नांदेड दि . 20 : - कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती खबरदारी घेत आहे . आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत : अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे . नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क , सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे . याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे . नागरिकांनी जर संयमी जब बदारी पार डली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही , असे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे . जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत . तथापि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या , संदेश हे पुर्णत : चुकीचे असून ज्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर अथवा ट्विटर , इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल , असे जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे .
20 February 2021
Home »
» अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई - जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर







0 comments:
Post a Comment