भोकर:तालुक्यातील मौ. बोथी येथील गरिबांच्या स्वस्त धान्यावर स्वस्त धान्य दुकानदाराचा डल्ला याकडे प्रशासन जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहेत. गावकऱ्यांकडुन संताप व्यक्त करण्यात आल आहे, यात शासन दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय केशरी कार्डधारकांना अन्न पुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. अनेक ठिकाणी दलाल सक्रिय झाले असून,रेशनिंगचा गहू, तांदूळ खरेदी करून मोठ्या व्यापाऱ्यांना विकला जात आहे. बोथी - तुराटी मधून दर दोन ते तीन दिवस आड हैदराबादकडे रेशनचा तांदुळ मोठ्या प्रमाणात ट्रक द्वारे पाठवला जातो यात जिल्ह्यातुन मोठे अधिकारी पासून तालुक्यातील कमर्चारी यांची मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे या वर एल. सी. बी. डिपार्टमेंट राजकारणी पुढाऱ्यांचा हसतशेप असल्याची गोपनीय माहिती मिळत आहे. काळ्या बाजारात दर दोन ते तिन दिवसाला ट्रक मध्ये साधरणता चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल रेशनचा तांदूळ काळ्या बाजारत जात असतात शंका येऊ नहे म्हणून GJ पासींगच्या गाड्या वापरल्या जातात यात महत्वाची बाब अशी की तालुक्यातील एक व्यक्ती प्रमुख भुमीका निभावत असतो त्याचा त्याला दर महिन्याला मोबदला दिला जातो. एलसीबी चा एक अधिकारी या नियंत्रण ठेवत असतो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याची देखभाल करत असतात, माहितीस काही गोपनीय माहितीनुसार गाडीला कोणी अडवल किवा थांबवल्यावर स्थानिक पोलीस प्रशासन व काही एल सी बी अधिकाऱ्याचा थेट फोन कॉल येत असल्याची माहिती मिळत आहे. या काळ्या बाजारात जाणारा तांदुळ मोठ्या प्रमाणात त्या त्या तालुक्यातील प्रशासन व अधिकारी यांच्याशी संबंध असल्याचे जिल्हातील अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचे माहिती मिळत आहे. या सर्व प्रकरावर गावातील जनतेतून मोठा प्रश्न निर्माण झाला तरी गोरगरीब जनतेचा थोडातून घास हिसकावून बाहेरच्या राज्यात काळ्या बाजारत तांदूळ व्रिकी केला जात आहे काही लाभार्थी तांदूळ तर काही लाभार्थी गहू विक्री करीत आहेत. जिल्ह्यात भात खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोळीशिवाय राहणारे लोक तांदळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे तांदूळ शेजाऱ्या बाजारात ८ ते १० रुपये किलोने विक्री करतात. शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लाभार्थी गव्हाचा वापर करताना त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते. परंतु तांदूळ एका व्यक्ती मागे 4 किलो तांदूळ मिळत असल्याने तांदूळ वापर करीत नाहीत. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किवा नाही याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जात असते. मात्र तक्रार असल्याशिवाय कुणीही कारवाई करू शकत नाही. तसेच रेशनचे धान्य बाहेर लाभार्थी विक्री करीत असल्यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाला तक्रारही प्राप्त होत नाही. यामुळेच रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकण्याच्या प्रमाणावर अंकुश लागलेला नाही. जो मुळ राशन कार्ड धारक आहेत त्यांना राशन मिळत नाही. यातून दलालांचे मात्र चांगभले होत आहे व संबंधित विभागाचे व प्रशासनाचे खिसे भरल्या जात आहे. सदर डिसेंबर महिन्यात पावती फाडून सुद्धा राशन देत नाही स्वत धान्य दुकानदार बालाजी वाघे हा धारकास आरे रावेची उध्दट भाषा बोलुन हाकलून देतो काल 26 जानेवारी रोजी गावात आलॉस्मेट करून शशंभर लोकांना दुकानासमोर बसुन ठेवून लोकांची दिशाभूल केली लवकर प्रशासनाने लायसन्स रद्द करून स्वत धान्य दुकानदार बालाजी वाघे तुराटीकर याच्याविरुद्ध योग्य कारवाई करावी अशी जोरदार चर्चा कार्ड धारकांकडून होत आहे.
30 January 2024
Home »
» -बोथि येथील राशन चे धान्य जाते कुठे. राशन दुकानदार जोमात मात्र लाभार्थी कोमात.







0 comments:
Post a Comment