भोकर अंबादास के एल बोयावार
भोकर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस पडला आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान्य पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50000 रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी राजमुद्राचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे यांचा जिल्हाधिकारी साहेबांकडे केली आहे. शेतकऱ्याना शासनाच्या वतीने तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे अन्यथा राजमुद्रा सामाजिक संघटना शेतकरी बांधवांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली व प्रशासनाची राहील अशी निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर राजमुद्राचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे जिल्हा सचिव श्रीकांत पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य साईनाथ पाटील गोडबोले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केंद्रे सुप्रियाताई बेटमोगरेकर सोशल मीडिया माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील परिवार कंधार तालुका अध्यक्ष किरण गायकवाड तालुका उपाध्यक्ष गंगाधर मोरे आदींची उपस्थिती होती








0 comments:
Post a Comment