बिलोली:तालुक्यातील मौ. चिरली येथील गट क्र २२६ मध्ये १०० ब्रास च्या नावाखाली जवळपास रहजार ब्रास झालेल्या माती उत्खननाची चौकशी करुण संबंधीतावर महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ मधील नियमानुसार कारवाई करण्यात यावी ही मागणी सामाजिक कार्यकर्ते हनिफ इनामदार यांनी तहसिलदाराकडे तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील निवेदनात नमुद करण्यात आले आहे की मौ. चिरली येथील गट क्र. २२६ मध्ये परवानाधारक आबासाहेब ढगे यांनी १०० ब्रास माती उत्खननाची परवानगी घेवून १५ हायवा गाड्या दोन जे.सी.बी. यंत्राच्या सहाय्याने माती चे बेसुमार उत्तखनन केले आसुन उत्तखनना बाबतीचे महसुल विभागाने परवाना देतांना घालुन दिलेले सर्वच नियम अटींना डावलुन मनमानी पध्दतीने जवळपास २ हजार ब्रास मातीचे उत्तखनन परवाना धारक व्यक्तीने केले आसल्याचा निवेदनात नमूद आहे.महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम१९६६ नुसार पुलापासून किमान ५०० मिटर च्या आत उत्तखनास बंदी आसतांना चिरली गुजरी पुला पासुन १०० मीटर च्या आत आसलेल्या काटावर दोन जे. सी. बी. मशीन लावुन बेसुमार मातीचे उत्खनन परवाना धारकाने केला आहे. या बेसुमार झालेल्या माती उत्तखननमुळे भविष्यात पाण्याचा प्रवाह बदलुन सदरील पुलाला व आसपासच्या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होवु शकते आस ही निवेदनात नमुद आहे.







0 comments:
Post a Comment