बिलोली : शहरातील छोटी गल्ली येथील एका १४ वर्षीय मुलीला तिचे वडील , सावत्रआई , आजोबा , आत्या यांनी दगड , काठीने बेदम मारहाण करुन तिचा गळा आवळला . ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली . घटनेनंतर मारेकरी गायब झाल्याने संतप्त शेजारच्यांनी आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली . मयत नगमा गौस सय्यद दीड वर्षांची असताना १३ वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून तिला सोडून आईने सासरच्या मंडळींशी असलेला संबंध तोडला होता , तेव्हापासून ते मृत्यूच्या दारेत लोटण्यापर्यंत १४ वर्षीय नगमास दररोज छळण्यात येत होते . उपाशी ठेवणे , शिवीगाळ करणे , लाकडाने मारहाण करणे , हाताला गरम चटके देणे आदी प्रकार नगमाला सहन करावे लागले . आजोबा अफजल शाह मौला शहा हे जादूटोणा व करणी करत असल्याच्या भीतीने पोलिसात कोणीही यासंदर्भात तक्रार दिली नाही . यातच २० जुलै रोजी दुपारी ३ च्या दरम्यान घरातील मंडळींनी नगमाला बेदम मारहाण करुन तिचा खून केला.आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या दफनविधीची तयारीही सुरु केली होती . शेजाऱ्यांनी ही कैफियत पोलिसांसमोर मांडली . ही कुणकुण लागताच मयताची आत्या , आजीने पळ काढला , अन्य जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले . शेजारच्या मंडळींनी एकवटून ह्या घटनेची फिर्याद पोलिसात देवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली . २१ जुलै रोजी दुपारी १२ च्या दरम्यान मयताचे शवविच्छेदन करुन पोलिसांनी तिचा दफनविधी केला . याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी मसूद देसाई , महेमूद चाऊस , राजू पवार , सादीक पटेल , दिलीप उत्तरवार , वलिओद्दीन फारुखी , कौसर शहा , अमजद चाऊस , बासीदखान यांच्यासह दोनशेहून अधिक शहरवासियांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
""बिलोलीत घडलेल्या त्या घटनेची तक्रार शहरवासीयांना केली असुन, घरच्या मंडळींना आम्ही ताब्यात घेतले आहे.अन्य ३ जण फरार झाले आहे.तपास करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.""राम केंद्रे , सपोनी बिलोली







0 comments:
Post a Comment