शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर हे एकत्र आल्याने राज्यात एक मोठी राजकीय ताकद निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
प्रतिनिधी : शुभम निदाने
बिलोली : गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होईल अशी चर्चा होती. आज अखेर मुंबईत या युतीवर शिक्का मोर्तब झाला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषद घेत युती केल्याचे जाहीर केले आहे.
राज्यातील या युतीवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना बिलोलीमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.शहरातील युवासेना जिल्हा समन्वयक विपुल पटणे यांच्या युवासेना कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून हा आनंद साजरा केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा केला आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे, व्यंकट गुजरवाड तालुका संकटक, शिवकुमार बाबणे देगलूर बिलोली समन्वयक, युवासेना तालुकाप्रमुख माणिक पाटील हिवराळे, कुंडलवाडी शिवसेना शहर प्रमुख शंकर कोणेरवार, युवा सेना शहर प्रमुख कुंडलवाडी बंटी साठे ,बालाजी लष्करे विभाग प्रमुख लोहगाव, सदाशिव बोडके विभाग प्रमुख आरळी ,सुधाकर पाटील नरवाडे, आनंदराव पाटील हिवराळे युवासेना उपतालुकाप्रमुख, प्रशांत वानोळे उपतालुकाप्रमुख युवासेना, प्रल्हाद पाटील कदम शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाप्रमुख धम्मदीप गावंडे व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..







0 comments:
Post a Comment