18 March 2020
Home »
» *कोरोना जनजागृती कि पैशाची उधळपट्टी*
*कोरोना जनजागृती कि पैशाची उधळपट्टी*
सध्या सर्वत्र कोरोनाबद्दल भीतीग्रस्त वातावरण झाले असून राज्य सरकार ही स्थिती अत्यंत चांगल्याप्रकारे हाताळत आहे आणि ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे मात्र दररोजचे वर्तमानपत्र बघितले असताना त्यामध्ये एकाच पेजवर पाच-पाच सहा-सहा नगरपालिकेच्या/ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वतीने जनजागृतीपर मोठ्या मोठ्या जाहिराती येत आहेत . मुळात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेगळी जाहिरात केली पाहिजे का हा येथे महत्त्वाचा प्रश्न आहे . राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नावाने सर्व वर्तमानपत्रात जनजागृती केली तर ती एक वेळ समजू शकतो मात्र एकाच पानावर तोच मॅटर वेगवेगळ्या अस्थापना च्या नावाने जाहिरात म्हणून प्रकाशित केल्या जात असल्याने ही जनजागृती आहे की मार्च एंड ची उधळपट्टी हे कळायला मार्ग नाही . जाहिरातीवर निरर्थक पैसे खर्च केल्यापेक्षा याच पैशाने जनतेसाठी मास्क अथवा इतर उपाय किंवा इतर प्रकारे जनजागृती करता येणे शक्य आहे जसे की लाऊड स्पीकरवरून रिक्षा द्वारे गावांमध्ये जनजागृतीपर माहिती फिरवणे कारण अशा प्रकारे केलेली जनजागृती ही प्रत्येक नागरिकापर्यंत जाते सध्याच्या युगामध्ये मीडियाचे महत्त्व कमी झाले असून पेपर वाचणार वाचकांची संख्या खूप कमी झालेली आहे . त्यामुळे अशा प्रकारच्या आस्थापनानी प्रिंट मिडिया ला दिलेल्या जाहिराती नेमक्या किती लोकांपर्यंत पोहोचल्या आणि त्यामुळे नेमकी किती लोक जागृत झाले हाही संशोधनाचा विषय होऊ शकतो .







0 comments:
Post a Comment