बिलोली: तालुक्यातील मौजे आरळी येथील शादुल शेख वय (16)हा मौजे लघुळ येथे आपल्या आजुळी गेला असता आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट व मेघ गरजेनेसह पाऊस आला व यात या युवकावर विज पडल्याने तो जागीच शेतामध्ये मृत्यू मुखी पडला सदरील युवकाचे वडील व भावाचा आरळी येथील ओड्यात आलेल्या पुरात वाहुन मृत्यू झाला होता.या कुटुंबात आई वडील दोन भाऊ असा परिवार होता यात आधी वडील व भाऊ आणि आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी समीर याचा मृत्यू झाल्याने आई पोरकी झाल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.सदरील युवक 16 वर्षाचा असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे







0 comments:
Post a Comment