जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 January 2021

बिलोली तालुक्यातील 60 ग्रां.पं.साठी 1108 उमेदवार रिंगणात चार ग्रामपंचायत बिनविरोध

बिलोली: तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या  निवडणूकीत दिनांक २४ डिसेंबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत पात्र ठरलेल्या नामनिर्देशित पत्रातील उमेदवारा पैकी दिनांक 4 जानेवार रोजी 522 उमेदवारांनी माघार घेतली.आता 1108 उमेदवार निवडणुकीत कायम आहेत.या मध्ये शिंपाळा,पाचपिंपळी, तळणी,बेळकोणी बुजरूग या चार ग्रामपंचायत बिनविरोध निघालेले आहेत.तर एकुण 51 उमेदवार बिनविरोध निघाले असल्याने आता 60 ग्रामपंचायती साठी निवडणूक होणार असल्याचे बिलोली चे तहसीलदार  निवडणूक निर्णय अधिकारी कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले आहे.चार टप्यात होणार असलेल्या निवडणूकीत आता तिसरा टप्पा पार केला असून पहिल्या टप्प्यात दिनांक २३ डिसेंबर पासुन नामनिर्देशिन पत्र दाखल करण्याची मुदत दिनांक ३० डिसेंबर रोजी संपली.दुसऱ्या टप्प्यात दिनांक ३१ डिसेंबर रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली.ज्यात तालुक्यातील 64 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 204 प्रभागातून 556 सदस्य निवडुन द्यावयाच्या जागेसाठी 1732 नामनिर्देशिन पत्र दाखल झाले यामध्ये 10 नामनिर्देशिन पत्र अवैध ठरले असल्याने 1722 नामनिर्देशिन पत्र वैद्य ठरले होते.तर निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी माघार घेण्याच्या प्रक्रियेत चार जानेवारी रोजी तब्बल पाचशे बाविस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले.आता चौसष्ट ग्रामपंचायत मधुन चार ग्रामपंचायत बिनविरोध निघाले असल्याने आता साठ  ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून अकराशे आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत.

बिलोली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या  निवडणूकीत दिनांक २४ डिसेंबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत पात्र ठरलेल्या नामनिर्देशित पत्रातील उमेदवारा पैकी दिनांक 4 जानेवार रोजी 522 उमेदवारांनी माघार घेतली.आता 1108 उमेदवार निवडणुकीत कायम आहेत.या मध्ये शिपांळा,पाचपिंपळी, तळणी,बेळकोणी बुजरूग या चार ग्रामपंचायत बिनविरोध निघालेले आहेत.तर एकुण 51 उमेदवार बिनविरोध निघाले असल्याने आता 60 ग्रामपंचायती साठी निवडणूक होणार असल्याचे बिलोली चे तहसीलदार  निवडणूक निर्णय अधिकारी कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले आहे.चार टप्यात होणार असलेल्या निवडणूकीत आता तिसरा टप्पा पार केला असून पहिल्या टप्प्यात दिनांक २३ डिसेंबर पासुन नामनिर्देशिन पत्र दाखल करण्याची मुदत दिनांक ३० डिसेंबर रोजी संपली दुसऱ्या टप्प्यात दिनांक ३१ डिसेंबर रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली.ज्यात तालुक्यातील 64 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 204 प्रभागातून 556 सदस्य निवडुन द्यावयाच्या जागेसाठी 1732 नामनिर्देशिन पत्र दाखल झाले यामध्ये 10 नामनिर्देशिन पत्र अवैध ठरले असल्याने 1722 नामनिर्देशिन पत्र वैद्य ठरले होते.तर निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी माघार घेण्याच्या प्रक्रियेत चार जानेवारी रोजी तब्बल 522 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले.आता 64 ग्रामपंचायत मधुन चार ग्रामपंचायत बिनविरोध निघाले असल्याने आता साठ  ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून अकराशे आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत.

0 comments:

Post a Comment