भोकर: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, समता ,बंधुत्व स्वातंत्र न्यायावर आधारित आहे म्हणून आज महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देश सोडून निघून जावे असे प्रखर मत बहुजन युथ पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब जाधव यांनी व्यक्त केले
मौजे नांदा पट्टी मैसा येते तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संतोष वाटोरे सर होते यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहारानी पूजन करण्यात आले पुढे बोलताना पॅंथर नेते भैय्यासाहेब जाधव म्हणाले वर्ण व्यवस्थेने स्त्रियांना शूद्र समजून त्यांना स्वातंत्र्य नाकारले चूल आणि मूलच सांभाळायचं शिक्षणाची दारे बंद होती हजारो वर्षापासून आम्हा गावकुसाबाहेर राहणाऱ्या दलित वंचित समाजावर एका वर्गाकडून प्रचंड अन्याय अत्याचार होत होते त्यांचा अन्याय अत्याचार सहन करूनही आम्ही गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणून पाठिंबा दिला आहे बाबासाहेबांसारखा महान कायदे पंडित कुणीच नव्हता त्यांनीच भारताचे संविधान लिहून पूर्ण केलं संविधान वाचवण्यासाठी ओबीसी एसटी एससी भटक्या विमुक्त बांधवांनी संघटित झाले पाहिजे यावेळी नांदेड जिल्हा बहुजन युद्ध पॅंथरचे अध्यक्ष भीमराव बुकतारी ,शुभांगी मुनेश्वर, अनिल शिरसे, अंकुश सावते शाहीर बाबुराव गाडेकर यांनीही आपले विचार मांडले अध्यक्षीय समारोप डॉक्टर संतोष वाटोळे सर यांनी केले







0 comments:
Post a Comment