बिलोली| भाजप सरकाने पाच वर्षात नांदेडच्या विकासाला खिळ बसविली आहे. एकही रुपयांचा निधी जिल्ह्याच्या विकासाला मिळाला नाही. आता जिल्ह्याच्या विकासाला चालणा देण्यासाठी माझी भुमिका राहणार आहे.आणि यामुळे बिलोलीकरांनी आता चिंता करण्याचे कारण नाही असे मत ना.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
राज्यमंत्री मंडळात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अशोक चव्हाण शुक्रवारी प्रथमच नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.असता शनिवारी संध्याकाळी ६ वाजता विश्राम गृह बिलोली येथे आगमन झाले यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करत अशोक चव्हाण जिंदाबाद अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. जागोजागी कार्यकर्त्यांनी ना.चव्हाण यांचे स्वागत करण्यासाठी बॅंडबाजासह सज्ज होते. याचबरोबर अनेक ठिकाणी चव्हाण यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे नियोजित वेळेपेक्षा तिन तास ते उशीरा पोहचले. त्यां. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत स्विकारण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित झाले. यावेळी ते कार्यकर्त्याीना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मी कार्यकर्त्यांच्या अभूतपुर्व स्वागताने भारावून गेलो आहे.यावेळी आ.अमरनाथ राजूरकर,मा.आ.डि.पी सावंत,मा.आ वसंतराव चव्हाण, आ रावसाहेब अंतापुरकर,जिल्हा अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, संजय बेळगे,ताअध्यक्ष शिवाजी पा.पाचपिंपळीकर,जिल्हा सरचिटणीस गिरीधर पा.डाकोरे अं.ताअध्यक्ष सुलेमान शेख, महिला ताअध्यक्ष मधुमती ताई सुकलोड,मा.नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, मा नगराध्यक्ष भिमराव जेठे,विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिराजदार, नगरसेवक जावेद खुरेशी, उत्तम जेठे,फारुख शेख,संदेश जाधव पदाधिकारी व कार्यकर्ते आदि उपस्थित होते







0 comments:
Post a Comment