मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात येत आहे . त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात येणार आहे , अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली . राज्यातील विमानतळेही बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे . तेही लवकरात लवकर बंद होतील असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला . केवळ जीवनावश्यक वस्तू चालू राहतील . अन्नधान्य औषधं , बेकरी , पशुखाद्य , पाळीव प्राणी दवाखाने सुरु राहतील . त्यासंबंधीची वाहतूक सुरु राहील तसेच कृषी उद्योगाशी संबंधित दुकाने आणि वाहतूक सुरुच राहील , असेही उद्धव ठाकरे म्हणाले . " मी विनंती करुनही , सांगूनही काही जण ऐकत नाहीत ते दुर्दैवी आहे . " राज्यातील सर्व मंदिरं प्रार्थनास्थळ बंद ठेवावी . मंदिरांमध्ये केवळ पुजारी , मौलवी असतील , असेही ते म्हणाले . त्याशिवाय रेल्वे , बस आणि खासगी वाहनेही बंद करण्यात येणार आहे . जर आवश्यकता असेल तर चालक अधिक2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी सर्व खासगी वाहनाला दिली आहे . बस खासगी वाहनेही बंद , जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका , होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करुन या सेवेसाठी तयार करणार सध्या आपण कोरोनाच्या निर्णयाक टप्प्यावर आलो आहे . टर्निंग पॉईंटवर आलो आहे . हीच ती वेळ आहे " आता रोखू शकलो नाही तर जगभर थैमान घातलं आहे , तसंच ते महाराष्ट्रात घालेल " , असेही उद्धव ठाकरे म्हणाले . सरकार आपलं आहे , आपल्यासाठी काम करतंय काल जनतेने निश्चयाने घरात राहून जनता कर्म्युला प्रतिसाद दिला .
23 March 2020
Home »
» घराबाहेर पडण्यावर बंदी , राज्यात संचारबंदी लागू , मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय







0 comments:
Post a Comment