नांदेड:कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर विविध पातळ्यांवर मोठे निर्णय घेतले जात आहेत.केद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मोठा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी ट्विट करून सांगितलंय.देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी देशातील सर्व टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरींनी यांनी जाहीर केलंय.हा निर्णय तात्पुरता घेण्यात आला आहे.असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय.तरी देखील नांदेड जिल्ह्यात मात्र केटी कंपनीने टोलवसुली चालूच ठेवले आहे.यामुळे अन्य राज्यातुन वाहतूक करणाऱ्या गाड्या येत आहेत या कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे.यामुळे जिल्ह्यातील सर्व टोलवसुली बंद करण्यात यावे असे जनतेतून मागणी होत आहे.
28 March 2020
Home »
» देशातील टोलवसुली बंद मात्र नांदेड जिल्ह्यात टोलवसुली चालुच







0 comments:
Post a Comment