जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

23 August 2022

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध

 नांदेड दि . 23 : - जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी काढला आहेत . जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 ( 1 ) अन्वये 31 ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन ते 9 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे . या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत : चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी . हा आदेश 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 9 सप्टेंबर रोजी 24 वाजेपर्यंत श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील , डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले , वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास , ऱ्हदयास आरोग्यास , जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता व सुरीक्षततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक / धारक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे . असेही आदेशात नमुद केले आहे .

मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि . 23 : - मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागतनगर , मालेगाव रोड नांदेड येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक , उच्च माध्यमिक , पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांना नुतन प्रवेशासाठी 30 ऑगस्ट 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत . यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही . अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी , असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे . अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रक , सन 2021-22 या वर्षाचे तहसिलदार कार्यालयाने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्राची सत्यप्रत साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे . प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 22 ते 30 ऑगस्ट 2022 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील . या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील . विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल . या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे . विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो . मागासवर्गीय विद्यार्थ्यांना  20 टक्के जागा राखीव आहेत . प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही , असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे .

अग्नीवीर भरतीतील उमेदवारांना प्रशासनाकडून उत्तम सोयी सुविधा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

 औरंगाबाद : देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेल्या तरूणांना लष्कर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे . औरंगाबाद शहरात होत असलेल्या अग्नीविरांच्या भरतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी भरतीतील उमेदवारांना सोयी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे . ही स्तुत्य अशी बाब आहे . जिल्हा प्रशासनानेही भरतीत सहभागींसाठी उत्तम
 भोजन , वाहतूक , स्वच्छता गृहे आदींची चोख व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले . महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळावा , मातृभूमीची सेवा आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासनाच्या अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवीर जनरल ड्युटी ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर ट्रेडसमन ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर तांत्रिक ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर लिपिक , भांडारपाल तांत्रिक ( सर्व शस्त्र ) या पदांसाठी भरती प्रक्रिया 13 ऑगस्टपासून शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानांवर सुरू झालेली आहे . भरती प्रक्रिया 08 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे . या निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांना 13 नोव्हेंबर रोजी सामाईक प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे . शिस्तबद्ध पारदर्शक , नि : पक्षपाती पद्धतीने व योग्य नियोजनाने भरती प्रक्रिया भरती अधिकारी प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहे . औरंगाबाद , बुलडाणा , हिंगोली , जळगाव , जालना , नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील तरूण या भरतीत सहभागी झालेले आहेत . या भरतीत सहभागी उमेदवारांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी भोजनाची व्यवस्था केली आहे . भरतीत सहभागींना स्वयंसेवी संस्थांकडून भोजन देण्यात येते आहे . 
भरती प्रक्रिया परिसरात स्वच्छता राखली जावी , या उद्देशाने महानगर पालिकेने पाण्याची व्यवस्था , परिसर स्वच्छता , फिरते शौचालये आदींची याठिकाणी व्यवस्था केलेली आहे . भरती ठिकाणाहून उमेदवारांना बस स्थानक , रेल्वे स्थानक अथवा भरतीच्या दिवशी असलेल्या गावांमध्ये पोहोचविण्याची सोयही राज्य परिवहन महामंडळाने केलेली आहे . या सुविधेमुळे भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाने चांगली व उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे आभारही मानले आहेत . सार्वजनिक बांधकाम विभागाने भरती दरम्यान मैदानावर आवश्यक प्रकाश योजनेसाठी दोन जनरेटर्स , जिल्हा परिषदेने 10 शिक्षक , भरतीत कुणास इजा झाल्यास तत्काळ उपचार मिळावा यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी , रुग्णवाहिका , पोलिस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मैदाने , राहण्याची व्यवस्था , एनआयसीद्वारा इंटरनेट सुविधा आदी सोयी भरती कालावधीत उपलब्ध करून दिलेल्या आहेत . दररोज मध्यरात्री 12 वाजता भरती प्रक्रिया सुरू होऊन सकाळी सहा वाजेपर्यंत शिस्तबद्धरित्या व पारदर्शकपणे पार पाडल्या जात असल्याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी समाधानही व्यक्त केले आहे .

22 August 2022

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी

 नांदेड दि . 22 : - औरंगाबाद स्मार्ट सिटी जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी 20 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर - कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे . ही निवड प्रक्रिया 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वा . जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , नंदनवन कॉलनी , औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे . यासाठी पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ( डिस्चार्ज बुकची प्रत , आर्मी व सिव्हिल हेव्ही व्हेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इत्यादी ) उपस्थितीत रहावे . निवड चाचणीसाठी पात्रता सैन्य दलातील ट्रेड DSV ( Spl Veh ) / AM - 50 / Dvr / Dvr ( MT ) / DMT / Dvr GNR / Dvr ( AFT ) यापैकी असावा . दहावी / बारावी उत्तीर्ण आणि आर्मी ग्रॅजुएट शैक्षणिक आर्हता आवश्यक आहे . वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PSVBUS ( TRV - PSV - Bus ) धारकास प्राधान्य . निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच ( बिल्ला ) निवडीच्या / नियुक्तिच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा . सैन्य दलात हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे . मेडिकल कॅटेगरी SHAPE - I . वयोमर्यादा 48 वर्षे आहे . माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , 41 , नंदनवन कॉलनी , औरंगाबाद दुरध्वनी 0240-2370313 या पत्यावर / दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा . निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा प्रत्यक्ष सहभागी नाही , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

दर्गाहच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला एकाच कुटुंबातील ५ भाविकांचा तलावात बुडून मृत्यू

कंधार दि  : राज्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत . तसेच धरणे तलाव जलाशय हे देखील फुल्ल भरले आहेत . आणि अश्यामध्ये नांदेड , खुदबईनगर येथून कंधार येथील बडी दर्गाहच्या दर्शनासाठी आलेल्या ५ भाविकांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाला . ही घटना रविवार ( दि . २१ ) दुपारी एकच्या सुमारास घडली . मृत एकाच कुटुंबातील असून तलावाकाठी जेवण करण्यासाठी गेले होते . मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार ( वय ४५ ) यांचा मुलगा मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन ( वय १५ ) , सय्यद सोहेल सय्यद वाहिद ( वय २० ) , सय्यद नवीद सय्यद वाहिद ( वय १५ ) , मामा मोहम्मद विखार ( वय २३ सर्व रा . खुदबईनगर नांदेड ) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत . नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार , मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार हा नांदेड येथे बेकरी व्यवसाय करत होते . सर्व आपल्या नातेवाईक व कुटुंबासह कंधार येथील हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम ( बडी दर्गाह ) च्या दर्शनासाठी दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता आले होते . सर्वांचे दर्शन झाल्यानंतर कुटुंबातील एक महिला जेवण करण्यासाठी तलावाच्या काठावर गेले . जेवण झाल्यानंतर प्लेट धुण्यासाठी तलावाच्या काठावर गेले असता त्यातील एकाचा पाय घसरुन तलावात पडला . त्यास  वाचविण्यासाठी एकएक करुन पाचही जण तलावात बुडू लागले .
 यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबातील एका महिले पाहिले असता तिने ही माहिती दर्गाहमध्ये असलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांना दिली . घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भोई समाजातील व्यक्तींच्या मदतीने पाचही मृतदेह तलावातून बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला . तात्काळ त्यांना रुग्णवाहिका व रिक्षातून कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले . मात्र , डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करुन मृत घोषित केले . त्या नंतर सर्व मृतदेह कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले . या घटनेमुळे कंधार शहरासह देगलूर नाका भागात शोककळा पसरली आहे . 

21 August 2022

केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

 नांदेड  : - केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना , महाविद्यालयीन व विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना , दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनेची अंमलबजावणी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येतात . सन 2022-23 साठी या योजनेसाठी केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरुन 20 जुलै 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत . विद्यार्थ्याना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतीम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत तर महाविद्यालयांनी अर्जाची पडताळणी करण्याचा अंतीम दिनांक 15 नोव्हेंबर 2022 हा आहे . केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना राज्यातील मुस्लिम , ख्रिश्चन , शीख , बौध्द , पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी केंद्रशासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर ( पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्ती योजना राबविली जाते . शिष्यवृत्तीसाठी वर्ग 11 ते पीएचडी व्यावसायिक डी.एड् . , बी.ए. , एम . एड् . , आय . टी . आय . , सर्व डिप्लोमा व अकरावी / बारावी स्तरांवरील एम . सी.व्ही.सी. अभ्यासक्रम ( तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून ) इतर सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी पात्र आहेत . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखापेक्षा अधिक नसावे . महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनामार्फत नवीन शिष्यवृत्तीसाठी / नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी आहे . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 4 लाख 50 हजारापेक्षा अधिक नसावे . महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना वर्ग 11 वी , 12 वी , पोस्ट मॅट्रिक डिप्लोमा / सर्टिफिकेट पदवी , पदव्युत्तर डिग्री / डिप्लोमा तसेच डिप्लोमा व सर्टिफिकेट या अभ्यासक्रमासाठी देण्यात येते . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा अधिक नसावे . सर्व महाविद्यालयांनी त्यांची केवायसी व आधार डेमो ऑथेटिंफीकेशन व स्वत : ची नोंदणी चालू वर्षात करावी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर नोंदणी करावी . शिष्यवृत्ती योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्र व इच्छुक विद्यार्थ्यानी नवीन मंजूरीसाठी व नूतनीकरणासाठीचे अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे . नॅशनल स्कॉलरशिप ( एनएसपी ) या मोबाईल अॅपवर अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे . या योजनेबाबत लाभ पात्रता व स्वरुप याबाबतची माहिती संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे . एनएसपी पोर्टलवरील पात्र शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा , असे आवाहन विभागीय सहसंचालक ( उच्च शिक्षण ) नांदेड विभाग , नांदेड कार्यालयाने केले आहे . 

20 August 2022

संतापजनक! नांदेडमध्ये हुंड्याच्या रकमेसाठी विवाहितेला सासरच्यांनी पाजलं विष, 22 वर्षांच्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु


नांदेड : देशात हुंडाविरोधी (Dowry Case) कायदा आणला असला, तरिही त्याचा वचक किती आहे, यावर सवाल उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded Crime News) घडलेल्या संतापजनक घटनेवरुन हुंडाबळीचा मुद्दा आजही तितकाच गंभीर असल्याचं स्पष्ट झालंय. एका विवाहीत तरुणीला चक्क विष पाजण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. नांदेडमधून उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच संताप व्यक्त केला जातोय. या संतापजनक घटनेतील पीडित विवाहित तरुणी मृत्यूशी झुंज देतेय. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी (Nanded Police) गुन्हाही दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक कऱण्यात आलेली नाही. पीडित तरुणीच्या नातलगांनी या संपूर्ण प्रकरणी तीव्र शब्दांत रोष व्यक्त केलाय. सासरच्या लोकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे

मृत्यूशी झुंज सुरु

नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना समोर आलीय. 22 वर्षांच्या तरुणीला तिच्या सासरच्या लोकांनीच विष पाडलं. हुंडची रक्कम मिळावी नाही, म्हणून त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं असा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पीडित तरुणी गंभीर असून तिची प्रकृत्य अत्यंत नाजूक असल्याचं कळतंय. या विवाहीत तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु आहे.


कारवाईची मागणी

नांदेडमधील विमानतळ पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतलाय. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. आपल्या मुलीसोबत घडलेल्या या घटनेनं पीडित मुलीचे नातलग प्रचंड संतापलेत. त्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांत तक्रार देत सासरच्या लोकंवर अटकेची कारवाई व्हावी, दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


तीव्र संताप

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जातोय. देशात याआधीही हु्ंड्यासाठी छळ करुन अनेक विवाहीत स्त्रियांनी आपलं आयुष्य संपवल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता तर थेट सासरच्याच लोकांनी विष पाजत तरुणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत पुढे नेमकी कुणावर कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.



19 August 2022

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बंपर भरती

  पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या 386 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे . दरम्यान कोणती पदे भरली जाणार ? वयाची अट काय ? अर्ज करण्याची मुदत काय ? पाहूयात . भरती दरम्यान अतिरिक्त कायदा सल्लागार 01 , विधी अधिकारी 01 , उपमुख्य अग्निशमन अधिकारी 01 , विभागीय अग्निशमन अधिकारी 01 , उद्यान अधीक्षक ( वृक्ष ) 01 , सहाय्यक उद्यान अधीक्षक 02 , उद्यान निरीक्षक 04 , हॉर्टिकल्चर सुपरवायझर 08 , कोर्ट लिपिक 02 , अॅनिमल कीपर 02 , समाजसेवक 03 , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 41 , लिपिक 213 , आरोग्य निरीक्षक 13 , कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) 75 , कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) 18 जागा भरण्यात येणार आहे . वयाची अट 8 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे अशी देण्यात आली आहे . तर मागासवर्गीय / अनाथांसाठी पाच वर्षे सूट असेल . नोकरीचे ठिकाण पिंपरी - चिंचवड देण्यात आले आहे . खुल्या प्रवर्गासाठी फी एक हजार रुपये तर मागासवर्गीयांसाठी 800 रुपये असेल . माजी सैनिकांनाकडून फी घेण्यात येणार नाही . ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 8 सप्टेंबर 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत देण्यात आली आहे . ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये होईल . अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/

18 August 2022

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची नागपूर येथे बदली

  नांदेड: नांदेडचे जिल्हाधिकारी (Nanded Collector) विपीन इटनकर (Vipin Itankar) यांची राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आलीय. निश्चित कालावधीपेक्षा कमी काळात त्यांची बदली झाल्याने त्यांच्या बदलीमागे स्थानिक राजकीय ताकत असल्याचे सांगण्यात येतंय. मात्र नागपूर (Nagpur) सारख्या महत्वाच्या जिल्ह्यात त्यांची बदली झाल्याने इटनकर यांच्या कामाची दखल घेतल्याचे सांगण्यात येतंय. इटनकर यांच्या बदलीमुळे पुन्हा एकदा चांगले अधिकारी नांदेडला टिकवल्या जात नाहीत हा नेहमीचा आरोप याही वेळा केला जातोय. लातूर इथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेल्या विपीन इटनकर यांची सव्वा दोन वर्षांपूर्वी नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली होती. आता ते नागपूरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त होतील.कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी
विपीन इटनकर हे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर रुजू होताच कोरोनाची लाट आली. मात्र या लाटेत स्वतः डॉक्टर असलेल्या विपीन इटनकर यांनी प्रभावीपणे काम केलं, कोरोना काळात मृत्यदर कमी राखण्यात ते सर्वांच्या मदतीने यशस्वी झाले होते. त्यासोबतच कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालयातच उपचार मिळावेत यासाठी त्यांचे कायमच प्रयत्न होते. त्यामुळे कोरोनाच्या लाटेत ते नांदेडमध्ये लोकप्रिय झाले. त्या दरम्यान उद्भवलेल्या कोरोना काळात रेमडीसीवीर आणि ऑक्सिजनच्या टंचाईत अहोरात्र जागून त्यांनी काम केले, जिल्हाधिकारी असूनही अनेकदा ते यासाठी रात्री बेरात्री रस्त्यावर उतरले होते.

कुटुंब वत्सल आणि सायकल प्रेमी
विपीन इटनकर यांनी स्वतःच्या पत्नीची प्रसूती महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात केली होती, त्यांचा हा साधेपणा फार चर्चिल्या गेला. फिटनेसच्या बाबतीत इटनकर कायम दक्ष असतात, त्यामुळेच ते रात्रीबेरात्री सायकल चालवताना शहरात नागरिकांना भेटत असत. तरुणांनी शरीरस्वास्थ्य आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावे असा त्यांचा आग्रह असायचा.

लसीकरण आणि महसूल उत्पन्नात वाढ
विपीन इटनकर यांनी कोरोनाच्या दोन्ही साथी जवळून अनुभवल्या होत्या, त्यामुळे त्यांनी लसीकरणासाठी स्वतःला झोकून दिले होते. त्यासोबतच महसूल उत्पनात त्यांच्या काळात वाढ झाली होती.

नागपूर मिळाल्याने आश्चर्य
जिल्हाधिकारी म्हणून विपीन इटनकर यांनी नांदेडला प्रथमच काम केले. मात्र या दरम्यान त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी थेट नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली केलीय. आता इटनकर नागपुरात थेट फडवणीस यांच्या जवळ जाणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी

बिलोली:कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी : म . ज्यो . फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग ग्रामीण भागात राहणारे अनेक व्यक्ती रोगाचे निदान न होऊ शकल्याने किंवा लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाची जोड करू न शकल्याने आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करतात . पुढे तो दुर्धर बनतो आणि रुग्णाचा अंत होतो . याविषयी जनजागृती व्हावी आणि गरजू व्यक्तींना उपचारासाठी योग्य ते सहकार्य करता यावे यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे संस्थापक आ . कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र व संजीवनी आरोग्य मंदिर यांच्या वतीने आज ( दि . १७ ऑगस्ट ) सगरोळी येथील माणिकप्रभू मठात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . अस्थिरोग , सगरोळी व परिसरातील १०३ महिला , ९ बालके यासह ३२७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली . सर्वसाधारण आजारासह कान , नाक , घसा , कर्करोग , बालरोग आदी रुग्णांनी याचा लाभ घेतला . डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड , अपेक्षा क्रिटीकल केअर व मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल नांदेड , नंदीग्राम हॉस्पिटल नांदेड व लोटस हॉस्पिटल नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांनी यात सहभाग घेतला . शिबिरात रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात आली व गरजेनुसार १६ रुग्णांना पुढील तपासणी तसेच उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला . संस्थेचे विश्वस्त श्री . सुनिलरावजी देशमुख यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए चे विभागीय प्रमुख श्री . शरद पवार यांनी पिवळी शिधापत्रिका धारक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करताना शिबीर आयोजनासाठी सगरोळी संस्थेचे आभार मानले . कृषि विज्ञान केंद्र व संजीवनी आरोग्य मंदिर येथील सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने हे शिबीर यशस्वी झाले , असे विचार संस्थेचे वैद्यकीय अधिकारी तथा सचिव डॉ . जयंत जकाते यांनी मांडले .

05 August 2022

दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण सोडत निश्चित

 नांदेड दि . 5 : - जिल्ह्यातील नगरपरिषद देगलूर , मुखेड , कंधार , बिलोली , कुंडलवाडी , धर्माबाद , उमरी , भोकर , मुदखेड व हदगाव या दहा नगरपरिषद व हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग , नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( महिला ) व सर्वसाधारण ( महिला ) आरक्षण सोडत निश्तिच करण्यात आले आहे . या कार्यक्रमानुसार संबंधित नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या अंतिम आरक्षणाची प्रसिध्दी नगरपरिषदेच्या सूचना फलकावर , इतर कार्यालयातील सूचना फलक , तहसिल कार्यालयातील सूचना फलक व नगरपरिषद , नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे . तसेच विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक औरंगाबाद यांनी नमूद नगरपरिषदा / नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चिती राजपत्रात प्रसिध्द केली आहे . 

02 August 2022

असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई - श्रम कार्डसाठी नोंदणी करावी

  नांदेड  दि . 2 : - ई - श्रम कार्डच्या नोंदणीसाठी राज्यात 3 व 4 ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे . नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ . सय्यद यांनी केले आहे . नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ( सीएससी ) वर जाऊन नोंदणी करावी . नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नोंदणी विनामूल्य आहे . नांदेड जिल्ह्यासाठी 13 लाख 27 हजार 855 एवढे उद्दीष्ट दिलेले आहे . त्यापैकी 3 लाख 10 हजार 167 असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे . उर्वरित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा . नोंदणी कोण करु शकतो.  घरकाम करणाऱ्या महिला , रस्त्यावरिल विक्रते , दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी , ऑटो चालक , मेकॅनिक , शिलाइ मशीन कामगार , न्हावी कामगार , आशा वर्कर / अंगणवाडी सेविका , सुतारकाम करणार व्यक्ती , पेंटर , प्लंबर कामगार , इलेक्ट्रीशियन , ब्युटी पार्लर , वृत्तपत्र विक्रेते , हॉटेल चालक , प्रिंटींग काम करणारी व्यक्ती , भाजी विक्रेते , बिडी कामगार , सेंट्रींग कामगार , बांधकाम कामगार , पशुपालन करणारे , लहान व सिमांत शेतकरी , मच्छीमार , सॉ - मिल कामगार , मीठ कामगार , विणकर , बचत गठ , फळ विक्रेते , लेबर कामगार , सुरक्षा कर्मी , लोहार , हातगाडा कामगार इत्यादी क्षेत्रातील कामगार ई - श्रम पोर्टल वर नोंदणी करु शकतात . या नोंदणीसाठी आधार कार्ड , बँक पासबुक , सक्रिय मोबाईल क्रमांक ( आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ) ही आवश्यक कागदपत्रे लागतात . नांदेड जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगारांनी विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत ई श्रम कार्डसाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ( सीएससी ) वर जाऊन ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून लाभ घ्यावा , असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ . सय्यद यांनी केले आहे .       

चर्चा कोण करतयं, असे म्हणत चव्हाणांकडून चिखलीकरांची खिल्ली..

नांदेड : कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सोमवारी त्यांनी (Nanded) नांदेडला प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. चर्चा कोण करतय, या चर्चेला काही महत्व नाही.कॉँग्रेस सोडण्याचा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही, अशा शब्दात या सगळ्या अफवा असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.अशोक चव्हाण हे कॉँग्रेसमधून बाहेर पडणार? अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली. त्यापूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करताना अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार उशीरा पोहचले त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. त्याचबरोबर कॉँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेतेमंडळींनी देखील उशीरा पोहचलेल्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.त्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर काही दिवस शांतता होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून माजी मुख्यमंत्री चव्हाण हे कॉँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली.नांदेडला आल्यानंतर चव्हाण यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी आपल्याबद्दल होणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. चर्चा कोण करतय ? या चर्चेला काही महत्व नाही, असा टोला त्यांनी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता टोला लगावला.येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्याचबरोबर राज्यात सत्ताबदल झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होत असून अनेक नेते इतर पक्षात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची देखील चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यावर अशोक चव्हाण यांनी मोजक्या शब्दात स्पष्टीकरण देत या चर्चांना पुर्णविराम दिला.