२९ डिसेंबर २०१९
बिलोली (प्रतिनिधी)
बेळकोणी येथील रहिवासी असलेले देगलूर - बिलोली विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील बेळकोणीकर यांनी देशाचे संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील आसन आरक्षित करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे . एकंदरीत पहाता महामंडळाच्या बसमध्ये खासदार , आमदार , ज्येष्ठ नागरिक , अपंग व्यक्ती , पत्रकारांसाठी आसन : आरक्षित असतात पण स्वताचे कुटुंब सोडून हजारो मैल दुरदेशाच्या सिमेवरती देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी बसमधील आसनावर आरक्षणाची सुविधा उपलब्ध नाही . परिणामी कधी सहा महिण्या नंतर तर कधी वर्षानंतर कौटुंबीक सुट्टी घेवून कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणा - या , हजारो मैलचा प्रवास करून थकलेल्या भारतीय सैनिकांना महामंडळाच्या बसेस मधून जागे अभावी उभे टाकून प्रवास करावा लागत आहे . देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनीकांनी उभे टाकून प्रवास करणे हि बाब देश वासियासाठी लाजीरवानी असून महामंडळाच्या बसेस मधून आमदार , खासदार हे कधीच प्रवास करतांना दिसत नाहीत तरी पण त्यांच्यासाठी : आसन आरक्षित असल्याचा आरोप आहे . त्याउलट हजारो मैलचा रेल्वेने प्रवास करून थकलेल्या सैनिकांना मात्र महामंडळाच्या बसेस मधून उभे टाकून प्रवास करावा लागत आहे . भारतीय सैनिकांना बसमधील आसन आरक्षन सुविधा देवून त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे . त्यामुळे बसमध्ये सैनिकांसाठी आसन व्यवस्था तात्काळ आरक्षित करण्याचे आदेश देण्यात यावे , अशी मागणी उदय पाटील बेळकोणीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे .







0 comments:
Post a Comment