जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

09 March 2020

होळी का पेटवली जाते ? जाणून घेवू या याच्या पाठीमागचा शास्त्रीय कारण व पर्यावरण पूरक गोष्टी !

देशभरात आज होळीला उत्साहात सुरुवात झाली आहे . आजच्या दिवशी अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी पेटवण्यात येते . जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे . साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे . शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचा . यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या . पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या , गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात . गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते . त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं . हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे . थंडीनंतर सुरु होणार्या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते . या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा ; पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी होता . परंतु आता मात्र पारंपारिक होळीच स्वरूपच पूर्णपणे बदललं आहे . आता होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल केली जाते , तसेच होळी पेटवताना त्यात प्लॅस्टिक , टायरदेखील जाळले जाते त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होतं जाते . 

0 comments:

Post a Comment