उपोषणास वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा
बिलोली:ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून या मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना बिलोली शाखेच्या बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना शाखा बिलोलीच्या वतीने यापूर्वी शासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राहणीमान भत्ता ( घरभाडे भत्ता) व भविष्य निर्वाह निधीचा ८.३३ टक्के हिस्सा आजपर्यंत शासनाने देऊ केले नसल्याने या प्रमुख मागणीसह ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असताना सरपंच व ग्रामसेवक, वरिष्ठ अधिकारी सहकार्य करीत नसल्याने बिलोली तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने हे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दि. ३० ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने एक निवेदन सादर करीत राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधी ८.३३ हिस्सा मिळावा अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.होते.
या निवेदनाची दखल जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधीतांनी न घेतल्याने ७ नोव्हेंबरपासून बिलोली पंचायत समिती कार्यालयासमोर ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात तालुकाध्यक्ष अप्पाराव शिंदे, साहेबराव वाघमारे, सचिव खंडू जेठे, अलीम शेख, सुरेश सूर्यवंशी, लक्ष्मण होरके,हनमंत जाधव पाचपिंपळी, लक्ष्मण सूर्यवंशी कामरसपल्ली, हणमंत वाघमारे रामतीर्थसह बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले आहेत. या उपोषणास वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे ये वेळी वंचितचे तालुकाध्यक्ष धम्मदिप गावंडे, प्रवक्ते मुकिंदर कुडके, रिपब्लीकन सेनेचे तालुकाध्यक्ष गौतम गावंडे रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष गंगाधर इबितकर व कर्मचारी युनियन पदाधिकारी उपस्थित होते.







0 comments:
Post a Comment