उठवला असला तरी प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.

गेल्या महिन्यात सात तारखेला भोकरमधील सर्व स्तरातील जनतेनं विविध राजकीय पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन पालिका प्रशासन व तहसीलदार यांना अल्टिमेटम दिले होते. याच धर्तीवर शाहू महाराज विद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख यांनी १७ सप्टेंबर पासून उपोषणाला बसण्याची तयारी दाखवली. मग प्रशासनानं अचानक १६ तारखेला भोकरमधील रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्यास सुरुवात केली. त्यात अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांना त्रास झाला. तो होईल हे गृहीत धरून प्राचार्यांनी या छोट्या व्यावसायिकांना सन्मानाने व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या मागणीला हरताळ फासला गेला. कोणत्याही नियोजनाशिवाय ती कारवाई केली. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. वाहतूक व्यवस्था तर सुरळीत झालीच नाही. पण दुसऱ्याच समस्या निर्माण झाल्या.

या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात म्हणून प्राचार्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सद्हेतूनं  उपोषणाला २ ऑक्टोबर पर्यंत स्थगिती दिली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अखेर शाहू महाराज विद्यालयाच्या प्राचार्यांना शहरातील गैरवाहतूक कोंडी च्या विरोधात उपोषणाला बसावे लागलेच.

भोकर मध्ये भव्य मिरवणूकीने प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी

भोकर : भोकर मध्ये इस्लाम धर्म संस्थापक हजरत प्रेषित मोहंमद पैगंबर यांची जयंती अर्थातच ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली व  काढण्यात आलेल्या मिरवणूकीत (जुलूसमध्ये) मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या लहान थोर मुस्लीम बांधवांनी "नारा-ए-तकबीर,अल्लाहू अकबर,यांसह आपल्या प्रेषितांचा जयघोष" मोठ्या उत्साहात करत ही जयंती साजरी केली.

इस्लाम धर्म कालगणनेनुसार ‘रबीऊल अव्वल’ या महिन्याच्या १२ तारखेला प्रतिवर्षी इस्लाम धर्म संस्थापक प्रेषित मोहंमद पैगंबर यांची जयंती साजरी केली जाते. परतू यावर्षी अनंत चतुर्दशी श्री गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादुन्नबी हे एकाच दिवशी आल्याने आपापल्या श्रद्धास्थानांच्या मिरवणूका काढतांना धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखला जावा,कायदा,शांतता व सुव्यवस्थेचे पालन व्हावे आणि शासन,पोलीस प्रशासनावर ताण पडू नये म्हणून संबंध राज्यात अनंत चतुर्दशीला दि.२८ सप्टेंबर २०२३ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त होणारे कार्यक्रम,उपक्रम,मिरवणूका काढण्यात येऊ नयेत असे आवाहन करण्यात आले होते. तसेच दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य सरकारने सुट्टी ही जाहीर केली होती.सरकार,पोलीस प्रशासनाच्या उपरोक्त आवाहनास राज्यातील मुस्लीम बांधवांनी प्रतिसाद दिला व दि.२८ सप्टेंबर रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते.याच अनुषंगाने ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव समिती भोकर ने दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रेषित मोहंमद पैगंबर यांची जयंती साजरी करण्याचा व जयंती निमित्तची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार दि.१ ऑक्टोबर २०२३ रोजी सईद नगर, भोकर येथील 'मस्जिदे आयेशा' येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.इस्लामी ध्वज,फुलांचे हार,फुगे लावून चारचाकी रथ वाहन सजविण्यात आले होते व त्यात  ‘मदिना शरीफ’ ची प्रतिकृती उभारण्यात आली आणि 'जुलूस-ए-मुहम्मदी’ भव्य मिरवणूक मुख्य रस्त्याने काढण्यात आली.पारंपरिक पद्धतीने 'फातिहा पठण' करत,"नारा-ए-तकबीर,अल्लाहू अकबर,यांसह आपल्या प्रेषितांचा जयघोष" मोठ्या उत्साहात करत निघालेल्या या मिरवणुकीत हाजी ईद्रीस सेठ,हाजी इमरान सेठ, सामाजिक कार्यकर्ते शेख युसुफ भाई,माजी नगरसेवक शेख जवाजोद्दीन बरबडेकर,माजी नगरसेवक शेख मकसूद गोंदवाले,काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शेख रियाजोद्दीन बरबडेकर,सामाजिक कार्यकर्ते बाबाखाॅन पठान,एस.टी.कर्मचारी संघटना नेते म.ताजोद्दीन,बांधकाम गुत्तेदार शेख आमिर भाई,एम. आय.एम.नेते जुनेद पटेल,भाजपाचे शेख अर्शद अहेमद, शेख सऊद गोंदवाले,शेख अयूब भाई,करीम करखेलीकर,व्यापारी आतीफ भाई दातारवाले,रफिक भाई मेडीकलवाले,शेख अश्शू,बांधकाम कंत्राटदार शेख सलमान,एकबाल भाई मेकॅनिक,यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व लहान थोर मुस्लीम बांधव मोठ्या सहभागी झाले होते.

सदरील मिरवणूकी दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे जमियत-ए-उलैमा-ए-हिंद चे जिल्हा उपाध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक नेते मौलाना मुबीन खाॅन इनामदार यांनी ईद-ए-मिलादुन्नबी समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व पदाधिकारी आणि सहभागी मान्यवरांचा शॉल व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान केला.तर ईद-ए-मिलादुन्नबी समितीच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक,भोकर येथे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे,सहा.पो.नि.रसूल तांबोळी,पो.उप.नि.राम कराड, यांच्यासह पोलीस अधिकारी,कर्मचारी,गृह रक्षक दलाचे जवान (होमगार्ड),राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,भोकर तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,जेष्ठ पत्रकार शेख लतिफ भाई,पत्रकार एजास कुरेशी,यांसह आदी पत्रकार बांधवांचा शॉल व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

अतिशय शांततेत व उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीचा ईदगाह मैदान,भोकर येथे सामुदायिक प्रार्थनेने समारोप करण्यात व अन्नदान करण्यात आले. भोकर शहरात प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रम,उपक्रम व मिरवणूक आनंदोत्सवात यशस्वी झाली.हे सर्व यशस्वी करण्यासाठी ईद-ए-मिलादुन्नबी समिती भोकर चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हमीद खान पठाण,उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मन्सूर खान पठाण,शेख नाजीम भाई,पत्रकार शमीमोद्दीन इनामदार, बाबूभाई तामसेकर,यूसूफ सेठ दातारवाले,एजाज भाई लाईनमेन,आवेस तामसेकर,सलमान तामसेकर,आसिफ तामसेकर यांसह सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व मुस्लीम बांधवांनी परिश्रम घेतले.तर यादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता