नांदेड : कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सोमवारी त्यांनी (Nanded) नांदेडला प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. चर्चा कोण करतय, या चर्चेला काही महत्व नाही.कॉँग्रेस सोडण्याचा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही, अशा शब्दात या सगळ्या अफवा असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.अशोक चव्हाण हे कॉँग्रेसमधून बाहेर पडणार? अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली. त्यापूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करताना अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार उशीरा पोहचले त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. त्याचबरोबर कॉँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेतेमंडळींनी देखील उशीरा पोहचलेल्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.त्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर काही दिवस शांतता होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून माजी मुख्यमंत्री चव्हाण हे कॉँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली.नांदेडला आल्यानंतर चव्हाण यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी आपल्याबद्दल होणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. चर्चा कोण करतय ? या चर्चेला काही महत्व नाही, असा टोला त्यांनी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता टोला लगावला.येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्याचबरोबर राज्यात सत्ताबदल झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होत असून अनेक नेते इतर पक्षात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची देखील चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यावर अशोक चव्हाण यांनी मोजक्या शब्दात स्पष्टीकरण देत या चर्चांना पुर्णविराम दिला.
02 August 2022
Home »
» चर्चा कोण करतयं, असे म्हणत चव्हाणांकडून चिखलीकरांची खिल्ली..







0 comments:
Post a Comment