बिलोली- मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणूने विळखा घातल्याने केंद्र सरकारने टप्प्या टप्प्याने ४ लॉक डाऊन आणि पाचव्यांदा जीवनावश्यक व देश चालविण्यासाठी आर्थिक उत्पन देशाला आवश्यक असल्याने थोडी शिथिलता देत अनलॉक -१ सुरु केले . पाचव्या टप्प्यात प्रक्रिया उद्योग , दळणवळण व अत्यावश्यक बाबीला सुट मिळाली असली तरी काही संधीसाधू लोकांनी लॉकडाऊनचा बागुलबुवा उभा करीत प्रक्रिया उद्योग थांबले , दळणवळणामुळे वाहतूक दर वाढल्याचे कारण देत प्रत्येक वस्तूवर सवा , दीड ते दुपटीने दरवाढ करून नागरिकांना महागाईचा जोरदार धक्का देत असल्याचे निदर्शनास येत आहे .महामारीच्या संकटात तरी प्रतिज्ञेमधील सारे भारतीय माझे बांधव आहेत या वाक्याला स्मरून इमानदारीने व्यवसाय करून देशसेवा करण्याची संधी या व्यवसायिकांना लाभली असली तरी अनेक व्यवसायिक खड्डे मे जाये जनता , अपना काम बनता , हे धोरण अवलंबत बेईमानीने लक्ष्मीचे पुजारी बनत समाजसेवा देशसेवेला कोलदांडा देत असल्याने जनता कोरोना संकटाबरोबरच महागाईने होरपळत असल्याने अनेकांचे घरात दैनंदिन लागणाऱ्या खर्चाचे मासिक आर्थिक बजेट कोलमडत असून आधीच ७५ दिवसापासून लॉकडाऊनमुळे रोजगाराला बाधा येऊन आर्थिक उत्पन्नाला खीळ बसल्याने प्रपंचगाडा चालवितांना नाकी नऊ येत आहे . यावर प्रशासनाने उपाययोजना आखल्या असतांना प्रत्येक दुकानवर दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश व्यवसायिकांना दिलेले असतांनाही बहुतांश ठिकाणी याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही . तर कोरोना अद्यापही आटोक्यात आलेला नसल्याने प्रशासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी सोशल डीस्टन्स , फिजिकल डीस्टन्स , निर्जंतूकिकरण करून व्यवसाय चालविण्याची मुभा दिली आहे . याचाच गैरफायदा अनेक व्यवसायिक घेतांना दिसत असून प्रक्रीया उद्योगाचे व वाहतुकीचे कारण देत ग्राहकांना हवे ते साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगून व्यापाऱ्यांना जास्त मुनाफा देणारे पर्यायी लोकल साहित्य ग्राहकांच्या माथी मारत असल्याचेही प्रकार सर्रास घडत आहेत .ग्राहकही सगळे काही समजून उमजून “ आता समय आगया बाका , तो गधे को बोलना काका " या उक्तीप्रमाणे नावडते साहित्य खरेदी करून वेळ भागवत आहेत हे कुणीही नाकारणार नाही . एकंदरीत कोरोना संकटामुळे एकीकडे कोरोनाने जगाला माणुसकी शिकवली असल्याचा कांगावा जरी काही बुद्धिवादी करत असले तरी नाण्याची दुसरी बाजू पाहू जाता समाजात एक संधीसाधू लोकांचाही एक मोठा समूह समाजसेवा , देशसेवा थोतांड मानून आपला गल्ला कसा भरेल हेच धेय्य ठेवत कोरोना महामारीच्या संकटाचा गैरफायदा घेण्यात मशुल आहे . एक बाजूने विचार केला तर काही अंशी त्यांचे म्हणणेही खरे आहे . मात्र ते जेवढे अवास्तव दर्शवतात तेवढे मात्र नक्कीच नाही . तेव्हा जिल्हा प्रशासनाने या बाबीला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात गौणखनिज , राशन , केरोसीन च्या धर्तीवर राजकारणविरहीत दक्षता समित्या स्थापन करून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व कोरोनामुळे उदभवलेल्या कृत्रिम महागाईला आळा घालणे गरजेचे आहे मात्र लक्षात घेतो कोण !
09 June 2020
Home »
» कोरोना महामारिच्या नावाने दरवाड नागरिकांची पिळवणूक







0 comments:
Post a Comment