नवी दिल्ली | भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानला जाणारी सर्व विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यासोबत भारतातील काही विमानतळांवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
भारतातील लेह, श्रीनगर, अमृतसर, शिमला, कुलु, पठाणकोट, चंदीगड, धर्मशाला या विमानतळांवरुन होणारी देशांतर्गत उड्डाण देखील रद्द करण्यात आली आहेत.
जम्मू काश्मीर आणि पंजाब राज्यामधील विमानतळांवरील उड्डाणं मे महिन्यापर्यंत रद्द केली गेली आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक सुरु झाली आहे.
27 February 2019
Home »
» भारतानं पाकिस्तानला जाणारी सर्व विमानं उड्डाणे केली रद्द!








0 comments:
Post a Comment