बिलोली:शहरापासून बोधन कडे जाणाऱ्या मार्गवर काही अंतरावर असलेल्या साईबाबा मंदिर येथे साईबाबा मंदिर ट्रस्ट च्या संस्थान चच्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर गरजूंचे बेहाल होत आहेत तेच बाब लक्षात घेऊन काही गरीब व गरजू लोकांसाठी अन्न धान्याची 200 किटाचे वाटप करण्यात आले.बिलोली येथील साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने बिलोली,कार्ला,बाभळी,लगुळ आदि भागातील गरीब व गरजू लोकासाठी अन्न,धान्य व जिवनआवश्यक वस्तूते 200 किटचे बिलोलीचे तहसीलदार विक्रम राजपूत,नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौड़ यांच्या हस्ते गरीब गरजू लोकांना किट देण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष किरण देशमुख,सचिव सौ.अल्का देशमुख,सुरेश शिवलाड,किशन पटाईत,बाबुराव इळगावे जेष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, विजय कुंचनवार, विश्वनाथ समन,बाबुराव देशमुख,शंकर मावलगे आदि उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment