बिलोली:जनतेच्या प्रश्नांची व शेतकऱ्यांच्या दुःखाची जाण असलेले देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर हे थेट मुंबईला मंत्रालयात पोहोचले.
देगलुर- बिलोली मतदारसंघात अतिवृष्टी होऊन नदी नाल्यांना पूर आल्याने हाता तोंडाशी आलेली शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे जमीन खरडून गेली आहे, घरात पाणी शिरल्याने घरांचे व घरातील अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री रावसाहेब अंतापूरकर साहेब यांनी
मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र राज्याचे माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नामदार श्री अशोकराव चव्हाण साहेब व महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.श्री विजयजी वङेटीवार साहेब यांना भेटुन तालुक्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली ओला दुष्काळ जाहीर करा अशी विनंती केली.व निवेदन दिले.







0 comments:
Post a Comment