जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

23 August 2022

अग्नीवीर भरतीतील उमेदवारांना प्रशासनाकडून उत्तम सोयी सुविधा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

 औरंगाबाद : देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेल्या तरूणांना लष्कर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे . औरंगाबाद शहरात होत असलेल्या अग्नीविरांच्या भरतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी भरतीतील उमेदवारांना सोयी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे . ही स्तुत्य अशी बाब आहे . जिल्हा प्रशासनानेही भरतीत सहभागींसाठी उत्तम
 भोजन , वाहतूक , स्वच्छता गृहे आदींची चोख व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले . महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळावा , मातृभूमीची सेवा आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासनाच्या अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवीर जनरल ड्युटी ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर ट्रेडसमन ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर तांत्रिक ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर लिपिक , भांडारपाल तांत्रिक ( सर्व शस्त्र ) या पदांसाठी भरती प्रक्रिया 13 ऑगस्टपासून शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानांवर सुरू झालेली आहे . भरती प्रक्रिया 08 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे . या निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांना 13 नोव्हेंबर रोजी सामाईक प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे . शिस्तबद्ध पारदर्शक , नि : पक्षपाती पद्धतीने व योग्य नियोजनाने भरती प्रक्रिया भरती अधिकारी प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहे . औरंगाबाद , बुलडाणा , हिंगोली , जळगाव , जालना , नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील तरूण या भरतीत सहभागी झालेले आहेत . या भरतीत सहभागी उमेदवारांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी भोजनाची व्यवस्था केली आहे . भरतीत सहभागींना स्वयंसेवी संस्थांकडून भोजन देण्यात येते आहे . 
भरती प्रक्रिया परिसरात स्वच्छता राखली जावी , या उद्देशाने महानगर पालिकेने पाण्याची व्यवस्था , परिसर स्वच्छता , फिरते शौचालये आदींची याठिकाणी व्यवस्था केलेली आहे . भरती ठिकाणाहून उमेदवारांना बस स्थानक , रेल्वे स्थानक अथवा भरतीच्या दिवशी असलेल्या गावांमध्ये पोहोचविण्याची सोयही राज्य परिवहन महामंडळाने केलेली आहे . या सुविधेमुळे भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाने चांगली व उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे आभारही मानले आहेत . सार्वजनिक बांधकाम विभागाने भरती दरम्यान मैदानावर आवश्यक प्रकाश योजनेसाठी दोन जनरेटर्स , जिल्हा परिषदेने 10 शिक्षक , भरतीत कुणास इजा झाल्यास तत्काळ उपचार मिळावा यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी , रुग्णवाहिका , पोलिस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मैदाने , राहण्याची व्यवस्था , एनआयसीद्वारा इंटरनेट सुविधा आदी सोयी भरती कालावधीत उपलब्ध करून दिलेल्या आहेत . दररोज मध्यरात्री 12 वाजता भरती प्रक्रिया सुरू होऊन सकाळी सहा वाजेपर्यंत शिस्तबद्धरित्या व पारदर्शकपणे पार पाडल्या जात असल्याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी समाधानही व्यक्त केले आहे .

0 comments:

Post a Comment