बिलोली: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी 13 जुलै रोजी 20 तारखेपर्यंत जिल्हात लॉकडाऊन लावण्यात आले आहे.यामध्ये सामान्य माणूस परवानगी शिवाय बाहेर पडल्यास त्यांच्यावर योग्य ति कारवाई करण्यात येत आहे व त्यांच्या कडून दंड आकारण्यात येत आहे.परंतु या लॉकडाऊनचा असर रेती माफियांवर काही दिसुन येत नाहीये दिनांक 13 जुलै रोजी रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडून त्यावर तहसील प्रशासनाने कारवाई केली होती.तरीदेखील रेती वाहतूक करणे काय थांबेल अस वाटत नाहीये बिलोली तालुक्यातील नागणी येथील माजंरा नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅाली अॅटो दौलापुर शिवारात तलाठी पवन ठकरोड यांनी रात्री दिड वाजता जाऊन पकडले आहे.







0 comments:
Post a Comment