जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

17 January 2023

भारत जोडोनंतर नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

नांदेड : काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान जिल्ह्यात राबविले जात असून या अभियानाचा शुभारंभ येत्या प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना ला साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे.आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसकडून रणनिती आखली जात असून प्रदेश पातळीवरून प्रत्येक जिल्ह्यात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांची निवड करण्यात आली असून नांदेडची जबाबदारी अभिजीत सपकाळ यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सोमवारी प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक व्यापक बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार भास्करराव पा. खतगावकर ,माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर, प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर आदींची उपस्थिती होती.खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे जिल्ह्यात झालेली वातावरण निर्मिती टिकवून ठेवणे गरजेचे असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी ही वातावरण निर्मिती फायदेशीर ठरावी यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविले जात आहे. आपण जे बोलतो ते करतो. त्यामुळे आपल्याला यश मिळत आहे. पुढील दोन वर्षे निवडणुकांचे असून या निवडणुकांमध्येदेखील काँग्रेसला निश्चितपणे भरीव यश मिळेल, असाविश्वास यावेळी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

0 comments:

Post a Comment