देगलूर:तालुक्यातील चैनपुर येथील दोन शाळकरी विद्यार्थी गावालगत असलेल्या शेततळ्यात पोहायला गेले असता शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि . 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली . ऐन पाडव्याच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना । घडल्याने चैनपुर गावावर शोककळा पसरली आहे . चैनपुर वन्नाळी च्या रोडवर पांणद रस्त्याच्या बाजूला मधुसूदन शिवराम औटी यांचे शेत तळे आहे . गावातील किरण यादवराव पाळेकर व बजरंग जमनाजी कायेतवाड ( वय 14 ) हे दोघे खानापूर येथील एका खाजगी शिक्षण संस्थेत आठव्या वर्गात शिक्षण घेत होते . बुधवार दि . 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ते दोघे औटी यांच्या शेततळ्यात पोहायला गेले होते . त्या शेततळ्यात बाहेरून मोटारीने पाणी सोडल्याने पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात जमला होता . हा अंदाज त्या दोन विद्यार्थ्यांना न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला . चारच्या सुमारास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्या शेततळ्याच्या काठावर कोणाचे तरी कपडे असल्याचे आढळून आले असता जवळ गेल्यानंतर शेततळ्यात दोन मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले . लागलीच त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना सांगितली . गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले . पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना ही माहिती समजताच तात्काळ त्यांनी उप पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना पाठवून त्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले . ऐन पाडव्याच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने चैनपुर गावावर शोककळा पसरली आहे
26 March 2020
Home »
» देगलूर : चैनपुर येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू ; ऐन पाडवा सणावर गावात शोककळा







0 comments:
Post a Comment