जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

24 December 2023

भोकर मुदखेड महामार्गावरील पांडूरणा घाटातील काम खोळंबले ,नागरीक त्रस्त

भोकर :(प्रतिनिधी) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे पांडुरणा घाटात रस्त्याचे काम खोळंबले असून याचा दळणवळणावर मोठा परिणाम होत असताना दिसून येत आहे त्वरित या कामाची सुरुवात करावी अन्यथा जनआंदोलन करण्याची तयारी विविध पक्ष संघटनेकडून दर्शविण्यात आली आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघात दळणवळणाला चालना मिळावी म्हणुन,भोकर मुदखेड या २२कि.मी.च्या माहामार्गासाठी सुमारे ११० कोटी रुपयांचा निधी, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आसताना ऊपलब्ध करुन दिला होता. शारदा कंट्रक्शन कंपनीने मागील दोन वर्षाच्या कालखंडात हे काम जलदगतीने पूर्ण केले माञ पांडुरणा ते रिठ्ठा हा केवळ तीन किलोमीटरचा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्यामुळे, वनविभागाच्या पूर्व परवानगीअभावी रखडलेले आहे अशी माहिती प्राप्त होते.काहीही असले तरी यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत मात्र करावी लागत आहे.
 या महामार्गास तालुक्यातील साळवाडी (डोरली),पांडुरणा,रिठा आदी प्रमूख गावे जोडलेली आहेत. भोकर शहर जवळ असल्यामुळे या गावच्या लोकांची सतत या मार्गे वर्दळ असते. शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार प्रमूख रस्ता वनविभागाच्या परवानगी अभावी खोळंबले असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हात वर केले जात आहेत तर दूसरीकडे आधिक चौकशीत वनविभाग मात्र या कामासाठी परवानगी दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवन सांगतात. मग याप्रकरणी बांधकाम विभागाची धूळफेक कशासाठी असा प्रतिप्रश्न नागरिकात उपस्थीत होत आहे..
जिल्ह्यातील सर्वात मोठी तरकारीची बाजारपेठ भोकर येथे आसल्या कारणाने पांडुरणा, समंदरवाडी, गारगोटवाडी, बोरवाडी साळवाडी ( डोरली) या परिसरा बरोबरच मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री साठी हा मार्गे उपयोगी पडतो अशात या रस्त्यामुळे, व रस्त्यातील खंड्यामुळे दळणवळणावर परिणाम ओढावत आहे. शेतकऱ्यांकडून अथक घामाचे सडे आंथरून फळभाज्या व पालेभाज्याचे उत्पादन घेतले जाते तेच भाजीपाला बाजारपेठत वेळेवर पोहचत नसेल तर त्याचा काय फायदा! अनेकदा शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने तरकारी विकावी लागत आहे. रखडलेले हे काम कधी मार्गी लागेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.वंचित बहूजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप राव, यांनी नागरिकांच्या हितार्थ याप्रकरणी आंदोलनं छेडण्याचा इशारा दिला आहे..

0 comments:

Post a Comment