बिलोली:नांदेड जिल्हयात कोरोना संसर्गचा दिवसें दिवस वाढत आसल्याने त्यास रोकण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटणकर यानी नांदेड जिल्हयात १२ जुलै ते २० जुलै पर्यत आठ दिवसाचा कडक लाकडाऊन/ संचारबंदी लागु केली.बिलोली शहरातील सर्व दुकाने व्यापारी बाजारपेठ 100% बंद आहेत. पऱतु येथील जवाबादार अधिकारी तहसिल प्रशासन व नगरपालीका प्रशासन तथा पोलीस आधिकारी रस्त्यावर न उतरल्यामुळे नागरीक मुक्तसंचार चालुच आहे.बिलोली तालुक्यासाठी ही बाब चिंताजनक आहे.नागरिक बिनधास्त घरा बाहेर निघत आहेत.भाजीपाला व फळ विक्रेतावाले गल्लीत फिरत नाहीत. शहराचे मध्यस्थानी भाजीपाला वाले दुकाने लावुन बसत आहेत. नागरीकांची गर्दी होवुन संचारबंदी चा उल्लँघन होत आहे. संचारबंदी काळात बिलोली नगरपरिषदेत कायमस्वरुपी मुख्याधिकारी नाही. जिल्हाधिकारी कोरोना काळात कायमस्वरुपी मुख्याधिकारी ची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी नागरीका कडुन होत आहे. ना़देड शहरात स्वतः जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर व पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर रस्त्यावर येवुन दुचाकी चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.बिलोली शहरात तीन दिवस उलटुन ही तहसिलदार,पोलीस अधिकारी, आरोग्य आधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यापैकी एक ही मोठा अधिकारी रस्त्यावर उतरले नसल्याने शहरात जनतेचा मुक्त संचार हा बिलोली तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे. बिलोली तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता बिलोली तालुक्यात कडक संचार बंदी करावी व जो पर्यत अधिकारी रसत्यावर उतरनार नाही तो पर्यत नागरिक हे घरी बसणार नाही
याकडे जिल्हाधिकारी डा. विपीन ईटणकर व पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर लक्ष देणार का.?







0 comments:
Post a Comment