अर्धापूर : भाजपा शाषीत सरकार लोकशाहीचा गळा घोटून हुकुमशाही पध्दतीने कारभार करीत असल्याने उतरप्रदेशातील हाथरसमध्ये बलात्कार करुन पीडीत मुलीची चीभ कापून कमरेचे हाडे मोडली तरी योगी सरकारचे ऐकुन पोलिसांनी पीडीताचे प्रेत घरच्यांना हवाली न करता थेट रातोरात अंत्यविधी करुन घेतला , यामुळे देशभरात असंतोष पसरला असून सबंधीत आरोपींना फाशावर लटकवण्याची मागणी आ.अमरनाथ राजूरकर यांनी केली सोमवारी शहरातील प्रज्ञाबौध्द विहारात आ अमरनाथ राजूरकर , माजी खा.तुकाराम रेंगे पाटील , आ माधवराव जवळगावकर आ मोहनराव हंबर्डे , आ रावसाहेब अंतापूरकर , जि प अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर , महापौर सौ मोहिनी येवनकर माजी महापौर मंगलाताई निमकर सभापती रामराव नाईक सरचिटणीस संजय देशमुख लहानकर सभापती सरीता बिरकिले , उपसभापती जोत्सा गोडबोले , अनिता इंगोले , रेखा चव्हाण , कविता कळसकर , मंगला धुळेकर उज्वलाताई इंगोले , जेसीका शिंदे , सभापती सौ.कांताबाई अशोकराव सावंत , मनिषा शिनगारे , युकाँचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कौंढेकर तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे , शहराध्यक्ष राजेश्वर शेटे , मदन देशमुख , सौ प्रणीता सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती . तथागत भगवान गौतमबुद्ध व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रज्ञाबौध्द विहारात अर्धातास मौन पाळून धरणे आंदोलन केले . यावेळी आ राजूरकर म्हणाले कि , देशात लोकशाही मोडीत काढण्याचे काम सुरु असून दलितावर अत्याचारांच्या घटनात वाढ झाली तरी भाजपा शाषीत सरकार झोपीत आहे . आ.माधवराव जवळगावकर यांनी हाथरस प्रकरणी योगी सरकारने राजीनामा देण्याची मागणी केली ,







0 comments:
Post a Comment