नांदेड:- कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाची लालपरी शुक्रवार दि.22 मे पासून धावणार आहे.यासाठी परिवहन विभागाकडून 80 गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे डेपो नियंत्रक सुनील कचरे यांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाने काही दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला.यामध्ये दारू दुकानांचाही समावेश आहे. तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवून कार्यालय फुलविण्याचा प्रयत्न सुरू आहे.दोन महिन्यांपासून बसून असलेल्या महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहेत. नांदेड नऊ डेपोमधून आठ ते दहा बसेस सोडण्यात येणार असून जिल्हा ठिकाण ते अंतर्गत तालुका ठिकाण असा मार्ग असेल,मात्र माहूर येथे इतर तालुक्यातून बस जाणार नाही,या तालुक्यात जायचे झाल्यास विदर्भातून जावे लागते,तसेंच हदगाव येथे सुद्धा वारंगाफाटा मार्गे बस धावणार नसून तामसा मार्गे बसेस सोडण्यात येणार असल्याचे सुनील कचरे यांनी सांगितले.
——
ग्रामीण भागाला फटका
शासनाच्या बसेस या जिल्हा अंतर्गत धावणार आहेत,याचा लाभ ग्रामीण भागातील प्रवाशांना मिळणार नाही,ग्रामीण भागातील लोकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
——-
दुपारनंतर चाके मंदावणार
टाळेबंदीत सकाळी सात ते दुपारी दोन अशी दुकानांना सूट देण्यात आली आहे,त्यामुळे बसला सकाळ ते दुपारी दोन पर्यंत गर्दी असू शकते,गर्दी पाहून दुपारनंतर गाड्या चालविण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सुनील कचरे यांनी सांगितले.







0 comments:
Post a Comment