भोकरला रमाई जंयती उत्साहात साजरी
भोकर (प्रतिनिधी)
मागील काळात सावित्रीबाई व महात्मा फुले, शिवाजी महाराज, जिजाऊ आणि रमाई, बाबासाहेब आंबेडकर याच्यासह अनेक महापुरुषात सूसंवाद असायचा म्हणून समाज सुसंस्कृत बनला आहे.माता रमाईच चरित्र प्रत्येकानी वाचल पाहिजे यातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे घडले हे माहिती होईल.रमाईचा आदर्श महिलांसाठी लाखमोलाचा आहे असे प्रतिपादन सौ.विद्दयाताई कांबळे यांनी बुधवारी ता. (सात) केले आहे.भोकर येथे बूधवारी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विद्याताई कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
शहरातील महात्मा फुले नगर वसाहतीत लूबींनी बूध्दविहार येथे माता रमाबाई आंबेडकर जयंती सोहळा घेण्यात आला त्यावेळी त्या होत्या.यावेळी भीमराव दूधारे,अप्पाराव येरेकार, एल.पी.वारघडे, श्री.शहाणे, साहेबराव मोरे, सूधांशू कांबळे, बाबुराव पाटील,गौतम कसबे, पी.पी.हनवते, शिवाजी गायकवाड, जयभीम पाटील, यशोदाबाई महाबळे,कुसुमबाई सोनकांबळे,कांचन पाटील, सूरेखाबाई माळे,याची उपस्थिती होती.सौ.कांबळे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनात मातारमाई आल्या आणि तुम्हा आम्हाला सोनियांचे दिवस आलेत हे कुणी नाकारू शकत नाही.स्वताच्या कुटुंबीयांची पर्वानकरता न करता दिनदलीताच्या ऊध्दाराकरीता बाबासाहेबांना समर्थपणे साथ दिली आहे.सातकोटी लेकराची आई होऊन पोटची पोर गमवली अशी महान माता आता होणे नाही असे सांगितले आहे. रमाई जयंतीच्या निमित्ताने वकृत्व व डाॅंस स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धक संघर्षना धम्मानंद जाधव,प्रणवी हिरे, मनस्वी माधव कांबळे, समृध्दी मिलींद वाघमारे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.यापूर्वी बालगायक संकल्प जाधव व त्याच्या संचानी रमाईगीते सादर केली.भोजनदानानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सूरत जाधव यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कपील कांबळे,मनोज शिंदे ,दलीत डोंगरे,प्रितम डोंगरे, संतोष डोंगरे,राहुल जाधव, अविनाश गायकवाड, सुनील दूधारे, प्रकाश कागडे, अविनाश सरोदे, राहूल हनवते,अनिल कदम,प्रसेनजीत गाडेकर,वैभव कोकाटे,सुमेध सोनकांबळे,बाळा कदम, पृथ्वीराज वाघमारे यांनी परिश्रम घेतले आहेत.







0 comments:
Post a Comment