15 July 2021
Home »
» नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी: जितेश अंतापूरकर
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी: जितेश अंतापूरकर
बिलोली ( प्रतिनिधी ) -तालुक्यात एका पाठोपाठ एक अशा मुसळधार पावसाने पिछा सोडावयास तयार नसल्याचे दिसून येत आहे . दि .११ रोजी जोरदार पावसाने हजेरी लावली यात काही प्रमाणात शेतऱ्यांचे मोठे नुकसान झाले आता पुन्हा दि .१४ रोजीच्या पहाटे पासून मुसळधार पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने विशेषतः नदी काठावरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या आस्मानी संकटामुळे आता मात्र बळी राज्याची पूर्णपणे झोप उडाली असून मतदार संघ आमदारा शिवाय पोरका झालेल्या या तालुक्यात जितेश अंतापुरकर यांनी शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडे पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे . तालुक्यात या वर्षी सोयाबीन पिकाचा मोठा पेरा आहे . याच सोबतकापूस , मुग उडीद इ.पिके घेतल्या गेली . शेतीतील कोवळी रोपेडुलू लागली होती . अशात या पावसाने शेतीत पाणी शिरून पिके पिवळे पडू लागली आहेत . दुसऱ्या बाजूला नदी नाला काठावरील शेतीतील पिकाचे प्रचंड नुकसान झाले . यात जमीनी खरडून कोवळी रोपे नेस्तनाबुत झाल्याची परिस्थिती आहे . तालुक्यात मांजरा नदी काठावर गावे आहेत तर गोदावरी नदी काठावर ही काही गावाचा समावेश आहे . तसेच बामणी कासराळी आरळी असा मोठा नाला असून नाला शेजारी शेकडो एकर जमीन आहे . या नदी व नाला काठावरील शेतकर्याना सदर पावसाचा मोठा तडाखा बसला आहे . काही गावातील घराचेही नुकसान झाले आहे .दि:14-07-2021 रोजी नांदेङ येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेङचे पालकमंत्री मा.ना.श्री अशोकरावजी चव्हाण साहेब व महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री मा.ना.श्री विश्वजीत कदम साहेब यांना देगलुर बिलोली तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी मुळे सोयाबीन उङीद मुग उङीद व इतर पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावरून शेतंकरयांना त्वरित मदत जाहीर करावी. अशी मागणी देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाचे युवानेते श्री जितेशभाऊ रावसाहेब अंतापूरकर यांनी निवेदना द्वारे विनंती केली आहे. यावेळी आमदार श्री अमरनाथ राजूरकर साहेब व जि.प.सभापती श्री संजय बेळगे साहेब उपस्थित होते.







0 comments:
Post a Comment