बिलोली : बाजार समितीच्या निवडणुकीत शासन मान्य संस्थेत शासनाची पगार घेऊन नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मतदार संघातुन आपली उमेदवारी दाखल करून ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असतांना प्रतिस्पर्धी भाजप मित्रपक्ष पुरस्कृत बळीराजा शेतकरी विकास पॅनलच्या चार उमेदवारांनी चार शिक्षकांची निवडणूक निर्णय अधिकारी बिलोली यांच्याकडे तक्रार करून उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी दि. २७ सप्टेंबर रोजी केली आहे. दि.७ रोजी निवडनुका होणार आहेत.
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेस महायुतीचे कोरनुळे यादव किशनराव हे पोष्ट बेसीक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मरवाळी येथे शिक्षक असून त्यांनी ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातुन उमेदवारी दाखल केली असून यास प्रतिस्पर्धी उमेदवार हांडे महेश भुजंगराव यांनी आक्षेप घेतला आहे. दुसरे उमेदवार बुध्देवार राजेश्वर रामकिशन हे यशवंत विद्यालय मुखेड येथे शिक्षक असून सेवा सहकारी संस्था इतर मागसवर्ग मतदारसंघातुन निवडणुक लढवित आहेत. यांची तक्रार रेणुकाबाई नारायण कंदमवाड या महिला उमेदवाराने केली आहे. तिसरे उमेदवार आनंदराव गुंडप्पा पाटील हे बिलोली येथे मुकबधिर शाळेवर शिक्षक आहेत त्यांची सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाली यांना आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवार मुरके बालाजी रावसाहेब यांनी घेतला आहे. याच सोबत शिवाजी पाटील हे नायगाव येथील जनता हायस्कुल येथे निमशासकिय सेवेत असून यांची उमेदवारी रद्द करण्याची तक्रार पांडवे व्यंकट मष्णाजी यांनी केली आहे. अशा परिस्थितीत निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी काय निकाल देणार माजी खा.भास्करराव पाटील यांच्या गटातील जर हे उमेदवार अपात्र झाल्यास ठक्करवाड गटाला फटाके फोडण्याची संधी मिळणार का असे विविध प्रश्नांची चर्चा होत आहे.







0 comments:
Post a Comment