सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे, तळागाळातील सामान्यांसाठी काम करणारे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे (मा.वि.) जिल्हा संघटक,
मा. दिगांबरराव गायकवाड नागठाणेकर यांनी जमिन अधिकार आंदोलन करून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, अशा अनेक राज्यात जावून भूमिहीन लोकांचा लढा तिव्र करून हजारो लोकांना सरकारी जमिनी मिळवून दिले तसेच दलीत अत्याचार महिला अत्याचार बाल कामगार इत्यादी मानवी हक्कांचे प्रश्न घेऊन सरकार दरबारी लढवया कार्यकर्ता म्हणून काम केले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून तेलंगणा राज्याच्या वतीने आज हैदराबाद येथे “समाज रत्न” पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण जनसंपर्क कार्यालय, उमरी येथे नायगाव विधानसभेचे युवा नेते प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उमरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रल्हादराव पाटील इज्जतगावर, नायगांव विधानसभेचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, प्रकाश पाटील चिंचाळेकर, मोहनराव पाटील कारलेकर, बालाजी पाटील हातनीकर, बालाजी पाटील कारेगावकर, व्यंकटराव पाटील केसगिरे, बाबासाहेब पाटील नागठाणेकर, राजेश पाटील ढगे, बालाजी पाटील ढगे, शेख अजहर भाई, भाऊसाहेब राठोड, गोपीनाथ गोळेगावकर सह आदी जन उपस्थित होते..







0 comments:
Post a Comment