बिलोली ता.प्र.
पी.एम. किसान अंतर्गत पाञ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी बिलोली तालुक्यातील 13689 शेतकऱ्याचे आधार क्रमांक नुसार नाव दुरुस्ती विशेष कँप दिनांक 2/1/2020 ते 6/1/2020 या कालावधीत सेतु केंद्र मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे आंधार क्रमांक या तपशील दुरुस्ती करण्याचे आले आहे त्यांनी आपल्या जवळचा सेतु केंद्र मार्फत संपर्क साधून पी.एम.किसान योजनेत या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ भेटला नाही अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड घेऊन दिनांक 2/1/2019 ते 6/1/2019 आयोजित केलेल्या कँम्पमध्ये सेतू केंद्रामार्फत आपले पी.एम.किसान योजनेचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे सदर चा विशेष कँप मा.जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.उपविभागीय अधिकारी श्री. शरद झाडके व तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांच्या विशेष प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेले आहे. तालुक्यातील सर्व पात्र शेतकरी लाभार्था यांनी या कँपमध्ये सहभागी होऊन आपला आधार कार्डच तपशिल दुरूस्ती करून घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदारऔम प्रकाश गौड यांनी केले आहे.







0 comments:
Post a Comment